शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

धनगरवाडा येथील शेतकऱ्यांच्या जमिनीचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार - जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 20:14 IST

Jayant Patil : वाडवडिलांपासून आम्ही ही जमीन कसत असून ती आम्हाला द्यावी व आमचा वर्षानुवर्षे चा प्रलंबित प्रश्न सोडवावा अशी मागणी यावेळी धनगर वाडा येथील शेतकऱ्यांनी केली. यावर जून महिन्यात पुन्हा या विषयावर बैठक घेऊन हा विषय मार्गी लावण्यात येईल, असे पालकमंत्री जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.

ठळक मुद्देशिराळा तहसील कार्यालयात पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मौजे मनदुर (धनगरवाडा) येथील शेतकरी व ग्रामस्थ यांच्या प्रश्नाबाबत बैठक झाली.

 सांगली : वन विभागाकडून विनोबा ग्राम संस्थेस शिराळा तालुक्यातील धनगरवाडा येथील वेळोवेळी हस्तांतरित करण्यात आलेल्या जमिनी या वाटप केलेल्या शेतकऱ्यांच्या नावे लागण्या संदर्भात शेतकऱ्यांची मागणी बऱ्याच काळापासून प्रलंबित आहे. या अनुषंगाने गावठाणासाठी देण्यात आलेली जमीन व शेती कसण्यासाठी देण्यात आलेली जमीन सातबारावर शेतकऱ्यांची नावे लागली आहेत. गट नं 221 अ चे क्षेत्र 166 एकरच्या बाबतीत वन विभागाकडून अभिप्राय मिळणे आवश्यक आहे. तो अभिप्राय वन विभागाने महसूल विभागास दिल्यानंतर तपासणी करुन शेतकऱ्यांच्या नावे जमीनी करण्याची कार्यवाही करण्यात येणार येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले. (The issue of farmers' land in Dhangarwada will be resolved soon - Jayant Patil)

शिराळा तहसील कार्यालयात पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मौजे मनदुर (धनगरवाडा) येथील शेतकरी व ग्रामस्थ यांच्या प्रश्नाबाबत बैठक झाली. यावेळी आमदार मानसिंगराव नाईक, उपवन संरक्षक विजय माने, वाळवा उपविभागीय अधिकारी ओमकार देशमुख, तहसीलदार गणेश शिंदे यांच्यासह धनगरवाडा येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

सदरची जमीन 1965-66 मध्ये वन विभागाकडून निर्वनीकरण करण्यात आली आहे. निर्वनीकरण करण्यात आलेल्या जमिनीपैकी 11.82 हेक्क्टर जमिनीच्या सातबारावरती शेतकऱ्यांची नावे लागली आहेत.परंतु उर्वरित जमीनवर शेतकऱ्यांची नावे लागली नाहीत. ती नावे लागण्यासाठी वन विभागाने तात्काळ अभिप्राय दिल्यानंतर सदरची जमीन पुन्हा वन विभागाच्या नावे कशी लागली या बाबतची तपासणी तातडीने करावी, अशा सूचना पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले आहेत. 

("मनकवड्या चंद्रकांत पाटलांनी तीन गोष्टी स्पष्ट केल्या आहेत…", सचिन सावंतांचा निशाणा)

वन विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालाची तपासणी करुन याबाबतचा प्रलंबित असणारा  १६६ एकर जमीनीचा प्रश्न मार्गी लागेल. त्यानंतरच जमीनवर शेतकऱ्यांची नावे लागतील व बरेच वर्षे प्रलंबित असणारा प्रश्न यामुळे मार्गी लागणार आहे. वाडवडिलांपासून आम्ही ही जमीन कसत असून ती आम्हाला द्यावी व आमचा वर्षानुवर्षे चा प्रलंबित प्रश्न सोडवावा अशी मागणी यावेळी धनगर वाडा येथील शेतकऱ्यांनी केली यावर जून महिन्यात पुन्हा या विषयावर बैठक घेऊन हा विषय मार्गी लावण्यात येईल, असे पालकमंत्री जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीनंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी पालकमंत्री जयंत पाटील यांनी चांदोली अभयारण्य परिसरामध्ये पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने कोणत्या उपाययोजना करण्यात येतील याबाबत ही सविस्तर चर्चा केली . वाळवा तालुक्यात वन विभागाच्या जमिनीवर जंगल वाढ करण्यासाठी येत्या काळात प्रयत्न केले जातील असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलSangliसांगली