शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपूर : कुणी आरतीसाठी बोलावता का हो! वाळवा-शिराळ्यात नेत्यांची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 00:37 IST

इस्लामपूर, आष्टा, शिराळ्यासह ग्रामीण भागात गणेशोत्सव मंडळांच्या आरतीला आमंत्रित करावे, यासाठी राजकीय नेत्यांनीच आता ‘फिल्डिंग’ लावण्यास सुरुवात केली आहे.

ठळक मुद्देस्वत:च लावली ‘फिल्डिंग’; राजकारण पेटले

अशोक पाटील ।इस्लामपूर : इस्लामपूर, आष्टा, शिराळ्यासह ग्रामीण भागात गणेशोत्सव मंडळांच्या आरतीला आमंत्रित करावे, यासाठी राजकीय नेत्यांनीच आता ‘फिल्डिंग’ लावण्यास सुरुवात केली आहे. काही मंडळांचे पदाधिकारी सर्वच पक्षांच्या नेत्यांना बोलावतात; तर काही नेत्यांचे समर्थक मात्र आपल्याच नेत्याला आरतीला बोलावण्यासाठी आग्रह करत आहेत. त्यामुळे आरतीवरून मंडळांमध्येही राजकारण पेटले आहे.

आमदार जयंत पाटील मंत्रिपदावर असताना इस्लामपुरातील मंडळांच्या आरतीचे कार्यक्रम आटोपण्यासाठी मध्यरात्रीपर्यंतही उपस्थित राहत असत. ग्रामीण भागातही त्यांना निमंत्रणे स्वीकारताना तारेवरची कसरत करावी लागत असे. त्यामुळे इस्लामपूर मतदारसंघातील आरतींना उपस्थित राहण्यासाठी त्यांचे पुत्र प्रतीक आणि राजवर्धन यांच्यावर जबाबदारी देण्यात आली. आता तर सत्ता नसतानाही आमदार पाटील यांच्यासह दोन्ही पुत्रांना मोठ्या प्रमाणावर निमंत्रित केले जात आहे. आमदार पाटील यांचा मात्र सायंकाळी ६ ते १० या वेळेत आरतीला उपस्थिती लावण्यासाठी अधिक प्रयत्न असतो.

सध्या भाजपच्या सत्तेमुळे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, त्यांचे पुत्र सागर खोत, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनाही मोठ्या प्रमाणावर निमंत्रित केले जात आहे. इस्लामपूर परिसरात राहुल महाडिक आणि शिराळा मतदारसंघात सम्राट महाडिक यांचीही आरतीसाठी लक्षणीय उपस्थिती दिसत आहे.

निवडणुकांचे वेध लागल्याने खासदार राजू शेट्टी, जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक व राजवर्धन, सदाभाऊ खोत व त्यांचे पुत्र सागर खोत, नगराध्यक्ष निशिकांत पाटील, नानासाहेब महाडिक, त्यांचे पुत्र राहुल आणि सम्राट महाडिक, माजी आमदार मानसिंगराव नाईक, आमदार शिवाजीराव नाईक, सत्यजित देशमुख यांच्यासह विविध संस्थांचे संस्थापक, पदाधिकाऱ्यांना आरतीसाठी आमंत्रित केले जात आहे. गणेश मंडळांकडून नेत्यांना बोलाविल्यामुळे आरतीचा भाव वाढला आहे.नेता आणि ओवाळणीजयंत पाटील मंत्रिपदावर असताना, आरती झाल्यानंतर शेजारी उभ्या असलेल्या कार्यकर्त्याच्या खिशात जी रक्कम मिळेल, ती ओवाळणीच्या ताटात ठेवत असत. त्यांनी खिशात हात घातला, म्हणून कार्यकर्त्यांच्या आनंदाला पारावार उरत नसे. आता यावेळी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हजारोच्या पटीत ओवाळणी देऊ लागले आहेत. आमदार जयंत पाटील यांनीही मंडळ पाहून ओवाळणीच्या रकमेत वाढ केली आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणSangliसांगली