शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
2
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
3
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
4
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
5
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
6
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
8
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
9
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
10
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
11
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
12
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
13
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
14
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
15
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
16
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
17
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
18
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
19
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
20
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

बोरगावातील किंगमेकर अशोकअण्णा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:33 IST

सहकाराचा महामेरू, गोरगरिबांचे आधारवड, बोरगावच्या राजकीय पटावरचे किंगमेकर, दूरदृष्टीचे नेतृत्व अशोकराव धोंडिराम पाटील ऊर्फ अशोकअण्णा यांचा आज, दि. ८ ...

सहकाराचा महामेरू, गोरगरिबांचे आधारवड, बोरगावच्या राजकीय पटावरचे किंगमेकर, दूरदृष्टीचे नेतृत्व अशोकराव धोंडिराम पाटील ऊर्फ अशोकअण्णा यांचा आज, दि. ८ सप्टेंबर रोजी प्रथम पुण्यस्मरण दिन. त्या निमित्ताने त्यांच्या जीवनपटाचा थोडक्यात घेतलेला आढावा...

अशोकअण्णा पाटील यांचा जन्म दि. ६ जून १९५६ रोजी दानशूर व्यक्तिमत्त्व असणाऱ्या धोंडिराम पाटील ऊर्फ सावरकरदादा यांच्या कुटुंबात झाला. अशोकअण्णा यांना बालवयातच राजकारणाचे बाळकडू त्यांच्या वडिलांकडून मिळाले. ते गावचे प्रदीर्घ काळ सरपंच व वसंतदादांचे अनुयायी म्हणून परिचित होते. सावकरदादांनी कुटुंबापेक्षा समाज व त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी वेळ घालविला. या कुटुंबाला आर्थिक अडचणीलाही सामोरे जावे लागले. कमी वयात अशोकअण्णा यांना कैटुंबिक जबाबदारी स्वीकारावी लागली. त्यांना शिक्षण अर्धवट सोडून कुटुंबाचा डोलारा सांभाळताना सवंगड्यांच्या मदतीने बैलजोडींचा पैरा करावा लागला. काळ्या आईला हिरवा शालू नेसविण्यासाठी प्रथम शेती सुजलाम्, सुफलाम् करण्यासाठी इरिगेशनची उभारणी केली. यासाठी जयवंतराव भोसले यांचे सहकार्य लाभले. अण्णा अल्पशिक्षित असतानाही सहकाराची कास धरत बंद अवस्थेकडे चाललेली बलभीम संस्था ताब्यात घेतली. या संस्थेस ऊर्जितावस्था आणत असताना राजकारणात उडी घेतली. यावेळी विद्यमान पालकमंत्री जयंत पाटील व राज्य बँकेचे माजी अध्यक्ष माणिकराव पाटील हे त्यांच्यासाठी मैलाचा दगड बनले. राजकीय कारकीर्दीच्या सुरुवातीलाच सरपंच पदाची जबाबदारी पडली. ती त्यांनी समर्थपणे पेलली. अण्णांच्या जीवनाला वेगळी कलाटणीच मिळाली. राजकारणाबरोबर सहकारात एक पाऊल पुढे टाकत यशवंत पतसंस्थेची स्थापना केली. ही संस्था त्यांनी जिल्ह्यात नावारूपाला आणली. बोरगाव, इस्लामपूर व ताकारी येथे शाखा काढल्या. या संस्थेस अनेक पुरस्कार मिळविले. बलभीम संस्थेचाही ब्रॅंड तयार केला. अण्णांचा संपर्क लक्षात घेऊन जयंत पाटील यांनी राजारामबापू दूध संघात अनेक वर्षे त्यांना संचालक म्हणून संधी दिली होती. तरुण पिढीला शारीरिक सक्षमतेसाठी अद्ययावत व्यायामशाळा उभारली. स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र उभारले. वाचन चळवळीचा भाग बनत वाचनालय उभारले. सहकाराच्या माध्यमातून अनेक गोरगरीब व गरजू लोकांना आर्थिक मदत केली. जिल्ह्यात मृत सभासदांच्या वारसास मयत निधी देण्याचा पायंडा अण्णांनी राबविला. त्यांनी गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले. कोणतीही नैसर्गिक अपत्ती उभा राहिली की त्याला सढळ हाताने मदत केली. यामध्ये ते स्वत:च कोरोनाच्या महामारीचे बळी पडले. यामुळे अनेकांचे छत्र हरपले. गावच्या राजकारणात कधीच न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली. सहकाराचा महामेरू हरपला. मात्र, त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचे सुपुत्र धैर्यशील पाटील व दिग्विजय पाटील अण्णांचे बंधू, पुतणे हा वारसा व वसा सध्या जपत आहेत. आज अण्णा जरी हयात नसले, तरी त्यांच्या कर्तृत्वाने ते परिसरात स्मरणात व स्मृतीत चिरंतन राहतील. अण्णांचा आज प्रथम स्मृतिदिन विविध उपक्रमांनी साजरा होत आहे.