शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कवठेमहांकाळ नगरपंचायतीत काकांच्या वळचणीला सत्ताधारी- काका गट जोमात आणि सरकार गट कोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 22:38 IST

कवठेमहांकाळ : राजकीय स्वार्थासाठी आणि टक्केवारीच्या लालसेपोटी नगरपंचायतीचे सत्ताधारी खा. संजयकाका पाटील यांच्या वळचणीला जाऊन बसल्याचे चित्र

अर्जुन कर्पे ।लोकमत न्यूज नेटवर्ककवठेमहांकाळ : राजकीय स्वार्थासाठी आणि टक्केवारीच्या लालसेपोटी नगरपंचायतीचे सत्ताधारी खा. संजयकाका पाटील यांच्या वळचणीला जाऊन बसल्याचे चित्र आहे. नगरपंचायतीमध्ये सगरे गट, आबा गट आणि खा. संजयकाका पाटील गट एकत्र आला असून, अजितराव घोरपडे गट बाजूला फेकला गेला आहे. नगरपंचायतीमध्ये आबा व सगरे गटामुळे ‘काका गट जोमात आणि सरकार गट कोमात’ अशी जोरदार चर्चा शहरात रंगली आहे.

दिवंगत आर. आर. पाटील आबा, दिवंगत विजय सगरे आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे (सरकार) गटाची नगरपंचायतीमध्ये सत्ता येऊन या महिन्यात वर्ष पूर्ण होत आहे. परंतु वर्षभराच्या काळात सत्ताधाºयांनी केलेल्या कारभारात विकासापेक्षा कुरघोड्यांचीच चर्चा अधिक रंगली. पहिल्या महिन्यापासूनच आबा गट व सगरे गटात कामांवरून व निधीवरून जुंपली.निवडणुकीवेळी आबा गटाला मते देण्यासाठी व निवडून आणण्यासाठी जनतेने जिवाचे रान केले, मोठा संघर्ष केला. हाणामारीचे प्रकारही घडले. परंतु याच आबा गटातील स्वच्छ प्रतिमा म्हणून निवडून आलेले प्रमुख पदाधिकारी आज टक्केवारीतील व विकास कामातील मलिदा खाण्यात अग्रेसर झाले आहेत, असे आता जनता म्हणत असल्याचे चित्र आहे.

विविध विकास कामांच्या ठेकेदारांना बंद खोलीत घेऊन मॅनेज करणे, टक्केवारी ठरवून घेणे, अन्यथा बिले लांबविणे, धनादेशावर सह्या न करणे असे प्रकार गेले सहा महिने सुरु असल्याची चर्चा शहरातील जनतेत व सुशिक्षित वर्गात सुरू आहे.काका गटाच्या राजकारणातील शिलेदारांनी नगरपंचायतीमध्ये काका गटाची सत्ता प्रस्थापित करण्यासाठी काही डाव खेळले, ते यशस्वी झाले असल्याचे चित्र दिसू लागले आहे. लवकरच नगरपंचायतीमध्ये सत्तेचा नवा राजकीय डाव मांडला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.घोरपडे गट बाजूलाज्या अजितराव घोरपडेंच्या गटावर व जिवावर आबा गट सत्तेत आला, त्या घोरपडे गटालाच नगरपंचायतीमध्ये बाजूला सारण्यात आले आहे.मुख्याधिकारी बदला!विकास कामात टक्केवारी, मलिदा खाता येईना, म्हणूनच अडसर ठरणारे मुख्याधिकारी कैलास चव्हाण यांची बदली करण्यासाठी नगरपंचायतींचे काही पदाधिकारी थेट जिल्हाधिकारी यांच्याकडे जाऊन बसल्याची जोरदार चर्चा आता शहरातील जनतेत सुरु झाली आहे.