शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
4
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
5
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
6
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
7
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
8
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
9
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
10
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
11
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
12
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
13
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
14
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
15
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
16
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
17
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
18
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
19
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
20
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया

loksabha: प्रतीक पाटील मैदानात उतरले तरी काहीच फरक पडत नाही, जनता माझ्यासोबत - राजू शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2023 13:19 IST

माझ्याविरोधात कोण? याच्याशी काही देणे-घेणे नाही

सांगली : `हातकणंगले मतदारसंघाच्या रिंगणात जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील यांच्या उमेदवारीसाठी चाचपणी सुरू आहे. मात्र त्याचा कोणताही फरक पडणार नाही` असा दावा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला. `माझा मतदार ठरलेला आहे. माझ्याविरोधात कोण? याच्याशी काही देणे-घेणे नाही. प्रतीक किंवा सध्याचे खासदार यांची चिंता मला वाटत नाही` असे ते म्हणाले.शेट्टी म्हणाले, ऊस आंदोलनात प्रकाश आवाडे किंवा अन्य कोणत्याही नेत्याला, कारखान्याला टार्गेट केले नव्हते. शेतकऱ्यांना चार जादा पैसे मिळावेत हीच भूमिका होती. त्याला यश आले. १०० रुपयांवर तोडगा निघाला असला, तरी त्याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल. आंदोलन कुठवर ताणायचे याचे भानही ठेवणे महत्त्वाचे होते.माझ्या आयुष्यातील सर्वाधिक म्हणजे ३८ दिवस चाललेले हे आंदोलन ठरले. महामार्गावर चक्का जाम करण्याच्या दिवशी पोलिसांनी माझ्या कार्यकर्त्यांना उचलले. माझे पंख छाटण्याचे प्रयत्न केले. सकाळी मी मोबाइलवरून आंदोलनाच्या आवाहनाची चित्रफीत प्रसारित केली. त्यासरशी १५ हजारांवर शेतकरी महामार्गावर आले. त्यामुळे लोक सोबतीला असतील तर कोणतेही आंदोलन यशस्वी होते, हे दिसून आले. द्राक्षे किंवा बेदाणा दरासाठीच्या आंदोलनात शेतकरी सोबत येत नाहीत. पण आता दुधासह द्राक्ष व बेदाण्यासाठीही आवाज उठवायचा आहे.कोल्हापुरातील तोडग्यानंतर सांगलीतही आंदोलन सुरू करणार होतो. कारखानादारांनी रविवारी (दि. २६) कडेगावमध्ये बैठक आयोजित केली आहे. तेथील निर्णय पाहून पुढील दिशा ठरवू. त्यांनी कोल्हापूरप्रमाणे पैसे दिले नाहीत, तर कोल्हापुरातील कार्यकर्ते आता रिकामेच आहेत हे लक्षात ठेवावे. कोल्हापूरपेक्षा मागे हटणार नाही हे निश्चित.

पालकमंत्री कशासाठी असतो?शेट्टी म्हणाले, सांगलीच्या कारखान्यांविषयी पालकमंत्र्यांशी बोललो, तर ते या विषयांवर दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांसोबत बोलणार असल्याचे म्हणाले. मग त्यांनी आतापर्यंत काय केले? पालकमंत्री कशासाठी असतो? पोरं एकमेकांच्या उरावर बसून झिंज्या उपटत आहेत. पालकमंत्री काहीच का करत नाही? त्यांचे काही काम नाही का? असा प्रश्न पडतो. ते लक्ष घालणार नसतील तर आम्हाला मध्ये पडावे लागेल. शेतीच्या पाण्यासाठी प्रसंगी कोयनेचा चौथा टप्पा बंद करून समुद्रात सोडले जाणारे ६० टीएमसी पाणी शेतीला वळवावे लागले. वीज विकत घेता येईल, पण पाणी आणता येणार नाही.

दूध व्यवसायात तीन डॉनशेट्टी म्हणाले, दूध व्यवसायात तिघे डॉन आहेत. दुधाचे दर तेच ठरवितात. कोरोनाकाळात जागतिक पातळीवर लोण्याची भाववाढ होण्याच्या अंदाजाने त्यांनी दर ३८ रुपयांवर नेले, पण नुकसान होत असल्याचे पाहून एकदम २६ रुपयांवर आणले. राज्यातील अन्य संस्थांनी मात्र दर स्थिर ठेवले. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. दूध दरासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटणार आहोत.

टॅग्स :Sangliसांगलीlok sabhaलोकसभाRaju Shettyराजू शेट्टीPratik Patilप्रतीक पाटील