शहरं
Join us  
Trending Stories
1
जे शिंदेंना मिळालं नाही ते नितीश कुमारांना मिळणार; बिहारमध्ये पुन्हा CM पद, फॉर्म्युला ठरला
2
Accident: राज्यात नऊ महिन्यांत ११ हजार ५३२ मृत्यू; मुंबईत सर्वाधिक अपघात, 'हे' ठिकाण अत्यंत धोकादायक!
3
ट्रम्प यांचा यु-टर्न! अमेरिकेच्या 'या' निर्णयानं भारताला होणार २६ हजार कोटींचा फायदा, 'यांना' मिळणार मोठा लाभ
4
सौदीचे प्रिन्स ७ वर्षानंतर अमेरिका दौऱ्यावर, ट्रम्प यांचा आनंद गगनात मावेना, कारणही आहे खास
5
Chandrayaan 4: भारत चंद्रावर जाणार; तेथील नमुने पृथ्वीवर आणणार, चांद्रयान-४ मोहिमेला सरकारची मंजुरी
6
पत्नीच्या नावे पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये उघडा खातं; दर महिन्याला ₹९२५० चं मिळेल व्याज
7
Mumbai: मिरा-भाईंदर मेट्रो ९ च्या कामावर भीषण अपघात; ६० फुटांवरून पडून सुपरवायझरचा मृत्यू!
8
GenZ च्या आंदोलनामुळे हादरलेल्या नेपाळमध्ये अखेर निवडणुकांची घोषणा, मार्च महिन्यात मतदान
9
"आईला कदाचित फाशीची शिक्षा देतील, पण लक्षात ठेवा..."; शेख हसीना यांच्या मुलाचा गंभीर इशारा
10
Lalu Yadav: राजदच्या पराभवानंतर लालू यांच्या घरात फूट; मुलींनी सोडले घर, तेजस्वी यादव यांच्यावर आरोप
11
BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय? 
12
पालघर साधू हत्याकांडात ज्यांच्यावर गंभीर आरोप केले, त्यांनाच भाजपाने दिला पक्षात प्रवेश
13
पाकिस्तानात जाफर एक्सप्रेस पुन्हा टार्गेटवर; बॉम्बस्फोटाने रेल्वे ट्रॅक उद्ध्वस्त, अनर्थ टळला
14
शेख हसीना यांच्या खटल्याच्या निकालाआधी बांगलादेशात हिंसाचार, पोलिसांकडून आंदोलकांवर गोळीबार
15
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी धनलाभाच्या दृष्टीने शुभ दिवस, प्रवास संभवतात
16
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
17
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
18
विशेष लेख: भीती, घाबरणे, घाबरवणे... आणि कधीही न घाबरणे !
19
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
20
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
Daily Top 2Weekly Top 5

'रोहयो'वरील भुतांची चौकशी सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 14:31 IST

पलूस तालुक्यातील ब्रम्हनाळमध्ये रोहयोच्या कामांवर चक्क मृत व्यक्ति काम करीत असल्याबाबत पुराव्यानिशी तक्रार दाखल झाल्यानंतर प्रांतांच्या स्तरावर रोहयोवर काम करणाऱ्या भुतांची चौकशी सुरू झाली आहे.

ठळक मुद्देब्रह्मनाळ येथे रोजगार हमी योजनेत सव्वा कोटी रुपयांचा घोटाळा ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार लोकायुक्तांकडेही चौकशीची मागणीलग्नादिवशीच वधुही कामावर असल्याचे नोंदीवरून स्पष्ट

अविनाश कोळी

सांगली,12  : येथील पलूस तालुक्यातील ब्रम्हनाळमध्ये रोहयोच्या कामांवर चक्क मृत व्यक्ति काम करीत असल्याच्या नोंदी झाल्या आहेत. पुराव्यानिशी याबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर आता प्रांतांच्या स्तरावर रोहयोवर काम करणाऱ्या भुतांची चौकशी सुरू झाली आहे.

पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ येथे रोजगार हमी योजनेत सव्वा कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याची तक्रार गावातील गणेश शिंदे, शिवाजी गडदे, मनोजकुमार लोटे व अन्य ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

त्यांनी तक्रारीत म्हटले आहे की, ब्रह्मनाळ येथे रोजगार हमी योजनेत १ कोटी २३ लाख रुपयांचा घोटाळा झाला आहे. बोगस जॉब कार्ड, बोगस व्यक्तींच्या आधाराने हा घोटाळा साकारला आहे. 

खासगी नोकरदार, शिक्षक, सोसायटी कर्मचारी, अंगणवाडी सेविका, शिक्षणासाठी परगावी गेलेले विद्यार्थी इतकेच नव्हे तर मृत लोकांची नावेसुद्धा जॉब कार्डवर नोंदवून कागदपत्रे रंगविण्यात आली आहेत.

मृत लोकांची भुते कामावर येतात, का असा संतप्त सवालही त्यांनी अधिकाºयांना केला आहे. जिल्हाधिकाºयांनी याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असून आता या भुतांचे प्रकरण प्रांतांच्या स्तरावरच तपासले जात आहे.

या प्रकरणाच्या सुनावण्या घेण्यात येत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीमुळे ही चौकशी रेंगाळण्याची शक्यता असल्याने तक्रारदारांनी याचा पाठपुरावा सुरू ठेवला आहे.  पंचायत समिती, जिल्हा परिषद, तहसीलदार, प्रांताधिकारी, रोजगार हमीचे उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याकडे पुराव्यासह तक्रार करण्यात आली आहे. 

लोकायुक्तांकडेही चौकशीची मागणी केली आहे. लग्नादिवशीच वधुही कामावर असल्याचे नोंदीवरून स्पष्ट झाले आहे. म्हणजेच बोगस नोंदीचा कळस गाठून ही कामे करण्यात आल्याने हे प्रकरण संपूर्ण जिल्हाभर लक्षवेधी ठरले आहे.

असा झाला घोटाळा !४१ लाख रुपयांच्या मुरुमाची गौण खनिजची कोणतीही पावती नाही. सुखवाडी थडे ते ब्रह्मनाळ व वखार ते संदीप गावडे हा एकच रस्ता दोन वेळा केला आहे. इतर २१ रस्त्यांच्या कामातही असेच घोटाळे केले आहेत. या रस्त्यांची गुण नियंत्रकांकडून कोणत्याही प्रकाराची पाहणी झालेली नाही. कमी मुरुम टाकून कामे निकृष्ट केली आहेत.

ब्रह्मनाळमधील बजेट वापरुन धनगाव, भिलवडी, खंडोबाचीवाडी, वसगडे येथील कामे दाखवून रक्कम उचलली गेली आहे. यासाठी मजूर दुसºया गावांमध्ये दाखविले आहेत. यासाठी संबंधित गावांकडून मागणी अर्ज व काम सुरू असलेल्या गावांचा परवानगी अर्ज कुठेच दाखविला गेला नाही.

प्रत्येक रस्त्यासाठी समान निधी खर्च केल्याचे दाखविले आहे. १८ लाख मजूर व ६ लाख मटेरियलसाठी  दाखविण्यात आले आहेत. वास्तविक पाहता, प्रत्येक रस्त्याचे बजेट कामानुसार वेगवेगळे असणे गरजेचे आहे. पण समान बजेटमुळे या प्रकरणात घोटाळा झाल्याचे स्पष्ट होते, असे तक्रारदार गावकºयांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारCorruptionभ्रष्टाचार