शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

इरळीत चार दिवस पिण्याचे पाणी नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शिरढोण : कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळीमध्ये चार दिवसांपासून पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना दारोदार हिंडावे लागत आहे. जनावरे पाण्यासाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

शिरढोण : कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळीमध्ये चार दिवसांपासून पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना दारोदार हिंडावे लागत आहे. जनावरे पाण्यासाठी हंबरडा फोडत आहेत. परंतु, प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. सरपंच संजना आठवले यांनी अधिकाऱ्यांना भेटून गावाला पाणी द्या, विजेची सोय करा, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा दिला आहे.

इरळीमध्ये जलस्वराज्य योजनेशिवाय सार्वजनिक पाणी पुरवठा करणारी कोणतीही योजना नाही. गावामधील महावितरणचा डीपी जळाल्यामुळे चार दिवस पाणी मिळालेले नाही. महावितरणकडे नवीन डीपी देण्याची मागणी केली असता, पंधरा दिवसांनी देऊ, असे सांगितले जात आहे. त्यामुळे एवढे दिवस गावातील लोक पाण्यावाचून कसे राहणार, असा प्रश्न विचारून तत्काळ वीज जोडावी, अशी विनंती केली आहे. पिण्याच्या पाण्याचा विषय गंभीर असल्यामुळे आता गप्प बसणार नाही, असे बहुजन समाज पार्टीच्या सरपंच संजना आठवले यांनी सांगितले.

कोरोनाच्या काळामध्ये गावासाठी आंदोलन करावे लागले तरी चालेल, परंतु पाणी लवकरात लवकर मिळवून देणार, असा पवित्रा त्यांनी घेतला असून, तालुक्यातील सर्व कार्यालयांना निवेदन देऊन तातडीने पाणी पुरवठा करण्याची मागणी केली आहे. यावेळी बापू लांडगे, कबीर लांडगे, भानुदास आठवले, विजय वाघमारे, सिद्राम गाडे, महिंद्र गाडे उपस्थित होते.