शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

खानापुरात पुन्हा अनिलभाऊच!

By admin | Updated: February 23, 2017 23:00 IST

तालुक्यात भगवे वादळ : परिवर्तन आघाडीला नाकारले

दिलीप मोहिते-- विटा  -जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेचे आ. अनिल बाबर यांनी ग्रामीण भागावर पूर्णपणे वर्चस्व असल्याचे पुन्हा एकदा सिध्द केले असून, जिल्हा परिषदेच्या सर्व तीनही जागा व पंचायत समितीच्या सहापैकी पाच जागांवर विजय मिळवून पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा फडकविला आहे. त्यामुळे खानापूर पंचायत समितीत कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या परिवर्तन आघाडीला मतदारांनी नाकारून, आ. अनिलभाऊंचीच सत्ता कायम ठेवत तालुक्यात भगवे वादळ निर्माण केले आहे. त्यामुळे एकतर्फी विजय मिळविलेल्या शिवसेनेपुढे कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी व भाजपचाही करिष्मा दिसून आला नाही.खानापूर तालुक्यात शिवसेनेचे आ. बाबर यांच्याविरूध्द कॉँग्रेसचे माजी आ. पाटील व राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. मुळीक यांनी परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून लढत दिली होती. आ. बाबर यांनी सर्व उमेदवार शिवसेना पक्षाच्या चिन्हावर मैदानात उतरविले होते, तर कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसने ऐनवेळी पक्षाचे एबी फॉर्म नाकारून आघाडीचा घेतलेला निर्णय चुकीचा ठरला. कारण आघाडीच्या उमेदवारांना मिळालेली चिन्हे मतदारांपर्यंत पोहोचविण्यात त्यांना फारसे यश आले नाही.आ. बाबर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने तालुक्यातील तीनही जिल्हा परिषदेच्या जागा जिंकल्या. कॉँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या भाळवणी गटातही त्यांनी भगवे वादळ निर्माण करून जिल्हा परिषदेच्या नवीन जागेची कमाई केली. मात्र, भाळवणी गणात शिवसेनेच्या बंडखोरीचा फटका आ. बाबर यांना बसल्याने, तेथील जागा कॉँग्रेस व राष्ट्रवादी पुरस्कृत परिवर्तन आघाडीच्या हाताला लागली. तसेच दुसरीकडे कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांनी पक्षाच्या स्थानिक नेत्यांना बाजूला सारून पुष्पलता सकटे यांना पक्षाच्या चिन्हावर मैदानात उतरविले, तर सदाशिवराव पाटील यांनी परिवर्तन आघाडीतून वंदना गोतपागर यांना रिंगणात उतरविल्याने, कॉँग्रेसच्या गटबाजीचा फटका भाळवणीत बसल्याचे दिसून आले.द्वेषाचे राजकारणनिवडणुकीत विरोधकांनी केवळ व्यक्तिद्वेषाचे राजकारण केले. मतदारांनी धनशक्तीला बाजूला ठेवून जनशक्तीचा विजय केला आहे. खानापूर पंचायत समितीच्या माध्यमातून केलेली विकास कामे व सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी जिवाचे रान केल्यामुळे यश संपादन करू शकलो. आगामी काळातही विकास कामांना प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही शिवसेनेचे नेते आ. अनिल बाबर यांनी निकालानंतर बोलताना दिली.