शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

माती परीक्षण घोटाळ्याची चौकशी करा

By admin | Updated: August 1, 2016 00:25 IST

सदाभाऊ खोत : सांगलीच्या कृषी विभागाला अहवाल सादर करण्याचे आदेश; ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल

सांगली/तासगाव : मृद् आरोग्य अभियानांतर्गत माती परीक्षणात झालेल्या लाखो रुपयांच्या घोटाळाप्रकरणी ‘लोकमत’ने रविवारी वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर जिल्ह्यात खळबळ माजली. कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी रविवारी याप्रकरणी सखोल चौकशीचे आदेश कृषी विभागाला दिले आहेत. शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेला अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेनेच हरताळ फासल्याचे चित्र आहे. मातीचे नमुने गोळा करण्यासाठी लोगोसह कापडी पिशवी वापरण्याचे निकष असताना, प्लास्टिकच्या पिशव्या वापरण्यात आल्या. पिशवीची बाजारभावाप्रमाणे किंमत एक रुपयाही नसताना अकरा रुपये किंमत दाखवण्यात आली आहे. अशा एक नव्हे, तर अनेक प्रकारच्या साहित्य खरेदीत गौडबंगाल असल्याची चर्चा होत असून, लाखोंचा भ्रष्टाचार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे मातीच्या आरोग्यालाच भ्रष्टाचाराची कीड लागल्याचे दिसून येत आहे. यावर्षी मे महिन्यापासूनच जिल्हा मृद् सर्व्हेक्षण विभाग आणि कृषी विभागामार्फत माती तपासणीसाठी मोहीम राबवण्यात आली होती. यावर्षी जिल्ह्यातील ६१४ गावांतून ६९ हजार ९०५ मातीच्या नमुन्यांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ६३ हजार १८० नमुने गोळा करण्यात आले आहेत. मृद् सर्वेक्षण विभागाकडून मिळालेल्या नमुन्यापैकी जवळपास अठरा हजार नमुन्यांची तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. तर केवळ सुमारे दोन हजार नमुन्यांचे अहवाल तयार झाले आहेत. भ्रष्टाचाराच्या या प्रकरणावर ‘लोकमत’ने प्रकाशझोत टाकल्यानंतर पणनमंत्र्यांनीही याची दखल घेतली. सांगलीत कृषी अधीक्षकांच्या कार्यालयास भेट दिल्यानंतर त्यांनी याप्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले. त्याबाबतचा अहवाल सादर करण्याची सूचनाही त्यांनी दिली आहे. यावेळी कृषी अधीक्षक उमेश पाटील, जिल्हा उपनिबंधक प्रकाश आष्टेकर, उपविभागीय अधिकारी मकरंद कुलकर्णी उपस्थित होते. मातीचे नमुने तपासणी करून मातीचे आरोग्य सुधारण्यासाठी कृषी विभाग आणि मृद चाचणी विभागाकडून राबवण्यात आलेली मोहीमच संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ‘लोकमत’मध्ये ‘मातीच्या आरोग्याला भ्रष्टाचाराची कीड’ या मथळ्याखाली बातमी प्रसिध्द करण्यात आल्यानंतर जिल्हाभरात खळबळ उडाली. अपवाद वगळता बहुतांश ठिकाणी माती तपासणीची अंमलबजावणीच काटेकोरपणे झाली नसल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी तपासणी अहवालाबाबत शेतकरीच अनभिज्ञ आहेत. दोषींवर कारवाई : शेतकऱ्यांतून अपेक्षा जिल्ह्यातील कृषी विभागाच्या अनेक कामांत नियम धाब्यावर बसवून कामकाज सुरू आहे. माती तपासणीबाबतचे काम हा त्यातीलच एक नमुना आहे. मात्र कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून भ्रष्टाचारी कारभाराबाबत कोणतीच कारवाई गांभीर्याने केली जात नसल्याचे आतापर्यंतचे चित्र होते. आता शेतकऱ्यांचे प्रतिनिधीत्व करणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत हेच कृषी राज्यमंत्री आहेत. त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे किमान यावेळी तरी नि:पक्षपातीपणे तपासणी करुन दोषी असणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.