शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
3
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
4
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
5
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
6
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
7
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
8
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
9
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
10
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
11
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
12
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
13
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
14
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
15
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
16
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
17
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
18
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
19
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
20
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी

जयंतराव, आमचा लंगोटा जाईल, पण तुमचं काय जाईल ते पहा!

By admin | Updated: January 4, 2017 22:59 IST

सदाभाऊ खोत : आमच्यावरचे आरोप अज्ञानातून

इस्लामपूर : सत्तेच्या माध्यमातून लोकांना वेठीस धरण्याचे दिवस संपलेले आहेत. तुम्ही तुमच्या आणि आम्ही आमच्या जागेवर योग्य आहोत. प्रत्येकाचा ‘कार्यक्रम’ करायची तुम्हाला सवय आहे. मात्र जयंतराव, याद राखा, आमच्याकडे लंगोटा आहे, तेवढाच जाईल. तुमचे काय जाईल, ते मी आत्ताच सांगणार नाही, अशा शब्दात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांना बुधवारी येथे प्रत्युत्तर दिले.जयंत पाटील यांनी खोत यांच्यावर केलेल्या आरोपांना खोत यांनी पत्रकार परिषदेत सडेतोड उत्तरे दिली. ते म्हणाले की, मी राजारामबापूंना मानणारा कार्यकर्ता आहे. जयंतराव राजकारणात येण्यापूर्वी मी बापूंजवळ काम केले आहे. बापूंविषयी मला आजही आदर आहे. बापूंची बरोबरी कोण करीत असेल तर ते योग्य नाही. त्याला माझा विरोधच असेल. बापूंनी हयातीत कोठेही स्वत:चे नाव दिले नाही. वाळवा पंचायत समिती सभागृहाला वसंतदादांचे नाव दिले गेले, मात्र तेव्हा त्यांनी ते बदलले नाही. त्यामुळे जयंतरावांनी केलेला आरोप त्यांचे अज्ञान दाखवून देणारा आहे.ते म्हणाले की, जयंत पाटील यांच्या आशीर्वादाने आणि शिफारशीने मी मंत्री झालो, असे त्यांना वाटत असेल तर त्यांचे अभिनंदन करतो. अजूनही बरेचजण मंत्रीपदासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांच्यासाठीही त्यांनी शब्द टाकला, तर बरे होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माझी ओळख त्यांच्यामुळेच झाली. त्यांचे मुख्यमंत्र्यांशी एवढे चांगले संबंध असतील, तर जयंत पाटील अजून का मंत्री झाले नाहीत, याचे आश्चर्य वाटते. जिल्ह्यात कोणीही आमदार निवडून आला की आपल्यामुळेच आला, असे म्हणायची त्यांना सवय लागली आहे.राजकारण व्यक्तीद्वेषाने भरलेले असू नये, ते समाजहिताचे असावे. सत्ता कायम नसते, हे माझ्यापेक्षा तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे, ही आठवण तुम्हाला राहिली असती तर १५ वर्षात राज्याचा कायापालट झाला असता. एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली नसती. आता भाज्यांचे भाव पडले म्हणतात, मग १५ वर्षात भाज्यांचे भाव पडणार नाहीत अशी व्यवस्था तुम्ही केली होती का? ती केली असती तर शेतकऱ्यांवर वाईट वेळ आली नसती. मला मिळालेले मंत्रीपद कायमचे की तात्पुरते हे मला माहीत नाही. लोकशाहीत तुमच्यासारख्या प्रस्थापितांना धक्का बसू शकतो आणि माझ्यासारखा सामान्य शेतकऱ्याचा मुलगा मंत्री होतो, एवढे मात्र सिध्द झाले. आगामी निवडणुकीत सर्व विरोधकांना टक्कर द्यावी लागणार आहे, हे त्यांनी ओळखले आहे. त्यामुळे त्रासलेला माणूस जशी आदळआपट करतो, तशी अवस्था सध्या जयंतरावांची झाली आहे. राजकारणाचा सातबारा आपला नाही, हे समजले तरी पुरेसे आहे, असे ते म्हणाले. (वार्ताहर)पुढची २५ वर्षेही राजू शेट्टी यांच्यासोबतचखासदार राजू शेट्टींशी पटत नसल्याच्या आरोपावर खोत म्हणाले की, काही नसताना आम्ही दोघे २५ वर्षे एकत्र राहिलो आहोत. आज जनतेचा आशीर्वाद आहे. त्यामुळे पुढची २५ वर्षे दोघे बरोबर राहू. आमच्यामध्ये दुही निर्माण व्हावी म्हणून अनेकांनी देव पाण्यात घातले. त्यांना यश आलेले नाही. माझ्या कामाची पोहोचपावती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. त्यासाठी तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही, असा टोला सदाभाऊ खोत यांनी मारला.संभ्रम निर्माण करण्याचे जुने तंत्रइस्लामपूरच्या निवडणुकीत जनतेने केलेला बदल जयंतरावांना रुचलेला नाही. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचे जुने तंत्र ते वापरत आहेत. मला आमदार, मंत्री करण्यासाठी जेवढी शक्ती खर्च केली, तेवढी शक्ती जवळच्या कार्यकर्त्यासाठी खर्च करून त्याला आमदार केले असते तर, पुण्य लाभले असते, असा टोलाही खोत यांनी लगावला.