शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

तारा भवाळकर यांना काकासाहेब खाडीलकर जीवनगौरव पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2017 20:43 IST

सांगली - अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या सांगलीच्या शाखेच्यावतीने यावर्षीपासून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या शहर परिसरातील मान्यवरांना विविध पुरस्कार देऊन गौरविले जाणार आहे. यावर्षी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर, प्रा. वैजनाथ महाजन, सुरेश आठवले व अरविंद लिमये यांचा गौरव केला जाणार आहे, अशी माहिती शाखेचे अध्यक्ष मुकूंद पटवर्धन यांनी शनिवारी ...

सांगली - अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या सांगलीच्या शाखेच्यावतीने यावर्षीपासून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या शहर परिसरातील मान्यवरांना विविध पुरस्कार देऊन गौरविले जाणार आहे. यावर्षी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर, प्रा. वैजनाथ महाजन, सुरेश आठवले व अरविंद लिमये यांचा गौरव केला जाणार आहे, अशी माहिती शाखेचे अध्यक्ष मुकूंद पटवर्धन यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले, डॉ. तारा भवाळकर यांना काकासाहेब खाडीलकर जीवन गौरव पुरस्कार, प्रा. वैजनाथ महाजन यांना आचार्य अत्रे प्रतिभारंग पुरस्कार, सुरेश आठवले यांना प्रा. अरुण पाटील नाट्यतंत्र पुरस्कार, अरविंद लिमये यांना प्रा. दिलीप परदेशी नाट्यरंग पुरस्कार देऊन गौरविले जाणार आहे. रंगभूमीदिनाच्या पूर्वसंध्येला ४ नोव्हेंबर रोजी विष्णू भावे नाट्यगृहात ९७ व्या अखिल भारतीय नाट्य संमेलाचे अध्यक्ष जयंत सावरकर यांच्याहस्ते पुरस्कार प्रदान कार्यक्रम आयोजित केला आहे. तसेच अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर समितीस विशेष सन्मान पुरस्काराने गौरविले जाणार आहे. 

तारा भवाळकर मराठी रंगभूमीवरील सांगली येथील पहिल्या रौप्यपदक विजेत्या महिला कलाकार आहेत. सामाजिक परिवर्तन उपक्रमात त्यांचा नेहमी सहभाग असतो. अनेक नाट्य, एकांकिका लेखन करुन त्याचे सादरीकरण केले आहे. त्यांचा राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय पुरस्काराने सन्मान झाला आहे. वैजनाथ महाजन यांनी अनेक ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे. सामाजिक भान ठेऊन सांगली कारागृहातील कैद्यांना शासनामार्फत शिक्षण दिले आहे. विविध विषयावर लेखन केले आहे. सुरेश आठवले यांनी देवल स्मारक मंदिर, भावे नाट्यगृह, एसटी महामंडळ यांच्या गद्य, संगीत नाटकांकरीता एकांकिका करीत प्रकाश योजनेचे काम केले. अनेक संगीत नाटकांना उत्कृष्ट प्रकाश योजनेचे पारितोषिक मिळविले आहे. अरविंद लिमये यांचे तीन कथा संग्रह प्रकाशित झाले आहेत. अनेक एकांकिकेचे त्यांनी लेखन केले आहे. साप्ताहिक, मासिके, दिवाळी अंकातून त्यांच्या कथा, कविता प्रकाशित झाल्या आहेत. 

यावेळी श्रीनिवास जरंडीकर, चेतना वैद्य, भालचंद्र चितळे, सनित कुलकर्णी, विनायक केळकर, डॉ. दयानंद नाईक, विजय कडणे, प्राचार्य भास्कर ताम्हणकर, प्रसाद बर्वे उपस्थित होते.