शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

हेलपाटे मारून शेतकरी दमले, ‘सन्मान’ दूरच, पदरी निराशाच

By अविनाश कोळी | Updated: January 6, 2023 18:13 IST

सांगली जिल्ह्यात शेतकरी सन्मान योजनेचे ४ लाख ३६ हजार ६४५ शेतकरी लाभार्थी

अविनाश कोळीसांगली : शेतकरी सन्मान योजनेत सन्मान मिळणे तर दूरच साधी माहितीही व्यवस्थित मिळत नसल्याने लाभार्थींच्या पदरी निराशा येत आहे. अर्जातील त्रुटी दूर करुन पेन्शन पूर्ववत करण्यासाठी हजारो शेतकरी सध्या महसूल व कृषी विभागाचे उंबरठे झिजवून थकले आहेत. योजनेची जबाबदारी नेमकी आहे तरी कुणाची, असा प्रश्न आता शेतकरी उपस्थित करीत आहेत.शेतकरी सन्मान योजनेतील गोंधळ गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. महसूल विभागाकडे सुरुवातीला याचा डाटा होता. शासनाने कृषी विभागाकडे ही योजना हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला, मात्र प्रत्यक्षात योजना अद्याप हस्तांतरित झाली नाही. तरीही दोन्ही विभागात यामुळे गोंधळ निर्माण झाला आहे. महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी शेतकऱ्यांना कृषी विभागाकडे जाण्यास सांगतात, तर कृषी विभागाकडून महसूल विभागाकडे बोट दाखविले जाते. यात शेतकरी फसला आहे.अनेक शेतकऱ्यांना ऑनलाईन केवायसी करण्यास जमत नसल्यामुळे त्यांचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. यासाठी जिल्हा प्रशासनानेच विशेष मोहीम घेऊन अपूर्ण केवायसी पूर्ण करण्याची गरज आहे. अन्यथा अनेक लाभार्थी लाभापासून वंचित राहण्याचा धोका आहे.४,३६,६४५ लाभार्थींची जिल्ह्यात नोंदजिल्ह्यात शेतकरी सन्मान योजनेचे ४ लाख ३६ हजार ६४५ शेतकरी लाभार्थी म्हणून नोंद आहेत. १३ व्या हप्त्यासाठी केवायसी पूर्ण असलेल्या लाभार्थींची संख्या ३ लाख २० हजार ४३१ इतकी आहे.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी