शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

‘खानापूर’च्या नेत्यांचे लक्ष्य ‘विसापूर’

By admin | Updated: September 21, 2015 00:04 IST

३९ ग्रामपंचायतींत धूमशान : मांजर्डे-विसापूर सर्कलच्या १६ गावांचा समावेश

दत्ता पाटील -- तासगाव तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकाचे महिन्याभरात धूमशान सुरू होणार आहे. तालुक्यावर वर्चस्व मिळवण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादीत या निवडणुकीच्यानिमित्ताने जोरदार चुरस होणार, हे स्पष्ट आहे. मात्र या ग्रामपंचायतीत खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघात समावेश असणाऱ्या मांजर्डे-विसापूर सर्कलमधील १६ गावांचा समावेश आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीची पेरणी करण्यासाठी खानापूर-आटपाडीतील नेत्यांनीही या ग्रामपंचायती ‘लक्ष्य’ केलेल्या आहेत. या निमित्ताने तालुक्यात आमदार अनिल बाबर, माजी आमदार सदाशिवराव पाटील, गोपीचंद पडळकर यांचा संपर्क वाढला आहे.तासगाव बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला मिळालेले वर्चस्व भाजपच्या अस्तित्वाला धक्का देणारे ठरले. खासदार संजयकाका पाटील यांनी तासगाव नगरपालिकेतील राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांना भाजपमध्ये प्रवेश देऊन नगरपालिकेचे सत्तास्थान भाजपच्या ताब्यात घेतले. आता तालुक्यातील सर्वाधिक ३९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका आॅक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तालुक्यातील राजकारण दिवसेंदिवस तापत चालले आहे. खासदार संजयकाका पाटील यांनी विकासकामांच्या उद्घाटनाच्या निमित्ताने ३९ गावांचा दौरा केला, तर आमदार सुमनताई पाटील यांनीही विकासकामांचे उद्घाटन करण्यास सुरुवात केली आहे.राष्ट्रवादीला या निवडणुकांत आर. आर. पाटील यांची पोकळी जाणवणार आहे. त्यामुळे नेत्यांची भिस्त बाजार समितीच्या निवडणुकीप्रमाणेच कार्यकर्त्यांवरच राहणार आहे. भाजपकडे तगड्या कार्यकर्त्यांची फळी कमकुवत असल्याने स्वत: खासदार संजयकाका आतापासूनच ग्रामपंचायतींच्या मैदानात उरतले आहेत.निवडणूक होणाऱ्या ३९ ग्रामपंचायतींपैकी खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघातील १६ गावांचा समावेश आहे. खानापूर-आटपाडीचा आमदार ठरवण्यात मांजडे-विसापूर सर्कलमधील २१ गावे नेहमीच निर्णायक ठरलेली आहेत. त्यामुळे या १६ गावांकडे शिवसेनेचे आमदार अनिल बाबर, माजी आमदार सदाशिवराव पाटील, भाजपचे गोपीचंद पडळकर यांनीही लक्ष केंद्रीत केले आहे. भाजपचे गोपीचंद पडळकर खासदारांबरोबर राहणार हे निश्चित आहे. मात्र आमदार अनिल बाबर, माजी आमदार सदाशिवराव पाटील हे स्वतंत्र पॅनेल उभा करून आव्हान देणार की केवळ पाठिंब्याचे धोरण स्वीकारणार, याचीही उत्सुकता दिसून येत आहे. आजी, माजी आमदारांकडे लक्ष आमदार अनिल बाबर यांचे आर. आर. आबांशी, तर माजी आमदार सदाशिवराव पाटील यांचे खासदार संजयकाकांशी जवळचे संबंध होते. मागील विधानसभा निवडणुकीचा अपवाद वगळता, विसापूर सर्कलमधील २१ गावांतील आबा गटाच्या कार्यकर्त्यांनी अनिल बाबर यांना, तर काका गटाने सदाशिवराव पाटील यांना रसद पुरवली होती. मात्र गतवर्षीच्या अनिल बाबर शिवसेनेतून आमदार झाले, तर संजयकाका भाजपमधून खासदार झाले आहेत. त्यामुळे माजी आमदार सदाशिवराव पाटील खासदारांच्या गटाला रसद देणार, की काँग्रेसच्या माध्यमातून आव्हान निर्माण करणार, याची उत्सुकता आहे. तसेच आमदार अनिल बाबर आबा गटाला पाठबळ देणार, की शिवसेनेच्या माध्यमातून ग्रामपंचायत निवडणुकीत उतरणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.