शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
6
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
7
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
8
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
9
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
10
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
11
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
12
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
13
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
14
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
15
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
16
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
17
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
18
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
19
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
20
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
Daily Top 2Weekly Top 5

जत मतदारसंघात गाजणार पीक विमा, ‘म्हैसाळ’चा मुद्दा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 23:45 IST

या वर्षाचा खरीप हंगामातील पीकविमा मिळालेला नाही. ‘म्हैसाळ’च्या पाण्याचा प्रश्नही पाच वर्षात गाजला असून, विधानसभा निवडणुकीत याच प्रश्नावर प्रचार रंगणार आहे.

ठळक मुद्दे विधानसभा निवडणूक : रब्बी हंगामातील ६९ गावे नुकसान भरपाईपासून वंचित

गजानन पाटील ।संख : राज्य शासनाने पिकांना व फळबागांना नुकसानभरपाई दिली. जत तालुक्यातील खरीप हंगामातील ५४ गावांना भरपाई मिळाली आहे. शासनाची दप्तरदिरंगाई व आचारसंहितेमुळे दुष्काळी रब्बी हंगामातील ६९ गावांना नुकसानभरपाई मिळालेली नाही. या वर्षाचा खरीप हंगामातील पीकविमा मिळालेला नाही. ‘म्हैसाळ’च्या पाण्याचा प्रश्नही पाच वर्षात गाजला असून, विधानसभा निवडणुकीत याच प्रश्नावर प्रचार रंगणार आहे.

तालुक्यातील खरीप हंगामात ५४ गावे व रब्बी हंगामामध्ये ६९ गावांचा समावेश करण्यात आला आहे. यावर्षी तालुक्यात २६५.४४ मि.मी. पाऊस पडला आहे. गेल्यावर्षी परतीच्या पावसाने सुरुवातीला थोड्याप्रमाणात हजेरी लावल्याने खरिपाच्या पेरण्या झाल्या. नंतर पाऊस न झाल्याने हाती काहीच लागले नाही. हंगाम पूर्णपणे वाया गेला. परतीच्या मान्सून पावसाने दडी दिल्याने रब्बी हंगाम वाया गेला आहे. डाळिंब, द्राक्षे या फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

राज्य सरकारने तालुका दुष्काळी म्हणून जाहीर केला. खरीप हंगामातील पिकासाठी नुकसान भरपाईची घोषणा केली. फळपिकासाठी हेक्टरी १८ हजार व इतर पिकासाठी हेक्टरी सहा हजार ८०० रुपये नुकसानभरपाई दिली आहे. सरकारने घोषणा केल्यानंतर खरीप गावांना नुकसानीचे वाटप केले. मात्र रब्बीचा हंगाम वाया जाऊनसुद्धा नुकसानभरपाई मिळाली नाही. प्रशासनाने महसूल आणि कृषी विभागाचा अहवाल मागवून घेतलेला नाही. हंगाम संपून तीन महिने झाले तरी, शासनाकडून कोणतेही आदेश आलेले नाहीत. सध्या दुष्काळी परिस्थिती आहे. पावसाळा सुरू होऊन साडेतीन महिने संपले तरीसुद्धा पावसाने दडी दिली आहे. खरीप हंगाम वाया गेला आहे.

रब्बी हंगामातील कुंभारी गाव वगळता बाकीच्या ६८ गावांना मे महिन्यात टँकर सुरू होते. सध्या ६३ टॅँकर व १३ चारा छावण्या सुरू आहेत. असे असतानाही रब्बी हंगामातील गावांना दुष्काळी नुकसानभरपाई मिळालेली नाही. जत पूर्व भागाला म्हैसाळ योजनेचे पाणी मिळाले नसल्यामुळे त्या प्रश्नावर शेतकरी आक्रमक आहेत.

रब्बी हंगामातील अमृतवाडी, जत, देवनाळ, मेंढेगिरी, शेगाव, उमराणी, खोजनवाडी, कुडणूर, निगडी खुर्द, बागलवाडी, वळसंग, व्हसपेठ, कराजगी, मायथळ, घोलेश्वर, कुणीकोणूर, संख, खंडनाळ, गोंधळेवाडी, तिकोंडी, करेवाडी, पारधेवस्ती, कोणबगी, मोटेवाडी (को), अंकलगी, उमदी, कुलाळवाडी, कागनरी, आसंगी तुर्क, जालिहाळ खुर्द, सिध्दनाथ, कागनरी, मोटेवाडी (आसंगी), धुळकरवाडी, मोरबगी, जालिहाळ बुद्रुक, दरीबडची, लमाणतांडा (दरीबडची), करजगी, सुसलाद, बेळोंडगी, सोनलगी, माणिकनाळ अक्कळवाडी, बोर्गी खुुर्द, विठ्ठलवाडी, गुुुलगुंजनाळ, बालगाव, हळ्ळी, उटगी, निगडी (बुु), लमाणतांडा (उटगी), गिरगाव, लवंगा, रेवनाळ, काशिलिंगवाडी, कुंभारी, मुचंडी, सिध्दनाथ, जालिहाळ खुर्द, पांढरेवाडी, शेड्याळ, रावळगुुंडवाडी, उंटवाडी, सोरडी, गुड्डापूर, दरीकोणूर, आसंगी ही गावे सवलतींपासून वंचित आहेत. सध्या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात होणार आहे. या निवडणुकीमध्ये शासनाकडून मिळालेल्या दुष्काळी सवलती व पीक विमा या मुद्द्यांची चर्चा रंगणार आहे.

मुख्यमंत्र्यांचे आश्वासनही पोकळचतालुक्यातील सरपंचांच्या कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्र्यांना रब्बी हंगामातील गावांना नुकसान भरपाईची मागणी केलेली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी नुकसानभरपाई देण्याचे नियोजन केले आहे, असे सांगितले होते. परंतु अद्यापही त्याची अंमलबजावणी झालेली नाही.

खरीप हंगामातील पीक विमा अधांतरीबाजरी, मका, मूग, उडीद, तूर, भुईमूग या पिकांचा व डाळिंब फळबागेचा पीकविमा बजाज कंपनीकडे भरला आहे. खरीप हंगाम पावसाअभावी वाया गेला आहे. डाळिंब पीक पाणी नसल्याने व तेल्या रोगामुळे गेले आहे. परंतु पीक विमा मिळालेला नाही. हा मुद्दा निवडणुकीत चर्चेला जाणार आहे.

 

पाण्याअभावी रब्बी हंगाम वाया गेला आहे. पाण्याची व जनावरांच्या चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे. शासनाने रब्बी हंगामातील गावांना नुकसानभरपाई देणे गरजेचे होते.- तुकाराम महाराज, संख

टॅग्स :ElectionनिवडणूकPoliticsराजकारणSangliसांगली