शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

गांधींना मारले ते बरे झाले, जिवंत असते तर दररोज मेले असते! - तुषार गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2022 11:59 IST

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनीदेखील आपण भीतीच्या वातावरणातच राहत आहोत

सांगली : गांधींना मारले ते बरे झाले, जिवंत असते तर सध्याची अवस्था पाहून दररोज मेले असते, असे प्रतिपादन गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांनी केले. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनीदेखील आपण भीतीच्या वातावरणातच राहत आहोत, असे ते म्हणाले.सांगलीत शुक्रवारी शांतिनिकेतन लोकविद्यापीठात क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी आमदार अरुण लाड, विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे डॉ. बाबुराव गुरव, ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव, किरण लाड आदी उपस्थित होते. सकाळी आमराईपासून शांतिनिकेतनपर्यंत रॅली काढण्यात आली. ७५ स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार झाला.गांधी म्हणाले की, प्रतिसरकारची गरज आजही आहे. सध्याचे सरकार गद्दारांचे आहे. यातीलच काही लोक स्वातंत्र्यलढ्यावेळी ब्रिटिशांसोबत होते, तरीही आपण निर्लज्जपणे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहोत. जात, धर्म, लिंगाच्या आधारे माणसांची विभागणी सुरू आहे.महाराव म्हणाले की, अच्छे दिनाचे स्वप्न दाखवत दररोज फसवणूक सुरू आहे. गोमूत्रासोबत पंचगव्य म्हणून शेण खायला लावले, आता हलाल आणि झटक्याचा वाद सुरू केलाय. अशाने देश सुधारणार कसा? आंबे खाऊन मुले कशी होतील? हे लोक खोटे आहेत. द्वेष पसरवणारा धर्म सांगत आहेत.आ. लाड म्हणाले की, सध्याचे सरकार लबाड आहे. त्यामुळे पुन्हा नव्याने लढ्याची आवश्यकता आहे. नोकऱ्या, उदरनिर्वाह, उद्योगधंदे अशा अनेक समस्या आहेत.यावेळी प्रसाद कुलकर्णी, ॲड. सुभाष पाटील, संपतराव पवार, उमेश देशमुख, व्ही. वाय. पाटील, धनाजी गुरव, रमेश सहस्त्रबुद्धे, स्वातंत्र्यसैनिक माधवराव माने आदी उपस्थित होते.

स्वातंत्र्यदिन साजरा केला नाहीतुषार गांधी म्हणाले की, राजस्थानमध्ये दलित विद्यार्थ्याला सवर्ण शिक्षकाने जीवे मारले. त्यावर पंतप्रधानांनी एकही शब्द काढला नाही. दिल्लीतील बलात्कारानंतर लोक रस्त्यावर आले, पण बिल्कीस बानू मुस्लीम आहे म्हणून कोणीही आवाज उठवला नाही. याच्या निषेधार्थ मी यावर्षी स्वातंत्र्यदिन साजरा केला नाही.

टॅग्स :Sangliसांगली