शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

जत मतदारसंघात गाजणार पीक विमा, ‘म्हैसाळ’चा मुद्दा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 23:45 IST

या वर्षाचा खरीप हंगामातील पीकविमा मिळालेला नाही. ‘म्हैसाळ’च्या पाण्याचा प्रश्नही पाच वर्षात गाजला असून, विधानसभा निवडणुकीत याच प्रश्नावर प्रचार रंगणार आहे.

ठळक मुद्दे विधानसभा निवडणूक : रब्बी हंगामातील ६९ गावे नुकसान भरपाईपासून वंचित

गजानन पाटील ।संख : राज्य शासनाने पिकांना व फळबागांना नुकसानभरपाई दिली. जत तालुक्यातील खरीप हंगामातील ५४ गावांना भरपाई मिळाली आहे. शासनाची दप्तरदिरंगाई व आचारसंहितेमुळे दुष्काळी रब्बी हंगामातील ६९ गावांना नुकसानभरपाई मिळालेली नाही. या वर्षाचा खरीप हंगामातील पीकविमा मिळालेला नाही. ‘म्हैसाळ’च्या पाण्याचा प्रश्नही पाच वर्षात गाजला असून, विधानसभा निवडणुकीत याच प्रश्नावर प्रचार रंगणार आहे.

तालुक्यातील खरीप हंगामात ५४ गावे व रब्बी हंगामामध्ये ६९ गावांचा समावेश करण्यात आला आहे. यावर्षी तालुक्यात २६५.४४ मि.मी. पाऊस पडला आहे. गेल्यावर्षी परतीच्या पावसाने सुरुवातीला थोड्याप्रमाणात हजेरी लावल्याने खरिपाच्या पेरण्या झाल्या. नंतर पाऊस न झाल्याने हाती काहीच लागले नाही. हंगाम पूर्णपणे वाया गेला. परतीच्या मान्सून पावसाने दडी दिल्याने रब्बी हंगाम वाया गेला आहे. डाळिंब, द्राक्षे या फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

राज्य सरकारने तालुका दुष्काळी म्हणून जाहीर केला. खरीप हंगामातील पिकासाठी नुकसान भरपाईची घोषणा केली. फळपिकासाठी हेक्टरी १८ हजार व इतर पिकासाठी हेक्टरी सहा हजार ८०० रुपये नुकसानभरपाई दिली आहे. सरकारने घोषणा केल्यानंतर खरीप गावांना नुकसानीचे वाटप केले. मात्र रब्बीचा हंगाम वाया जाऊनसुद्धा नुकसानभरपाई मिळाली नाही. प्रशासनाने महसूल आणि कृषी विभागाचा अहवाल मागवून घेतलेला नाही. हंगाम संपून तीन महिने झाले तरी, शासनाकडून कोणतेही आदेश आलेले नाहीत. सध्या दुष्काळी परिस्थिती आहे. पावसाळा सुरू होऊन साडेतीन महिने संपले तरीसुद्धा पावसाने दडी दिली आहे. खरीप हंगाम वाया गेला आहे.

रब्बी हंगामातील कुंभारी गाव वगळता बाकीच्या ६८ गावांना मे महिन्यात टँकर सुरू होते. सध्या ६३ टॅँकर व १३ चारा छावण्या सुरू आहेत. असे असतानाही रब्बी हंगामातील गावांना दुष्काळी नुकसानभरपाई मिळालेली नाही. जत पूर्व भागाला म्हैसाळ योजनेचे पाणी मिळाले नसल्यामुळे त्या प्रश्नावर शेतकरी आक्रमक आहेत.

रब्बी हंगामातील अमृतवाडी, जत, देवनाळ, मेंढेगिरी, शेगाव, उमराणी, खोजनवाडी, कुडणूर, निगडी खुर्द, बागलवाडी, वळसंग, व्हसपेठ, कराजगी, मायथळ, घोलेश्वर, कुणीकोणूर, संख, खंडनाळ, गोंधळेवाडी, तिकोंडी, करेवाडी, पारधेवस्ती, कोणबगी, मोटेवाडी (को), अंकलगी, उमदी, कुलाळवाडी, कागनरी, आसंगी तुर्क, जालिहाळ खुर्द, सिध्दनाथ, कागनरी, मोटेवाडी (आसंगी), धुळकरवाडी, मोरबगी, जालिहाळ बुद्रुक, दरीबडची, लमाणतांडा (दरीबडची), करजगी, सुसलाद, बेळोंडगी, सोनलगी, माणिकनाळ अक्कळवाडी, बोर्गी खुुर्द, विठ्ठलवाडी, गुुुलगुंजनाळ, बालगाव, हळ्ळी, उटगी, निगडी (बुु), लमाणतांडा (उटगी), गिरगाव, लवंगा, रेवनाळ, काशिलिंगवाडी, कुंभारी, मुचंडी, सिध्दनाथ, जालिहाळ खुर्द, पांढरेवाडी, शेड्याळ, रावळगुुंडवाडी, उंटवाडी, सोरडी, गुड्डापूर, दरीकोणूर, आसंगी ही गावे सवलतींपासून वंचित आहेत. सध्या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात होणार आहे. या निवडणुकीमध्ये शासनाकडून मिळालेल्या दुष्काळी सवलती व पीक विमा या मुद्द्यांची चर्चा रंगणार आहे.

मुख्यमंत्र्यांचे आश्वासनही पोकळचतालुक्यातील सरपंचांच्या कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्र्यांना रब्बी हंगामातील गावांना नुकसान भरपाईची मागणी केलेली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी नुकसानभरपाई देण्याचे नियोजन केले आहे, असे सांगितले होते. परंतु अद्यापही त्याची अंमलबजावणी झालेली नाही.

खरीप हंगामातील पीक विमा अधांतरीबाजरी, मका, मूग, उडीद, तूर, भुईमूग या पिकांचा व डाळिंब फळबागेचा पीकविमा बजाज कंपनीकडे भरला आहे. खरीप हंगाम पावसाअभावी वाया गेला आहे. डाळिंब पीक पाणी नसल्याने व तेल्या रोगामुळे गेले आहे. परंतु पीक विमा मिळालेला नाही. हा मुद्दा निवडणुकीत चर्चेला जाणार आहे.

 

पाण्याअभावी रब्बी हंगाम वाया गेला आहे. पाण्याची व जनावरांच्या चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे. शासनाने रब्बी हंगामातील गावांना नुकसानभरपाई देणे गरजेचे होते.- तुकाराम महाराज, संख

टॅग्स :ElectionनिवडणूकPoliticsराजकारणSangliसांगली