शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

कडकनाथ कोंबडी पालन फसवणूक प्रकरणी इस्लामपुरात मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 13:20 IST

मोर्चात राज्यभरातील फसवणूक झालेले गुंतवणूकदार सहभागी झाले होते.

इस्लामपूर (जि. सांगली) : कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायात महारयत कंपनीकडून आठ हजार शेतकऱ्यांची ५०० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा अंदाज असून, कंपनीवर गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी आज इस्लामपूर पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. प्रहार संघटना आणि मराठा क्रांती मोर्चा यांच्यावतीने कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायात फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना बरोबर घेऊन हा मोर्चा काढण्यात आला आहे. मोर्चात राज्यभरातील फसवणूक झालेले गुंतवणूकदार सहभागी झाले होते.

यावेळी मारुती खाडे (सांगरुळ, जि. कोल्हापूर) म्हणाले की, शेतकऱ्यांनी पै पै साठवून या व्यवसायात गुंतवणूक केली. पैसे घेताना मंत्र्यांचा मुलगा हजर होता, सुधीर मोहिते, संदीप मोहिते हे संचालक हजर होते. मग आता याच्याशी आपला संबंध नाही, असे मंत्री कसे म्हणतात?रेश्मा पवार या पारधी महिलेने सांगितले की, सुधीर मोहितेलाही मोक्क्याखाली घाला.

निर्मला पवार म्हणाल्या की, नवरा मेल्यावर पोरांसाठी काहीतरी करूया म्हणून कर्ज काढून हा व्यवसाय सुरू केला. त्यातही तोटा झाला. चोरीचा धंदा सोडून चांगले काही तरी करावे म्हणून पैसे गुंतवले. शेतकरी, पारधी समाजाला फसवणाऱ्या या सर्वांना मोक्का लावा.उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी म्हणाला की, ९ लाख रुपये कर्ज काढून या कडकनाथ कोंबडी पालनात गुंतवले. ते पैसे मंत्र्यांनी परत करावेत. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याशिवाय हलणार नाही.

टॅग्स :Sangliसांगली