शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
2
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
3
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
4
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
5
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
6
"सरकार निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचे काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
7
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
8
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
9
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
10
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
11
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
12
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
13
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
14
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
15
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
16
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
17
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री
18
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
19
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
20
Shravan Somvar 2025: श्रावण सोमवारनिमित्त मित्रांना, नातेवाईकांना पाठवा श्लोकरूपी शुभेच्छा संदेश!

loksabha: प्रतीक पाटील मैदानात उतरले तरी काहीच फरक पडत नाही, जनता माझ्यासोबत - राजू शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2023 13:19 IST

माझ्याविरोधात कोण? याच्याशी काही देणे-घेणे नाही

सांगली : `हातकणंगले मतदारसंघाच्या रिंगणात जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील यांच्या उमेदवारीसाठी चाचपणी सुरू आहे. मात्र त्याचा कोणताही फरक पडणार नाही` असा दावा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला. `माझा मतदार ठरलेला आहे. माझ्याविरोधात कोण? याच्याशी काही देणे-घेणे नाही. प्रतीक किंवा सध्याचे खासदार यांची चिंता मला वाटत नाही` असे ते म्हणाले.शेट्टी म्हणाले, ऊस आंदोलनात प्रकाश आवाडे किंवा अन्य कोणत्याही नेत्याला, कारखान्याला टार्गेट केले नव्हते. शेतकऱ्यांना चार जादा पैसे मिळावेत हीच भूमिका होती. त्याला यश आले. १०० रुपयांवर तोडगा निघाला असला, तरी त्याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल. आंदोलन कुठवर ताणायचे याचे भानही ठेवणे महत्त्वाचे होते.माझ्या आयुष्यातील सर्वाधिक म्हणजे ३८ दिवस चाललेले हे आंदोलन ठरले. महामार्गावर चक्का जाम करण्याच्या दिवशी पोलिसांनी माझ्या कार्यकर्त्यांना उचलले. माझे पंख छाटण्याचे प्रयत्न केले. सकाळी मी मोबाइलवरून आंदोलनाच्या आवाहनाची चित्रफीत प्रसारित केली. त्यासरशी १५ हजारांवर शेतकरी महामार्गावर आले. त्यामुळे लोक सोबतीला असतील तर कोणतेही आंदोलन यशस्वी होते, हे दिसून आले. द्राक्षे किंवा बेदाणा दरासाठीच्या आंदोलनात शेतकरी सोबत येत नाहीत. पण आता दुधासह द्राक्ष व बेदाण्यासाठीही आवाज उठवायचा आहे.कोल्हापुरातील तोडग्यानंतर सांगलीतही आंदोलन सुरू करणार होतो. कारखानादारांनी रविवारी (दि. २६) कडेगावमध्ये बैठक आयोजित केली आहे. तेथील निर्णय पाहून पुढील दिशा ठरवू. त्यांनी कोल्हापूरप्रमाणे पैसे दिले नाहीत, तर कोल्हापुरातील कार्यकर्ते आता रिकामेच आहेत हे लक्षात ठेवावे. कोल्हापूरपेक्षा मागे हटणार नाही हे निश्चित.

पालकमंत्री कशासाठी असतो?शेट्टी म्हणाले, सांगलीच्या कारखान्यांविषयी पालकमंत्र्यांशी बोललो, तर ते या विषयांवर दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांसोबत बोलणार असल्याचे म्हणाले. मग त्यांनी आतापर्यंत काय केले? पालकमंत्री कशासाठी असतो? पोरं एकमेकांच्या उरावर बसून झिंज्या उपटत आहेत. पालकमंत्री काहीच का करत नाही? त्यांचे काही काम नाही का? असा प्रश्न पडतो. ते लक्ष घालणार नसतील तर आम्हाला मध्ये पडावे लागेल. शेतीच्या पाण्यासाठी प्रसंगी कोयनेचा चौथा टप्पा बंद करून समुद्रात सोडले जाणारे ६० टीएमसी पाणी शेतीला वळवावे लागले. वीज विकत घेता येईल, पण पाणी आणता येणार नाही.

दूध व्यवसायात तीन डॉनशेट्टी म्हणाले, दूध व्यवसायात तिघे डॉन आहेत. दुधाचे दर तेच ठरवितात. कोरोनाकाळात जागतिक पातळीवर लोण्याची भाववाढ होण्याच्या अंदाजाने त्यांनी दर ३८ रुपयांवर नेले, पण नुकसान होत असल्याचे पाहून एकदम २६ रुपयांवर आणले. राज्यातील अन्य संस्थांनी मात्र दर स्थिर ठेवले. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. दूध दरासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटणार आहोत.

टॅग्स :Sangliसांगलीlok sabhaलोकसभाRaju Shettyराजू शेट्टीPratik Patilप्रतीक पाटील