शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपूर घरकुल योजनेचा बोजवारा

By admin | Updated: July 27, 2015 00:21 IST

हितसंबंधातून कार्यकर्त्यांना वाटप : घरकुल उभे राहिले; परंतु खरे लाभार्थीच वंचित

अशोक पाटील - इस्लामपूर शहरातील दारिद्र्यरेषेखाली असलेले नागरिक आणि ज्यांना राहण्यासाठी घरे नाहीत, अशा गोरगरिबांना वंचित ठेवून, श्रीमंत परंतु हितसंबंधात गुंतलेल्यांनाच घरे वाटप करण्यात आली आहेत. मुळातच घरकुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. बांधलेली घरे असुरक्षितच बनली आहेत. तरीसुध्दा रमाई आवास योजनेंतर्गत घरकुल योजनेचा प्रारंभ म्हणजे सत्ताधारी ताक घुसळून लोणी खात असल्याची चर्चा सर्वसामान्यांतून आहे.शहरात सध्या ४०३ घरकुले तयार आहेत. त्यांचे वाटपही करण्यात आले आहे. महादेवनगर परिसरात बांधलेल्या घरकुलात दहा टक्केही कुटुंबे राहण्यास आली नाहीत. काही घरे ओस पडली आहेत, तर काही घरांचा गैरवापरही केला जातो. याठिकाणी अद्यापही लाईट, पिण्याच्या पाण्याची सोय नाही. काही घरांचे बांधकामही ढासळलेले आहे. याचठिकाणी बांधलेल्या भाजी मार्केटची दुरवस्था झाली आहे.महादेवनगर परिसरातील घरकुलाची दयनीय परिस्थिती असताना, एकात्मिक गृहनिर्माण योजनेंतर्गत कापूसखेड रस्त्यावरील स्मशानभूमीलगत ३९५ घरे उभी राहिली आहेत. या ठिकाणीही जमिनीला धर लागत नसतानाही घरकुले उभी केली आहेत. त्यांचे वाटपही करण्यात आले आहे. यामध्येही बोगस लाभार्थी असलेल्यांची संख्या मोठी आहे, तर काही कुटुंबांनी स्वखर्चाने दुरुस्त्या करून घरकुले ताब्यात घेतली आहेत. यातील काही घरकुले ओस पडली आहेत.बांधलेल्या घरकुलांची अवस्था मेडक्याच्या छपरासारखी असताना, केंद्र शासनाच्या योजनेसाठी १ कोटी ५३ लाख रुपये अनुदान उपलब्ध झाले आहे. या रकमेतून १०२ घरकुले उभी राहणार आहेत. या घरकुलांचेही वाटप नियमबाह्य केल्याची चर्चा आहे. या दारिद्र्यरेषेखालील यादीचा फेरसर्व्हे करावा, अशीही मागणी जोर धरू लागली आहे. एकूणच राजकीय नेत्यांच्या मनमानी कारभारामुळे घरकुल योजनांचा मात्र बोजवारा उडाला आहे.बाबांची गृहनिर्माण संस्था..!उपजिल्हा रुग्णालय परिसरात भाजपचे बाबा सूर्यवंशी यांनी गोरगरिबांसाठी गृहनिर्माण योजना उभी करण्याचा प्रयत्न केला. यासाठी गरीब महिलांकडून लाखो रुपये अनामत रक्कम म्हणून जमाही केले. परंतु सत्ताधारी राष्ट्रवादीने न्यायालयीन बाब करून गृहनिर्माण संस्थेचा भूखंड शासनाच्या ताब्यात दिल्याने, राजकीय नेत्यांच्या वादात गोरगरीब महिलांच्या घराच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे.शहरात सध्या ४०३ घरकुले तयार आहेत. त्यांचे वाटपही करण्यात आले आहे. महादेवनगर परिसरात बांधलेल्या घरकुलात दहा टक्केही कुटुंबे राहण्यास आली नाहीत. परिसरात अद्यापही वीज, पाणी, रस्ते आदी मूलभूत सुविधांची वानवा आहे. कापूसखेड रस्त्यावरील स्मशानभूमीलगतही ३९५ घरकुले उभी आहेत. त्यांचेही वाटप झाले आहे. यामध्ये बोगस लाभार्यांचाच भरणा असल्याची चर्चा आहे.