शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

'रोहयो'वरील भुतांची चौकशी सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 14:31 IST

पलूस तालुक्यातील ब्रम्हनाळमध्ये रोहयोच्या कामांवर चक्क मृत व्यक्ति काम करीत असल्याबाबत पुराव्यानिशी तक्रार दाखल झाल्यानंतर प्रांतांच्या स्तरावर रोहयोवर काम करणाऱ्या भुतांची चौकशी सुरू झाली आहे.

ठळक मुद्देब्रह्मनाळ येथे रोजगार हमी योजनेत सव्वा कोटी रुपयांचा घोटाळा ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार लोकायुक्तांकडेही चौकशीची मागणीलग्नादिवशीच वधुही कामावर असल्याचे नोंदीवरून स्पष्ट

अविनाश कोळी

सांगली,12  : येथील पलूस तालुक्यातील ब्रम्हनाळमध्ये रोहयोच्या कामांवर चक्क मृत व्यक्ति काम करीत असल्याच्या नोंदी झाल्या आहेत. पुराव्यानिशी याबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर आता प्रांतांच्या स्तरावर रोहयोवर काम करणाऱ्या भुतांची चौकशी सुरू झाली आहे.

पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ येथे रोजगार हमी योजनेत सव्वा कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याची तक्रार गावातील गणेश शिंदे, शिवाजी गडदे, मनोजकुमार लोटे व अन्य ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

त्यांनी तक्रारीत म्हटले आहे की, ब्रह्मनाळ येथे रोजगार हमी योजनेत १ कोटी २३ लाख रुपयांचा घोटाळा झाला आहे. बोगस जॉब कार्ड, बोगस व्यक्तींच्या आधाराने हा घोटाळा साकारला आहे. 

खासगी नोकरदार, शिक्षक, सोसायटी कर्मचारी, अंगणवाडी सेविका, शिक्षणासाठी परगावी गेलेले विद्यार्थी इतकेच नव्हे तर मृत लोकांची नावेसुद्धा जॉब कार्डवर नोंदवून कागदपत्रे रंगविण्यात आली आहेत.

मृत लोकांची भुते कामावर येतात, का असा संतप्त सवालही त्यांनी अधिकाºयांना केला आहे. जिल्हाधिकाºयांनी याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असून आता या भुतांचे प्रकरण प्रांतांच्या स्तरावरच तपासले जात आहे.

या प्रकरणाच्या सुनावण्या घेण्यात येत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीमुळे ही चौकशी रेंगाळण्याची शक्यता असल्याने तक्रारदारांनी याचा पाठपुरावा सुरू ठेवला आहे.  पंचायत समिती, जिल्हा परिषद, तहसीलदार, प्रांताधिकारी, रोजगार हमीचे उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याकडे पुराव्यासह तक्रार करण्यात आली आहे. 

लोकायुक्तांकडेही चौकशीची मागणी केली आहे. लग्नादिवशीच वधुही कामावर असल्याचे नोंदीवरून स्पष्ट झाले आहे. म्हणजेच बोगस नोंदीचा कळस गाठून ही कामे करण्यात आल्याने हे प्रकरण संपूर्ण जिल्हाभर लक्षवेधी ठरले आहे.

असा झाला घोटाळा !४१ लाख रुपयांच्या मुरुमाची गौण खनिजची कोणतीही पावती नाही. सुखवाडी थडे ते ब्रह्मनाळ व वखार ते संदीप गावडे हा एकच रस्ता दोन वेळा केला आहे. इतर २१ रस्त्यांच्या कामातही असेच घोटाळे केले आहेत. या रस्त्यांची गुण नियंत्रकांकडून कोणत्याही प्रकाराची पाहणी झालेली नाही. कमी मुरुम टाकून कामे निकृष्ट केली आहेत.

ब्रह्मनाळमधील बजेट वापरुन धनगाव, भिलवडी, खंडोबाचीवाडी, वसगडे येथील कामे दाखवून रक्कम उचलली गेली आहे. यासाठी मजूर दुसºया गावांमध्ये दाखविले आहेत. यासाठी संबंधित गावांकडून मागणी अर्ज व काम सुरू असलेल्या गावांचा परवानगी अर्ज कुठेच दाखविला गेला नाही.

प्रत्येक रस्त्यासाठी समान निधी खर्च केल्याचे दाखविले आहे. १८ लाख मजूर व ६ लाख मटेरियलसाठी  दाखविण्यात आले आहेत. वास्तविक पाहता, प्रत्येक रस्त्याचे बजेट कामानुसार वेगवेगळे असणे गरजेचे आहे. पण समान बजेटमुळे या प्रकरणात घोटाळा झाल्याचे स्पष्ट होते, असे तक्रारदार गावकºयांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारCorruptionभ्रष्टाचार