शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

loksabha: प्रतीक पाटील मैदानात उतरले तरी काहीच फरक पडत नाही, जनता माझ्यासोबत - राजू शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2023 13:19 IST

माझ्याविरोधात कोण? याच्याशी काही देणे-घेणे नाही

सांगली : `हातकणंगले मतदारसंघाच्या रिंगणात जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील यांच्या उमेदवारीसाठी चाचपणी सुरू आहे. मात्र त्याचा कोणताही फरक पडणार नाही` असा दावा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला. `माझा मतदार ठरलेला आहे. माझ्याविरोधात कोण? याच्याशी काही देणे-घेणे नाही. प्रतीक किंवा सध्याचे खासदार यांची चिंता मला वाटत नाही` असे ते म्हणाले.शेट्टी म्हणाले, ऊस आंदोलनात प्रकाश आवाडे किंवा अन्य कोणत्याही नेत्याला, कारखान्याला टार्गेट केले नव्हते. शेतकऱ्यांना चार जादा पैसे मिळावेत हीच भूमिका होती. त्याला यश आले. १०० रुपयांवर तोडगा निघाला असला, तरी त्याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल. आंदोलन कुठवर ताणायचे याचे भानही ठेवणे महत्त्वाचे होते.माझ्या आयुष्यातील सर्वाधिक म्हणजे ३८ दिवस चाललेले हे आंदोलन ठरले. महामार्गावर चक्का जाम करण्याच्या दिवशी पोलिसांनी माझ्या कार्यकर्त्यांना उचलले. माझे पंख छाटण्याचे प्रयत्न केले. सकाळी मी मोबाइलवरून आंदोलनाच्या आवाहनाची चित्रफीत प्रसारित केली. त्यासरशी १५ हजारांवर शेतकरी महामार्गावर आले. त्यामुळे लोक सोबतीला असतील तर कोणतेही आंदोलन यशस्वी होते, हे दिसून आले. द्राक्षे किंवा बेदाणा दरासाठीच्या आंदोलनात शेतकरी सोबत येत नाहीत. पण आता दुधासह द्राक्ष व बेदाण्यासाठीही आवाज उठवायचा आहे.कोल्हापुरातील तोडग्यानंतर सांगलीतही आंदोलन सुरू करणार होतो. कारखानादारांनी रविवारी (दि. २६) कडेगावमध्ये बैठक आयोजित केली आहे. तेथील निर्णय पाहून पुढील दिशा ठरवू. त्यांनी कोल्हापूरप्रमाणे पैसे दिले नाहीत, तर कोल्हापुरातील कार्यकर्ते आता रिकामेच आहेत हे लक्षात ठेवावे. कोल्हापूरपेक्षा मागे हटणार नाही हे निश्चित.

पालकमंत्री कशासाठी असतो?शेट्टी म्हणाले, सांगलीच्या कारखान्यांविषयी पालकमंत्र्यांशी बोललो, तर ते या विषयांवर दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांसोबत बोलणार असल्याचे म्हणाले. मग त्यांनी आतापर्यंत काय केले? पालकमंत्री कशासाठी असतो? पोरं एकमेकांच्या उरावर बसून झिंज्या उपटत आहेत. पालकमंत्री काहीच का करत नाही? त्यांचे काही काम नाही का? असा प्रश्न पडतो. ते लक्ष घालणार नसतील तर आम्हाला मध्ये पडावे लागेल. शेतीच्या पाण्यासाठी प्रसंगी कोयनेचा चौथा टप्पा बंद करून समुद्रात सोडले जाणारे ६० टीएमसी पाणी शेतीला वळवावे लागले. वीज विकत घेता येईल, पण पाणी आणता येणार नाही.

दूध व्यवसायात तीन डॉनशेट्टी म्हणाले, दूध व्यवसायात तिघे डॉन आहेत. दुधाचे दर तेच ठरवितात. कोरोनाकाळात जागतिक पातळीवर लोण्याची भाववाढ होण्याच्या अंदाजाने त्यांनी दर ३८ रुपयांवर नेले, पण नुकसान होत असल्याचे पाहून एकदम २६ रुपयांवर आणले. राज्यातील अन्य संस्थांनी मात्र दर स्थिर ठेवले. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. दूध दरासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटणार आहोत.

टॅग्स :Sangliसांगलीlok sabhaलोकसभाRaju Shettyराजू शेट्टीPratik Patilप्रतीक पाटील