शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
5
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
6
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
7
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
8
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
9
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
10
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
11
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
12
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
13
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
14
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
15
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
16
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
17
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
18
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
20
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी

गांधींना मारले ते बरे झाले, जिवंत असते तर दररोज मेले असते! - तुषार गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2022 11:59 IST

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनीदेखील आपण भीतीच्या वातावरणातच राहत आहोत

सांगली : गांधींना मारले ते बरे झाले, जिवंत असते तर सध्याची अवस्था पाहून दररोज मेले असते, असे प्रतिपादन गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांनी केले. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनीदेखील आपण भीतीच्या वातावरणातच राहत आहोत, असे ते म्हणाले.सांगलीत शुक्रवारी शांतिनिकेतन लोकविद्यापीठात क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी आमदार अरुण लाड, विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे डॉ. बाबुराव गुरव, ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव, किरण लाड आदी उपस्थित होते. सकाळी आमराईपासून शांतिनिकेतनपर्यंत रॅली काढण्यात आली. ७५ स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार झाला.गांधी म्हणाले की, प्रतिसरकारची गरज आजही आहे. सध्याचे सरकार गद्दारांचे आहे. यातीलच काही लोक स्वातंत्र्यलढ्यावेळी ब्रिटिशांसोबत होते, तरीही आपण निर्लज्जपणे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहोत. जात, धर्म, लिंगाच्या आधारे माणसांची विभागणी सुरू आहे.महाराव म्हणाले की, अच्छे दिनाचे स्वप्न दाखवत दररोज फसवणूक सुरू आहे. गोमूत्रासोबत पंचगव्य म्हणून शेण खायला लावले, आता हलाल आणि झटक्याचा वाद सुरू केलाय. अशाने देश सुधारणार कसा? आंबे खाऊन मुले कशी होतील? हे लोक खोटे आहेत. द्वेष पसरवणारा धर्म सांगत आहेत.आ. लाड म्हणाले की, सध्याचे सरकार लबाड आहे. त्यामुळे पुन्हा नव्याने लढ्याची आवश्यकता आहे. नोकऱ्या, उदरनिर्वाह, उद्योगधंदे अशा अनेक समस्या आहेत.यावेळी प्रसाद कुलकर्णी, ॲड. सुभाष पाटील, संपतराव पवार, उमेश देशमुख, व्ही. वाय. पाटील, धनाजी गुरव, रमेश सहस्त्रबुद्धे, स्वातंत्र्यसैनिक माधवराव माने आदी उपस्थित होते.

स्वातंत्र्यदिन साजरा केला नाहीतुषार गांधी म्हणाले की, राजस्थानमध्ये दलित विद्यार्थ्याला सवर्ण शिक्षकाने जीवे मारले. त्यावर पंतप्रधानांनी एकही शब्द काढला नाही. दिल्लीतील बलात्कारानंतर लोक रस्त्यावर आले, पण बिल्कीस बानू मुस्लीम आहे म्हणून कोणीही आवाज उठवला नाही. याच्या निषेधार्थ मी यावर्षी स्वातंत्र्यदिन साजरा केला नाही.

टॅग्स :Sangliसांगली