शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

जयंतराव-तात्यांचा अबोला संपला..!

By admin | Updated: December 23, 2016 23:47 IST

एकमेकांवर स्तुतिसुमने : जिल्हा बँकेत दोघे एकत्र

सांगली : विधानपरिषदेच्या उमेदवारीवरून पक्षनेतृत्वावर टीका केल्याने जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील चांगलेच चर्चेत आले होते. या टीकेमुळे आमदार जयंत पाटील व दिलीपतात्या पाटील यांच्यात दुरावा निर्माण झाल्याचे चित्र होते. मात्र शुक्रवारी जिल्हा बँकेच्या कार्यक्रमांच्या निमित्ताने दोन्ही नेते एकत्र आले. दिलीपतात्यांनी जयंतरावांची स्तुती करीत मनोमीलनाचे नवे पर्व सुरू केले. चांगला माणूस, चांगला हात मला हवा होता, तो जयंतरावांच्या रूपाने मिळाल्याचे सांगत त्यांना खूश करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. जिल्हा बँकेच्या मुख्यालयातील दुसऱ्या मजल्याच्या नूतनीकरणाचे उद्घाटन शुक्रवारी जयंत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. सुमारे दोन ते अडीच कोटी रुपये खर्चून या मजल्याला ‘कॉर्पोरेट लुक’ देण्यात आला आहे. या उद्घाटनाच्या निमित्ताने जिल्हा बँकेत जयंत पाटील व दिलीपतात्या एकाच व्यासपीठावर आले होते. विधानपरिषदेच्या निवडणुकीवेळी राष्ट्रवादीतून दिलीपतात्या पाटील इच्छुक होते. पण ऐनवेळी पक्षाने शेखर गोरे यांना उमेदवारी दिली. तेव्हा दिलीपतात्यांनी पक्षनेतृत्वावर सडकून टीका केली होती. त्यानंतर इस्लामपूर नगरपालिकेच्या निवडणुकीतूनही त्यांनी अंग काढून घेतले होते. या दोन नेत्यांतील अबोला जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला होता. मात्र शुक्रवारी जिल्हा बँकेत कार्यक्रमांच्या निमित्ताने आलेल्या जयंतरावांना खूश करण्याची संधी दिलीपतात्यांनी सोडली नाही. जयंतराव ‘व्हिजनरी’ नेतृत्व असल्याचा उल्लेख करीत त्यांनी त्यांच्या दूरदृष्टीचे उदाहरण दिले. राजारामबापू साखर कारखान्याचे पहिल्यांदा संचालक झाल्यानंतर जयंत पाटील यांनी साडेतीन लाख रुपयांचा संगणक कारखान्यात बसवला होता. तेव्हा आम्ही इतके पैसे कशाला खर्च करायचे, असे म्हणत होतो. पण संगणक आल्यानंतर जयंतरावांनी संपूर्ण यंत्रणाच आधुनिक केली. राज्यातील बहुतांश साखर कारखाने आज संगणकीकृत झाले आहेत, असेही पाटील म्हणाले. नोटा बंदीमुळे जिल्हा बँक संकटात आहे. पण ही बँक बुडणार आहे, विलीनीकरण होणार आहे, असे कोणी अधिकारी सांगत असेल, तर त्याच्यावर खटला दाखल करू, असे सांगताना दिलीपतात्यांनी पॉज घेतला, पण साहेबांनी आपणाला शांत राहण्यास सांगितल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा बँकेवर आयकरचे छापे पडत आहेत. आमच्या बँकेचीही तपासणी झाली आहे. पण बँकेत कुठलीही भानगड नाही. भानगड झाली असेल तर ती पूर्वी. आता सारे काही व्यवस्थित सुरू आहे. बँकेच्या कारभारावर सर्व संचालक खूश आहेत, हे सांगण्यासही दिलीपतात्या विसरले नाहीत. बँकेच्या नूतनीकरणासाठी आपल्याला चांगला माणूस व चांगला हात हवा होता. जयंतरावांशिवाय चांगला हात कुठे आहे, त्यासाठी त्यांच्याहस्ते उद्घाटन केले, असे त्यांनी सांगितले. दिलीपतात्यांच्या स्तुतीवर अनेकदा जयंतरावांनाही हसू येत होते. त्यांनीही भाषणात दिलीपतात्यांच्या कारभाराचे कौतुक केले.(प्रतिनिधी)दिलीपतात्यांचा चष्मा : जयंतरावांना फिट्टभाषणावेळी दोन हजारच्या नोटेवरील रिझर्व्ह बँकेचे वचन जयंतरावांना वाचून दाखवायचे होते. त्यांनी डायसजवळ बसलेले रामदुर्ग यांचा चष्मा घेतला, पण त्या चष्म्यातूनही त्यांना ते वाचता आले नाही. शेवटी दिलीपतात्यांनी आपला चष्मा जयंतरावांना दिला. तो चष्मा घालताच, ‘बघा, दिलीपतात्यांचा चष्मा मला किती व्यवस्थित बसतो आहे’, असे म्हणताच सभागृहात हशा पिकला. जिल्हा बँकेत येणाऱ्या माणसाला अभिमान वाटावा, असे काम सुरू आहे. बँकेची व्यवस्था आधुनिक असावी, यासाठी दिलीपतात्या प्रयत्न करीत आहेत, असेही जयंतराव म्हणाले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने दोन्ही नेत्यांतील दुरावा संपल्याचे चित्र होते.