शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
2
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
3
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
4
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
5
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
6
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
7
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
8
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
9
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
10
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
11
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
12
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
13
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
14
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
15
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
16
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
17
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
18
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
19
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
20
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

हाय प्रोफाईल कार्यकर्त्यांमुळे जयंत पाटील आले अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 14:57 IST

इस्लामपूर आणि आष्टा पालिकेत आमदार जयंत पाटील यांच्या वर्चस्वाला गळती लागली आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या मतदानाचा टक्का घसरला आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्ते हाय प्रोफाईल राहणे पसंत करीत असल्याने सर्वसामान्य मतदार जयंतरावांपासून दुरावत चालला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ही धोक्याची घंटा ठरण्याची चिन्हे आहेत.

ठळक मुद्देहाय प्रोफाईल कार्यकर्त्यांमुळे जयंत पाटील आले अडचणीतआगामी विधानसभा निवडणुकीसाठी धोक्याची घंटा

अशोक पाटील इस्लामपूर : इस्लामपूर आणि आष्टा पालिकेत आमदार जयंत पाटील यांच्या वर्चस्वाला गळती लागली आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या मतदानाचा टक्का घसरला आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्ते हाय प्रोफाईल राहणे पसंत करीत असल्याने सर्वसामान्य मतदार जयंतरावांपासून दुरावत चालला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ही धोक्याची घंटा ठरण्याची चिन्हे आहेत.जयंत पाटील यांनी इस्लामपूर, आष्टा या शहरांच्या विकासाला गती दिली. ग्रामीण भागातील विकासाला निधी कमी पडू दिला नाही. त्याचबरोबर राजारामबापू उद्योग समूहातील संस्था सक्षम केल्या. या ठिकाणी नोकऱ्या देताना सर्वसामान्य बेरोजगारांचा विचार केला नाही. ज्याचा इस्लामपूर मतदारसंघाशी काहीही संबंध नाही, अशांना अधिकारी पदावर संधी दिली. या अधिकाऱ्यांनी आर्थिक स्वार्थ साधला.

याचाही परिणाम झाल्याचे दिसत आहे.गेल्या चार वर्षात भाजपच्या धोरणांविरोधात जयंत पाटील यांनी आंदोलने केली. इस्लामपूर शहरात आंदोलनावेळी हाय प्रोफाईल पदाधिकारी, कार्यकर्ते आलिशान वाहनांतून येऊन तोंडओळख परेड करण्यापलीकडे त्यांची कार्यपद्धती कधी पुढे सरकली नाही. तसेच काही नेते मतदार संघात आमदार पाटील यांच्या दौऱ्यावेळीच दिसतात. या नेत्यांना त्यांच्या गावातही जनमत नाही. त्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील युवा कार्यकर्त्यांची फळी आ. पाटील यांच्यापासून दुरावत चालली आहे.राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यात पक्ष बांधणीसाठी संपर्क वाढविला आहे. त्याचबरोबर इस्लामपूर मतदार संघावरही आपले लक्ष केंद्रित केले आहे. गावा-गावातील बुथ कमिट्या सक्षम करण्यासाठी बैठका घेण्यावरही आ. पाटील यांनी भर दिला आहे. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत आघाडीचे उमेदवार राजू शेट्टी यांना वाळवा-शिराळ्यात मताधिक्य मिळाले. जोपर्यंत जयंत पाटील यांच्याजवळचे हाय प्रोफाईल कार्यकर्ते जनमानसात मिसळत नाहीत, तोपर्यंत राष्ट्रवादीची ताकद वाढणार नाही, हे मात्र स्पष्टपणे दिसत आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालJayant Patilजयंत पाटीलsangli-pcसांगली