शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

बोरगावातील किंगमेकर अशोकअण्णा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:33 IST

सहकाराचा महामेरू, गोरगरिबांचे आधारवड, बोरगावच्या राजकीय पटावरचे किंगमेकर, दूरदृष्टीचे नेतृत्व अशोकराव धोंडिराम पाटील ऊर्फ अशोकअण्णा यांचा आज, दि. ८ ...

सहकाराचा महामेरू, गोरगरिबांचे आधारवड, बोरगावच्या राजकीय पटावरचे किंगमेकर, दूरदृष्टीचे नेतृत्व अशोकराव धोंडिराम पाटील ऊर्फ अशोकअण्णा यांचा आज, दि. ८ सप्टेंबर रोजी प्रथम पुण्यस्मरण दिन. त्या निमित्ताने त्यांच्या जीवनपटाचा थोडक्यात घेतलेला आढावा...

अशोकअण्णा पाटील यांचा जन्म दि. ६ जून १९५६ रोजी दानशूर व्यक्तिमत्त्व असणाऱ्या धोंडिराम पाटील ऊर्फ सावरकरदादा यांच्या कुटुंबात झाला. अशोकअण्णा यांना बालवयातच राजकारणाचे बाळकडू त्यांच्या वडिलांकडून मिळाले. ते गावचे प्रदीर्घ काळ सरपंच व वसंतदादांचे अनुयायी म्हणून परिचित होते. सावकरदादांनी कुटुंबापेक्षा समाज व त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी वेळ घालविला. या कुटुंबाला आर्थिक अडचणीलाही सामोरे जावे लागले. कमी वयात अशोकअण्णा यांना कैटुंबिक जबाबदारी स्वीकारावी लागली. त्यांना शिक्षण अर्धवट सोडून कुटुंबाचा डोलारा सांभाळताना सवंगड्यांच्या मदतीने बैलजोडींचा पैरा करावा लागला. काळ्या आईला हिरवा शालू नेसविण्यासाठी प्रथम शेती सुजलाम्, सुफलाम् करण्यासाठी इरिगेशनची उभारणी केली. यासाठी जयवंतराव भोसले यांचे सहकार्य लाभले. अण्णा अल्पशिक्षित असतानाही सहकाराची कास धरत बंद अवस्थेकडे चाललेली बलभीम संस्था ताब्यात घेतली. या संस्थेस ऊर्जितावस्था आणत असताना राजकारणात उडी घेतली. यावेळी विद्यमान पालकमंत्री जयंत पाटील व राज्य बँकेचे माजी अध्यक्ष माणिकराव पाटील हे त्यांच्यासाठी मैलाचा दगड बनले. राजकीय कारकीर्दीच्या सुरुवातीलाच सरपंच पदाची जबाबदारी पडली. ती त्यांनी समर्थपणे पेलली. अण्णांच्या जीवनाला वेगळी कलाटणीच मिळाली. राजकारणाबरोबर सहकारात एक पाऊल पुढे टाकत यशवंत पतसंस्थेची स्थापना केली. ही संस्था त्यांनी जिल्ह्यात नावारूपाला आणली. बोरगाव, इस्लामपूर व ताकारी येथे शाखा काढल्या. या संस्थेस अनेक पुरस्कार मिळविले. बलभीम संस्थेचाही ब्रॅंड तयार केला. अण्णांचा संपर्क लक्षात घेऊन जयंत पाटील यांनी राजारामबापू दूध संघात अनेक वर्षे त्यांना संचालक म्हणून संधी दिली होती. तरुण पिढीला शारीरिक सक्षमतेसाठी अद्ययावत व्यायामशाळा उभारली. स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र उभारले. वाचन चळवळीचा भाग बनत वाचनालय उभारले. सहकाराच्या माध्यमातून अनेक गोरगरीब व गरजू लोकांना आर्थिक मदत केली. जिल्ह्यात मृत सभासदांच्या वारसास मयत निधी देण्याचा पायंडा अण्णांनी राबविला. त्यांनी गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले. कोणतीही नैसर्गिक अपत्ती उभा राहिली की त्याला सढळ हाताने मदत केली. यामध्ये ते स्वत:च कोरोनाच्या महामारीचे बळी पडले. यामुळे अनेकांचे छत्र हरपले. गावच्या राजकारणात कधीच न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली. सहकाराचा महामेरू हरपला. मात्र, त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचे सुपुत्र धैर्यशील पाटील व दिग्विजय पाटील अण्णांचे बंधू, पुतणे हा वारसा व वसा सध्या जपत आहेत. आज अण्णा जरी हयात नसले, तरी त्यांच्या कर्तृत्वाने ते परिसरात स्मरणात व स्मृतीत चिरंतन राहतील. अण्णांचा आज प्रथम स्मृतिदिन विविध उपक्रमांनी साजरा होत आहे.