शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जैन संघटना करणार ५१०० युवतींचे सक्षमीकरण : इंडिया बुक आॅफ रेकॉर्डमध्ये नोंद होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 00:33 IST

ते म्हणाले की, युवती सक्षमीकरण प्रकल्पातून सांगली जिल्ह्यातील आठवी ते अकरावीमध्ये शिकणाऱ्या ५१०० मुलींना सक्षम बनविण्यासाठी १०० वर्गात १६ ते २२ जानेवारी या कालावधित कार्यशाळा घेण्यात येणार आहे. या उपक्रमाची नोंद इंडिया बुक आॅफ रेकॉर्डने घेतली आहे.

ठळक मुद्दे विक्रमी उपक्रम ; मूल्यवर्धन कार्यक्रमाचा एक लाख विद्यार्थ्यांना लाभ

सांगली : सोशल मीडिया, चित्रपट, पाश्चात्य संस्कृतीचे अतिक्रमण यांचा प्रभाव पडल्याने आठवी ते अकरावी या वयोगटातील मुली, युवती संभ्रमाच्या कुंपणावर असतात. प्रशिक्षणातून त्यांचे मानसिक सक्षमीकरण करण्याचा उपक्रम भारतीय जैन संघटनेने हाती घेतला आहे. याची इंडिया बुक आॅफ रेकॉर्डमध्ये नोंद होणार आहे, अशी माहिती माजी महापौर सुरेश पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले की, युवती सक्षमीकरण प्रकल्पातून सांगली जिल्ह्यातील आठवी ते अकरावीमध्ये शिकणाऱ्या ५१०० मुलींना सक्षम बनविण्यासाठी १०० वर्गात १६ ते २२ जानेवारी या कालावधित कार्यशाळा घेण्यात येणार आहे. या उपक्रमाची नोंद इंडिया बुक आॅफ रेकॉर्डने घेतली आहे. हा उपक्रम भारतीय जैन संघटनेमार्फत २००८ पासून महाराष्टÑ व देशात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. मुली व पालक यांच्यासाठी दोन दिवस कार्यशाळा घेतली जाते. या कार्यशाळेत स्वयंजागृती, संवाद आणि नातेसंबंध, स्वसंरक्षण, निवड व निर्णय, मैत्रभाव अशा अनेक गोष्टींविषयी मार्गदर्शन करण्यात येते. मोहापासून लांब कसे रहायचे, आयुष्यातील उद्दिष्ट कसे गाठायचे, कुटुंबीयांशी कसा सुसंवाद ठेवायचा, याविषयीसुद्धा चर्चा केली जाते. गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमातून मुलींमधील सकारात्मक बदल पालकही अनुभवत आहेत. ज्या वयात मन विचलित होत असते, त्या वयातच मुली व युवतींना मानसिकदृष्ट्या सक्षम करण्याची ही योजना आता गतीने सुरू झाली आहे.पाटील म्हणाले की, २२ ते २४ जानेवारीदरम्यान राज्यस्तरीय मूल्यवर्धनाविषयी कल्पदु्रम क्रीडांगणावर पोस्टर प्रदर्शन होणार आहे. जैन संघटनेच्या माध्यमातून शांतिलाल मुथ्था फाऊंडेशनतर्फे मूल्यवर्धन कार्यक्रमही हाती घेतला आहे.महाराष्टÑातील ६७ हजार शाळांमध्ये तो सुरू आहे. शालेय विद्यार्थी भविष्यात जबाबदार, संवेदनशील व कर्तबगार नागरिक बनावेत म्हणून संविधानातील स्वातंत्र्य, समता व बंधुता ही मूल्ये रुजविण्यात येत आहेत. पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यावेळी अर्चना मुळे उपस्थित होत्या.

 

  • जिल्ह्यातही मूल्यवर्धन कार्यक्रम

सांगली जिल्ह्यातील सर्व दहा तालुक्यांत क्रमा-क्रमाने मूल्यवर्धन उपक्रम राबविताना १६०९ जिल्हा परिषद शाळांमधील सहा हजार शिक्षकांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. पहिली ते पाचवीमधील सर्व तालुक्यातील एक लाख विद्यार्थिनींना प्रतिवर्षी याचा लाभ होत असल्याची माहिती फाऊंडेशनचे सांगली शाखाप्रमुख राजगोंडा पाटील यांनी दिली.

  • सोशल मीडियाचा प्रभाव

प्रशिक्षक दीपक पाटील यांनी सांगितले की, घरातच अनेक मुली असुरक्षित असल्याची बाब प्रशिक्षणातून निदर्शनास आली. अशा मुलींनाही आम्ही मानसिकदृष्ट्या सक्षम बनविले आहे. सोशल मीडिया आणि पाश्चात्य संस्कृतीचा चुकीचा प्रभाव मुलींवर पडत असल्याचे निदर्शनास आले आहे. शास्त्रीय दृष्टिकोनातून आखलेल्या या उपक्रमातून मुलींना योग्य दिशा मिळत आहे.

टॅग्स :SangliसांगलीJain Templeजैन मंदीर