शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

माती परीक्षण घोटाळ्याची चौकशी करा

By admin | Updated: August 1, 2016 00:25 IST

सदाभाऊ खोत : सांगलीच्या कृषी विभागाला अहवाल सादर करण्याचे आदेश; ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल

सांगली/तासगाव : मृद् आरोग्य अभियानांतर्गत माती परीक्षणात झालेल्या लाखो रुपयांच्या घोटाळाप्रकरणी ‘लोकमत’ने रविवारी वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर जिल्ह्यात खळबळ माजली. कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी रविवारी याप्रकरणी सखोल चौकशीचे आदेश कृषी विभागाला दिले आहेत. शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेला अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेनेच हरताळ फासल्याचे चित्र आहे. मातीचे नमुने गोळा करण्यासाठी लोगोसह कापडी पिशवी वापरण्याचे निकष असताना, प्लास्टिकच्या पिशव्या वापरण्यात आल्या. पिशवीची बाजारभावाप्रमाणे किंमत एक रुपयाही नसताना अकरा रुपये किंमत दाखवण्यात आली आहे. अशा एक नव्हे, तर अनेक प्रकारच्या साहित्य खरेदीत गौडबंगाल असल्याची चर्चा होत असून, लाखोंचा भ्रष्टाचार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे मातीच्या आरोग्यालाच भ्रष्टाचाराची कीड लागल्याचे दिसून येत आहे. यावर्षी मे महिन्यापासूनच जिल्हा मृद् सर्व्हेक्षण विभाग आणि कृषी विभागामार्फत माती तपासणीसाठी मोहीम राबवण्यात आली होती. यावर्षी जिल्ह्यातील ६१४ गावांतून ६९ हजार ९०५ मातीच्या नमुन्यांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ६३ हजार १८० नमुने गोळा करण्यात आले आहेत. मृद् सर्वेक्षण विभागाकडून मिळालेल्या नमुन्यापैकी जवळपास अठरा हजार नमुन्यांची तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. तर केवळ सुमारे दोन हजार नमुन्यांचे अहवाल तयार झाले आहेत. भ्रष्टाचाराच्या या प्रकरणावर ‘लोकमत’ने प्रकाशझोत टाकल्यानंतर पणनमंत्र्यांनीही याची दखल घेतली. सांगलीत कृषी अधीक्षकांच्या कार्यालयास भेट दिल्यानंतर त्यांनी याप्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले. त्याबाबतचा अहवाल सादर करण्याची सूचनाही त्यांनी दिली आहे. यावेळी कृषी अधीक्षक उमेश पाटील, जिल्हा उपनिबंधक प्रकाश आष्टेकर, उपविभागीय अधिकारी मकरंद कुलकर्णी उपस्थित होते. मातीचे नमुने तपासणी करून मातीचे आरोग्य सुधारण्यासाठी कृषी विभाग आणि मृद चाचणी विभागाकडून राबवण्यात आलेली मोहीमच संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ‘लोकमत’मध्ये ‘मातीच्या आरोग्याला भ्रष्टाचाराची कीड’ या मथळ्याखाली बातमी प्रसिध्द करण्यात आल्यानंतर जिल्हाभरात खळबळ उडाली. अपवाद वगळता बहुतांश ठिकाणी माती तपासणीची अंमलबजावणीच काटेकोरपणे झाली नसल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी तपासणी अहवालाबाबत शेतकरीच अनभिज्ञ आहेत. दोषींवर कारवाई : शेतकऱ्यांतून अपेक्षा जिल्ह्यातील कृषी विभागाच्या अनेक कामांत नियम धाब्यावर बसवून कामकाज सुरू आहे. माती तपासणीबाबतचे काम हा त्यातीलच एक नमुना आहे. मात्र कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून भ्रष्टाचारी कारभाराबाबत कोणतीच कारवाई गांभीर्याने केली जात नसल्याचे आतापर्यंतचे चित्र होते. आता शेतकऱ्यांचे प्रतिनिधीत्व करणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत हेच कृषी राज्यमंत्री आहेत. त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे किमान यावेळी तरी नि:पक्षपातीपणे तपासणी करुन दोषी असणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.