शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
3
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
4
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
5
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
6
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
7
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
8
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
9
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
10
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
11
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
12
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
13
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
14
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
15
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
16
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
17
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
18
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
19
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
20
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले

‘आघाव’मुळे जतमध्ये ‘खाकी’ला कलंक

By admin | Updated: November 12, 2014 23:28 IST

पोलिसांची प्रतिमा सुधारा : गैर कारभार रोखण्याची गरज

जयवंत आदाटे : जत पोलीस ठाण्यातील प्रशिक्षणार्थी महिला पोलीस उपनिरीक्षक सीमा आघाव यांना चार हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्यामुळे जत पोलिसांची जनमानसातील प्रतिमा मलीन झाली आहे. पोलीस स्टेशनचा कारभार पारदर्शक करण्यासाठी कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची गरज आहे.धोंडिराम महाजन रा. बिरूळ, (ता. जत) व त्यांच्या भावकीतील इतरांसोबत शेतजमीन वादातून तीन महिन्यांपूर्वी मारामारी झाली होती. यासंदर्भात परस्परविरोधी फिर्याद पोलिसात दाखल करण्यात आली होती. या प्रकरणात उपनिरीक्षक सीमा आघाव यांना लाच घेताना रंगेहात पकडले होते. सीमा आघाव यांना निलंबित करून त्यांची बदली पोलीस मुख्यालयात करण्यात आली आहे. आघाव यांचा कार्यकाल प्रशिक्षणार्थी होता, तो नुकताच पूर्ण झाला होता. परंतु त्यांची सेवा कायम करण्यात आली नव्हती. त्यांच्या कामकाजाबद्दल येथील नागरिकांच्या तक्रारी होत्या; परंतु त्या एक महिला असून प्रशिक्षणार्थी असल्यामुळे वरिष्ठ अधिकारी त्यांच्याविरोधात असलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष करत होते.आघाव यांच्यावर निलंबनाची कारवाई करत असताना पोलीस निरीक्षक प्रकाश कदम यांची येथून तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. येथील अतिरिक्त कार्यभार सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. एच. शेख यांच्याकडे देण्यात आला आहे. जत पोलीस ठाण्यात नागरिकांचे काम मोफत होत नाही. देवाण-घेवाण ठरल्यानंतर कामाची पूर्तता केली जात आहे. येथे कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांनी आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी काही दलाल नेमले आहेत. त्यांच्यामार्फत सर्व व्यवहार पूर्ण केले जात आहेत. यामध्ये काही राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. सीमा आघाव यांना निलंबित करून व प्रकाश कदम यांची बदली करून पोलीस स्टेशनची प्रतिमा स्वच्छ होणार नाही. यासाठी कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची नेमणूक केली तरच पोलीस ठाण्यातील भ्रष्ट कारभार थांबणार आहे.कार्यालयाबाहेर टक्केवारीचा बाजारवरिष्ठांना बसण्यासाठी जत पोलीस स्टेशनची इमारत अपुरी पडू लागली आहे. त्यामुळे बाहेर फिरून आर्थिक गणित जमविण्याचा प्रयत्न ते करू लागले आहेत.जत पोलीस स्टेशनकडे अधिकारी व कर्मचारी मिळून ७६ जागा मंजूर आहेत. परंतु प्रत्यक्षात ५१ जण कार्यरत असून, त्यांच्याकडे पश्चिम भागातील ७५ गावांचा कार्यभार देण्यात आला आहे, तर उमदी पोलीस स्टेशनकडे उर्वरित ५० गावांचा कार्यभार देण्यात आला आहे.