शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमदार माजलेत असं बाहेर म्हटलं जातंय, राजकारणाच्या पलीकडे जाणार की नाही?"; CM फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं
2
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
3
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
4
विदेशी सट्टेबाजांचा वायदे बाजारावर डाव, छोट्या गुंतवणूकदारांनो सजगतेनं करा बचाव!
5
विधिमंडळ परिसरात धक्काबुक्की प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला, दोषींवर होणार अशी कारवाई 
6
शाहरुख खानच्या मेकअप रुमबाहेर काढला फोटो, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केला आनंद
7
"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान
8
रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीन मार्केटमध्ये रिलायन्सची एन्ट्री, १०० वर्ष जुनी अमेरिकन कंपनी केली खरेदी
9
सोन्याची झळाळी कमी होणार, चांदीची चमक मात्र वाढणार; १३ टक्क्यांच्या तेजीचा अंदाज, किती जाऊ शकतो भाव?
10
मोहम्मद शमीची एक्स पत्नी हसीन जहां आणि मुलीवर हत्येच्या प्रयत्नाचा आरोप, गुन्हा दाखल; भांडणाचा व्हिडिओ व्हायरल
11
Narendra Modi : "बिहारला लुटलं, बदला घेतला..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेस-राजदवर जोरदार हल्लाबोल
12
IND vs ENG : लॉर्ड्सच्या मैदानातील पराभवानंतर या दिग्गजांनी काढली जड्डूची चूक; आता गंभीर म्हणाला...
13
जगातला एकमेव अनोखा देश, 'या' देशाला राजधानीच नाही! तुम्हाला माहितीये का?
14
गुहेत सापडलेल्या रशियन महिलेबाबत मोठी माहिती आली समोर; इस्त्रायलच्या पार्टनरने केली वेगळीच मागणी
15
महाराष्ट्रातील गणेशोत्सव राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवणार, आशिष शेलार यांची घोषणा
16
मित्र-नातेवाईकांसाठी 'जामीनदार' बनताय? 'ही' काळजी घेतली नाही तर बँक दारातही उभं करणार नाही
17
मोठी बातमी! सांगलीतील 'इस्लामपूर' शहराचे नाव बदलणार; भुजबळांची विधानसभेत घोषणा
18
स्टायलिश लूकसह जबरदस्त फीचर्स! टीव्हीएसची स्पोर्ट्स बाईक अपाचे आरटीआर ३१० भारतात लॉन्च
19
सीईओंना कोट्यवधी रुपयाचं पॅकेज तर इंटर्नला ५०० रुपयांचं ॲमेझॉन व्हाउचर! तरुणाच्या पोस्टने खळबळ

खानापुरात पुन्हा अनिलभाऊच!

By admin | Updated: February 23, 2017 23:00 IST

तालुक्यात भगवे वादळ : परिवर्तन आघाडीला नाकारले

दिलीप मोहिते-- विटा  -जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेचे आ. अनिल बाबर यांनी ग्रामीण भागावर पूर्णपणे वर्चस्व असल्याचे पुन्हा एकदा सिध्द केले असून, जिल्हा परिषदेच्या सर्व तीनही जागा व पंचायत समितीच्या सहापैकी पाच जागांवर विजय मिळवून पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा फडकविला आहे. त्यामुळे खानापूर पंचायत समितीत कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या परिवर्तन आघाडीला मतदारांनी नाकारून, आ. अनिलभाऊंचीच सत्ता कायम ठेवत तालुक्यात भगवे वादळ निर्माण केले आहे. त्यामुळे एकतर्फी विजय मिळविलेल्या शिवसेनेपुढे कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी व भाजपचाही करिष्मा दिसून आला नाही.खानापूर तालुक्यात शिवसेनेचे आ. बाबर यांच्याविरूध्द कॉँग्रेसचे माजी आ. पाटील व राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. मुळीक यांनी परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून लढत दिली होती. आ. बाबर यांनी सर्व उमेदवार शिवसेना पक्षाच्या चिन्हावर मैदानात उतरविले होते, तर कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसने ऐनवेळी पक्षाचे एबी फॉर्म नाकारून आघाडीचा घेतलेला निर्णय चुकीचा ठरला. कारण आघाडीच्या उमेदवारांना मिळालेली चिन्हे मतदारांपर्यंत पोहोचविण्यात त्यांना फारसे यश आले नाही.आ. बाबर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने तालुक्यातील तीनही जिल्हा परिषदेच्या जागा जिंकल्या. कॉँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या भाळवणी गटातही त्यांनी भगवे वादळ निर्माण करून जिल्हा परिषदेच्या नवीन जागेची कमाई केली. मात्र, भाळवणी गणात शिवसेनेच्या बंडखोरीचा फटका आ. बाबर यांना बसल्याने, तेथील जागा कॉँग्रेस व राष्ट्रवादी पुरस्कृत परिवर्तन आघाडीच्या हाताला लागली. तसेच दुसरीकडे कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांनी पक्षाच्या स्थानिक नेत्यांना बाजूला सारून पुष्पलता सकटे यांना पक्षाच्या चिन्हावर मैदानात उतरविले, तर सदाशिवराव पाटील यांनी परिवर्तन आघाडीतून वंदना गोतपागर यांना रिंगणात उतरविल्याने, कॉँग्रेसच्या गटबाजीचा फटका भाळवणीत बसल्याचे दिसून आले.द्वेषाचे राजकारणनिवडणुकीत विरोधकांनी केवळ व्यक्तिद्वेषाचे राजकारण केले. मतदारांनी धनशक्तीला बाजूला ठेवून जनशक्तीचा विजय केला आहे. खानापूर पंचायत समितीच्या माध्यमातून केलेली विकास कामे व सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी जिवाचे रान केल्यामुळे यश संपादन करू शकलो. आगामी काळातही विकास कामांना प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही शिवसेनेचे नेते आ. अनिल बाबर यांनी निकालानंतर बोलताना दिली.