शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
2
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
3
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
4
Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड 
5
योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....
6
देशी ‘कमांडो डॉग्स’ करणार भारतीय सीमेची संरक्षण; रामपूर-मुधोळ हाउंड BSF पथकात दाखल
7
फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात
8
किडनी फेल नाही तर 'या' कारणामुळे झालं सतीश शाहांचं निधन, राजेश कुमारचा खुलासा
9
७ सीटर Kia Carens CNG मध्ये झाली लॉन्च; जाणून घ्या फिचर्स अन् किंमत, Ertiga ला देणार टक्कर
10
Video: ७ महिन्याच्या गर्भवतीनं उचललं तब्बल १४५ किलो वजन; कसा अन् कुणी केला हा पराक्रम?
11
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणीचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला, मृत्यू नेमका कशामुळे?
12
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
13
अस्थिर बाजारात 'सुझलॉन'ची मोठी झेप! तिमाही निकालापूर्वीच भाव वाढला; दुसऱ्यांदा मल्टीबॅगर ठरणार?
14
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
15
‘त्यांनी आपल्या २ मुली पळवल्या तर तुम्ही त्यांच्या १० जणीं घेऊन या’, भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान  
16
अर्जुन तेंडुलकर चमकला; पण 'या' गोलंदाजाने दिला त्रास! रन काढू दिलीच नाही, विकेटही घेतली...
17
महागडे मोबाइल अन् मोठे टीव्हीच हवेत; या दिवाळीत 'प्रीमियम' खरेदीचा नवा पॅटर्न समोर
18
कोण आहे रंजना प्रकाश देसाई?; ज्यांना ८ व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदाची मिळाली जबाबदारी
19
रणबीरच्या 'रामायण'मध्ये विवेक ओबेरॉयचीही भूमिका, अभिनेत्याने दान केलं मानधन; म्हणाला...
20
बाजारात मोठी अस्थिरता! सेंसेक्स-निफ्टी सपाट पातळीवर बंद; महिंद्रा-बजाजसह 'हे' शेअर्स आपटले

..म्हणे 'शक्तिपीठ महामार्ग ठरणार गेमचेंजर', राज्याच्या लॉजिस्टिक धोरणात भलावण

By संतोष भिसे | Updated: August 28, 2024 16:13 IST

नेतेमंडळी ‘आपलंच खरं’ करीत असल्याची शेतकऱ्यांची भावना

संतोष भिसेसांगली : शक्तिपीठ महामार्ग होणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वारंवार दिली आहे, तरीही प्रशासनाने मात्र शक्तिपीठाच्या कामाची प्रक्रिया सुरूच ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्याच्या लॉजिस्टिक धोरणाविषयीचा अध्यादेश सोमवारी (दि. २६) जाहीर झाला, त्यामध्ये या महामार्गामुळे राज्याच्या विकासाला चालना मिळणार असल्याची भलावण करण्यात आली आहे.

या अध्यादेशामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बोलण्यातील फोलपणा पुरता स्पष्ट झाला आहे. हे दोघे कोल्हापुरात आले असता `शक्तिपीठ महामार्ग होणार नाही, महामार्गातून कोल्हापूर वगळले जाईल` अशी ठोस ग्वाही दिली होती. त्यांच्या शब्दाला अधिकृतता येण्यासाठी लेखी आश्वासनाची मागणी कोल्हापूरकरांनी केली, पण तसे आश्वासन दोघांनीही दिले नाही. त्यामुळे महामार्गाला ब्रेक लावण्याविषयी शासन गंभीर नसल्याचे स्पष्ट झाले. त्याला बळकटी देणारा अध्यादेश सोमवारी शासनाच्या उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने जारी केला आहे. हा अध्यादेश राज्याच्या लॉजिस्टिक धोरणाविषयी आहे. राज्यातील दहा हजार एकर क्षेत्रात लॉजिस्टिकसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करणार असल्याचे त्यात म्हटले आहे.लॉजिस्टिकसाठी सार्वजनिक बांधकाम, महसूल, कृषी, उद्योग, नगरविकास, ऊर्जा आदी शासनाचे विभाग एकत्रितरीत्या काम करणार आहेत. प्रत्येक विभागावर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. त्यामध्ये सार्वजनिक बांधकाम व रस्ते विकास महामंडळाकडे शक्तिपीठची जबाबदारी असेल.अध्यादेशात म्हटले आहे की, १२ जिल्ह्यांना जोडणाऱ्या शक्तिपीठ महामार्गामुळे महत्त्वपूर्ण लिंक तयार होणार आहे. नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगल, कोल्हापूर व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये एक्स्प्रेस वे जोडणीचा अभाव होता. शक्तिपीठमुळे ही जोडणी पूर्ण होणार आहे. प्रकल्पामध्ये सहा द्रुतगती मार्गिका आहेत. या सर्व जिल्ह्यांत मालवाहतुकीला चालना मिळणार असून, प्रवासाचा वेळ दहा तासांनी कमी होणार आहे. अंतर्भूत जिल्हे, नवे प्रदेश आणि प्रमुख धार्मिक स्थळे जोडली गेल्याने लॉजिस्टिकची कार्यक्षमता वाढणार आहे. पर्यटनालाही चालना मिळणार आहे. हा महामार्ग महाराष्ट्रासाठी गेम चेंजर ठरू शकेल.

मिरज कॉर्ड लाइनचाही फायदाराज्याच्या लॉजिस्टिक धोरणात लोहमार्गांचाही समावेश आहे. त्यामध्ये मिरज जंक्शनशेजारील दहा किलोमीटर लांबीची कॉर्डलाइन पूर्ण झाल्यानंतर लोहमार्ग वाहतुकीची गती वाढणार असल्याचे नमूद केले आहे.

शासनाच्या हेतुविषयी शंकाशक्तिपीठ महामार्ग होणार नाही असे ठासून सांगणारी नेतेमंडळी मुंबईत परतल्यानंतर मात्र आपलेच खरे करीत असल्याची शंका यामुळे निर्माण झाली आहे. महामार्गासाठी रेखांकन, भूसंपादन आदी प्रक्रिया प्रशासकीय पातळीवर सुरूच आहे.

टॅग्स :Sangliसांगलीkolhapurकोल्हापूरhighwayमहामार्ग