शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
3
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
4
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
5
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
6
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
7
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
8
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
9
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
10
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
11
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
12
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
13
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
14
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
15
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
16
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
17
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
18
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
19
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
20
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया

जयंतराव, आमचा लंगोटा जाईल, पण तुमचं काय जाईल ते पहा!

By admin | Updated: January 4, 2017 22:59 IST

सदाभाऊ खोत : आमच्यावरचे आरोप अज्ञानातून

इस्लामपूर : सत्तेच्या माध्यमातून लोकांना वेठीस धरण्याचे दिवस संपलेले आहेत. तुम्ही तुमच्या आणि आम्ही आमच्या जागेवर योग्य आहोत. प्रत्येकाचा ‘कार्यक्रम’ करायची तुम्हाला सवय आहे. मात्र जयंतराव, याद राखा, आमच्याकडे लंगोटा आहे, तेवढाच जाईल. तुमचे काय जाईल, ते मी आत्ताच सांगणार नाही, अशा शब्दात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांना बुधवारी येथे प्रत्युत्तर दिले.जयंत पाटील यांनी खोत यांच्यावर केलेल्या आरोपांना खोत यांनी पत्रकार परिषदेत सडेतोड उत्तरे दिली. ते म्हणाले की, मी राजारामबापूंना मानणारा कार्यकर्ता आहे. जयंतराव राजकारणात येण्यापूर्वी मी बापूंजवळ काम केले आहे. बापूंविषयी मला आजही आदर आहे. बापूंची बरोबरी कोण करीत असेल तर ते योग्य नाही. त्याला माझा विरोधच असेल. बापूंनी हयातीत कोठेही स्वत:चे नाव दिले नाही. वाळवा पंचायत समिती सभागृहाला वसंतदादांचे नाव दिले गेले, मात्र तेव्हा त्यांनी ते बदलले नाही. त्यामुळे जयंतरावांनी केलेला आरोप त्यांचे अज्ञान दाखवून देणारा आहे.ते म्हणाले की, जयंत पाटील यांच्या आशीर्वादाने आणि शिफारशीने मी मंत्री झालो, असे त्यांना वाटत असेल तर त्यांचे अभिनंदन करतो. अजूनही बरेचजण मंत्रीपदासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांच्यासाठीही त्यांनी शब्द टाकला, तर बरे होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माझी ओळख त्यांच्यामुळेच झाली. त्यांचे मुख्यमंत्र्यांशी एवढे चांगले संबंध असतील, तर जयंत पाटील अजून का मंत्री झाले नाहीत, याचे आश्चर्य वाटते. जिल्ह्यात कोणीही आमदार निवडून आला की आपल्यामुळेच आला, असे म्हणायची त्यांना सवय लागली आहे.राजकारण व्यक्तीद्वेषाने भरलेले असू नये, ते समाजहिताचे असावे. सत्ता कायम नसते, हे माझ्यापेक्षा तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे, ही आठवण तुम्हाला राहिली असती तर १५ वर्षात राज्याचा कायापालट झाला असता. एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली नसती. आता भाज्यांचे भाव पडले म्हणतात, मग १५ वर्षात भाज्यांचे भाव पडणार नाहीत अशी व्यवस्था तुम्ही केली होती का? ती केली असती तर शेतकऱ्यांवर वाईट वेळ आली नसती. मला मिळालेले मंत्रीपद कायमचे की तात्पुरते हे मला माहीत नाही. लोकशाहीत तुमच्यासारख्या प्रस्थापितांना धक्का बसू शकतो आणि माझ्यासारखा सामान्य शेतकऱ्याचा मुलगा मंत्री होतो, एवढे मात्र सिध्द झाले. आगामी निवडणुकीत सर्व विरोधकांना टक्कर द्यावी लागणार आहे, हे त्यांनी ओळखले आहे. त्यामुळे त्रासलेला माणूस जशी आदळआपट करतो, तशी अवस्था सध्या जयंतरावांची झाली आहे. राजकारणाचा सातबारा आपला नाही, हे समजले तरी पुरेसे आहे, असे ते म्हणाले. (वार्ताहर)पुढची २५ वर्षेही राजू शेट्टी यांच्यासोबतचखासदार राजू शेट्टींशी पटत नसल्याच्या आरोपावर खोत म्हणाले की, काही नसताना आम्ही दोघे २५ वर्षे एकत्र राहिलो आहोत. आज जनतेचा आशीर्वाद आहे. त्यामुळे पुढची २५ वर्षे दोघे बरोबर राहू. आमच्यामध्ये दुही निर्माण व्हावी म्हणून अनेकांनी देव पाण्यात घातले. त्यांना यश आलेले नाही. माझ्या कामाची पोहोचपावती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. त्यासाठी तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही, असा टोला सदाभाऊ खोत यांनी मारला.संभ्रम निर्माण करण्याचे जुने तंत्रइस्लामपूरच्या निवडणुकीत जनतेने केलेला बदल जयंतरावांना रुचलेला नाही. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचे जुने तंत्र ते वापरत आहेत. मला आमदार, मंत्री करण्यासाठी जेवढी शक्ती खर्च केली, तेवढी शक्ती जवळच्या कार्यकर्त्यासाठी खर्च करून त्याला आमदार केले असते तर, पुण्य लाभले असते, असा टोलाही खोत यांनी लगावला.