शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

कवठेमहांकाळ नगरपंचायतीत काकांच्या वळचणीला सत्ताधारी- काका गट जोमात आणि सरकार गट कोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 22:38 IST

कवठेमहांकाळ : राजकीय स्वार्थासाठी आणि टक्केवारीच्या लालसेपोटी नगरपंचायतीचे सत्ताधारी खा. संजयकाका पाटील यांच्या वळचणीला जाऊन बसल्याचे चित्र

अर्जुन कर्पे ।लोकमत न्यूज नेटवर्ककवठेमहांकाळ : राजकीय स्वार्थासाठी आणि टक्केवारीच्या लालसेपोटी नगरपंचायतीचे सत्ताधारी खा. संजयकाका पाटील यांच्या वळचणीला जाऊन बसल्याचे चित्र आहे. नगरपंचायतीमध्ये सगरे गट, आबा गट आणि खा. संजयकाका पाटील गट एकत्र आला असून, अजितराव घोरपडे गट बाजूला फेकला गेला आहे. नगरपंचायतीमध्ये आबा व सगरे गटामुळे ‘काका गट जोमात आणि सरकार गट कोमात’ अशी जोरदार चर्चा शहरात रंगली आहे.

दिवंगत आर. आर. पाटील आबा, दिवंगत विजय सगरे आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे (सरकार) गटाची नगरपंचायतीमध्ये सत्ता येऊन या महिन्यात वर्ष पूर्ण होत आहे. परंतु वर्षभराच्या काळात सत्ताधाºयांनी केलेल्या कारभारात विकासापेक्षा कुरघोड्यांचीच चर्चा अधिक रंगली. पहिल्या महिन्यापासूनच आबा गट व सगरे गटात कामांवरून व निधीवरून जुंपली.निवडणुकीवेळी आबा गटाला मते देण्यासाठी व निवडून आणण्यासाठी जनतेने जिवाचे रान केले, मोठा संघर्ष केला. हाणामारीचे प्रकारही घडले. परंतु याच आबा गटातील स्वच्छ प्रतिमा म्हणून निवडून आलेले प्रमुख पदाधिकारी आज टक्केवारीतील व विकास कामातील मलिदा खाण्यात अग्रेसर झाले आहेत, असे आता जनता म्हणत असल्याचे चित्र आहे.

विविध विकास कामांच्या ठेकेदारांना बंद खोलीत घेऊन मॅनेज करणे, टक्केवारी ठरवून घेणे, अन्यथा बिले लांबविणे, धनादेशावर सह्या न करणे असे प्रकार गेले सहा महिने सुरु असल्याची चर्चा शहरातील जनतेत व सुशिक्षित वर्गात सुरू आहे.काका गटाच्या राजकारणातील शिलेदारांनी नगरपंचायतीमध्ये काका गटाची सत्ता प्रस्थापित करण्यासाठी काही डाव खेळले, ते यशस्वी झाले असल्याचे चित्र दिसू लागले आहे. लवकरच नगरपंचायतीमध्ये सत्तेचा नवा राजकीय डाव मांडला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.घोरपडे गट बाजूलाज्या अजितराव घोरपडेंच्या गटावर व जिवावर आबा गट सत्तेत आला, त्या घोरपडे गटालाच नगरपंचायतीमध्ये बाजूला सारण्यात आले आहे.मुख्याधिकारी बदला!विकास कामात टक्केवारी, मलिदा खाता येईना, म्हणूनच अडसर ठरणारे मुख्याधिकारी कैलास चव्हाण यांची बदली करण्यासाठी नगरपंचायतींचे काही पदाधिकारी थेट जिल्हाधिकारी यांच्याकडे जाऊन बसल्याची जोरदार चर्चा आता शहरातील जनतेत सुरु झाली आहे.