शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शेतकरी संघटनेचे नेते जयपाल फराटे यांचे निधन, आयुष्यभर संघटनेशी एकनिष्ठ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2023 15:45 IST

विदर्भ-मराठवाड्यात असणारी शरद जोशी यांची शेतकरी संघटना ऊस आंदोलनाद्वारे पश्चिम महाराष्ट्रात रुजवण्यात जयपालअण्णांचा मोठा वाटा

कसबे डिग्रज (जि.सांगली) : शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी स्थापना केलेल्या शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष जयपाल सिद्धाप्पा फराटे (वय ८६, रा. मौजे डिग्रज, ता. मिरज) यांचे सोमवारी रात्री उशिरा वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.‘जयपालअण्णा’ या नावाने ते परिचित होते. विदर्भ-मराठवाड्यात असणारी शरद जोशी यांची शेतकरी संघटना ऊस आंदोलनाद्वारे पश्चिम महाराष्ट्रात रुजवण्यात जयपालअण्णांचा मोठा वाटा होता. शेतकरी संघटनेच्या सांगलीतील अधिवेशनात शरद जोशी यांनी त्यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड केली होती. त्या काळात शेतकरी संघटनेच्या माध्यमातून ऊस दर आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचे सर्व श्रेय त्यांना जाते. ऊस दर आंदोलनात मौजे डिग्रज येथे पोलिसांनी आंदोलकांना केलेल्या मारहाणीचा प्रश्न त्यांनी उचलून धरला होता. हे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रात गाजले होते.माजी खासदार राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, वामनराव चटप, पाशा पटेल आदी शेतकरी संघटनेचे नेत्यांमध्ये जयपालअण्णांना मोठा मान होता. संघटनेत ते कार्यरत असताना त्यांना विविध पक्षांकडून पदांची आमिषे दाखविण्यात आली होती, पण शेतकरी संघटनेच्या विचारांपासून ते कधीच दूर गेले नाहीत. आयुष्यभर ते संघटनेशी एकनिष्ठ राहिले.

टॅग्स :Sangliसांगली