शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

बोरगावातील किंगमेकर अशोकअण्णा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:33 IST

सहकाराचा महामेरू, गोरगरिबांचे आधारवड, बोरगावच्या राजकीय पटावरचे किंगमेकर, दूरदृष्टीचे नेतृत्व अशोकराव धोंडिराम पाटील ऊर्फ अशोकअण्णा यांचा आज, दि. ८ ...

सहकाराचा महामेरू, गोरगरिबांचे आधारवड, बोरगावच्या राजकीय पटावरचे किंगमेकर, दूरदृष्टीचे नेतृत्व अशोकराव धोंडिराम पाटील ऊर्फ अशोकअण्णा यांचा आज, दि. ८ सप्टेंबर रोजी प्रथम पुण्यस्मरण दिन. त्या निमित्ताने त्यांच्या जीवनपटाचा थोडक्यात घेतलेला आढावा...

अशोकअण्णा पाटील यांचा जन्म दि. ६ जून १९५६ रोजी दानशूर व्यक्तिमत्त्व असणाऱ्या धोंडिराम पाटील ऊर्फ सावरकरदादा यांच्या कुटुंबात झाला. अशोकअण्णा यांना बालवयातच राजकारणाचे बाळकडू त्यांच्या वडिलांकडून मिळाले. ते गावचे प्रदीर्घ काळ सरपंच व वसंतदादांचे अनुयायी म्हणून परिचित होते. सावकरदादांनी कुटुंबापेक्षा समाज व त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी वेळ घालविला. या कुटुंबाला आर्थिक अडचणीलाही सामोरे जावे लागले. कमी वयात अशोकअण्णा यांना कैटुंबिक जबाबदारी स्वीकारावी लागली. त्यांना शिक्षण अर्धवट सोडून कुटुंबाचा डोलारा सांभाळताना सवंगड्यांच्या मदतीने बैलजोडींचा पैरा करावा लागला. काळ्या आईला हिरवा शालू नेसविण्यासाठी प्रथम शेती सुजलाम्, सुफलाम् करण्यासाठी इरिगेशनची उभारणी केली. यासाठी जयवंतराव भोसले यांचे सहकार्य लाभले. अण्णा अल्पशिक्षित असतानाही सहकाराची कास धरत बंद अवस्थेकडे चाललेली बलभीम संस्था ताब्यात घेतली. या संस्थेस ऊर्जितावस्था आणत असताना राजकारणात उडी घेतली. यावेळी विद्यमान पालकमंत्री जयंत पाटील व राज्य बँकेचे माजी अध्यक्ष माणिकराव पाटील हे त्यांच्यासाठी मैलाचा दगड बनले. राजकीय कारकीर्दीच्या सुरुवातीलाच सरपंच पदाची जबाबदारी पडली. ती त्यांनी समर्थपणे पेलली. अण्णांच्या जीवनाला वेगळी कलाटणीच मिळाली. राजकारणाबरोबर सहकारात एक पाऊल पुढे टाकत यशवंत पतसंस्थेची स्थापना केली. ही संस्था त्यांनी जिल्ह्यात नावारूपाला आणली. बोरगाव, इस्लामपूर व ताकारी येथे शाखा काढल्या. या संस्थेस अनेक पुरस्कार मिळविले. बलभीम संस्थेचाही ब्रॅंड तयार केला. अण्णांचा संपर्क लक्षात घेऊन जयंत पाटील यांनी राजारामबापू दूध संघात अनेक वर्षे त्यांना संचालक म्हणून संधी दिली होती. तरुण पिढीला शारीरिक सक्षमतेसाठी अद्ययावत व्यायामशाळा उभारली. स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र उभारले. वाचन चळवळीचा भाग बनत वाचनालय उभारले. सहकाराच्या माध्यमातून अनेक गोरगरीब व गरजू लोकांना आर्थिक मदत केली. जिल्ह्यात मृत सभासदांच्या वारसास मयत निधी देण्याचा पायंडा अण्णांनी राबविला. त्यांनी गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले. कोणतीही नैसर्गिक अपत्ती उभा राहिली की त्याला सढळ हाताने मदत केली. यामध्ये ते स्वत:च कोरोनाच्या महामारीचे बळी पडले. यामुळे अनेकांचे छत्र हरपले. गावच्या राजकारणात कधीच न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली. सहकाराचा महामेरू हरपला. मात्र, त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचे सुपुत्र धैर्यशील पाटील व दिग्विजय पाटील अण्णांचे बंधू, पुतणे हा वारसा व वसा सध्या जपत आहेत. आज अण्णा जरी हयात नसले, तरी त्यांच्या कर्तृत्वाने ते परिसरात स्मरणात व स्मृतीत चिरंतन राहतील. अण्णांचा आज प्रथम स्मृतिदिन विविध उपक्रमांनी साजरा होत आहे.