शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

हिंदुंच्या ‘डीएनए’मध्ये आक्रमण अन् कत्तली नाहीत; शरद पोंक्षे यांचं विधान

By अविनाश कोळी | Updated: September 4, 2022 14:27 IST

श्री गणपती पंचायतन संस्थानच्यावतीने गणेशोत्सवानिमित्त शरद पोंक्षे यांचे ‘स्वातंत्र्यवीर सावरकर विचार दर्शन’ या विषयावर येथील दरबार हॉलमध्ये व्याख्यान पार पडले.

सांगली : हिंदुराष्ट्र झाले तरच देशात शांतता, सुख व समाधान नांदेल. येथे मुस्लीम, ख्रिश्चन, पारशी सगळेजण सुखाने राहतील. कारण हिंदुंच्या ‘डीएनए’मध्ये आक्रमण नाही, कत्तली नाहीत, असे मत ज्येष्ठ अभिनेते शरद पौंक्षे यांनी व्यक्त केले.

श्री गणपती पंचायतन संस्थानच्यावतीने गणेशोत्सवानिमित्त शरद पोंक्षे यांचे ‘स्वातंत्र्यवीर सावरकर विचार दर्शन’ या विषयावर येथील दरबार हॉलमध्ये व्याख्यान पार पडले. पोंक्षे म्हणाले की, आज कुणाचे हिंदुत्व खरे आणि कुणाचे खोटे अशी चर्चा केली जाते. पण, त्यांना हिंदुत्व म्हणजे काय तेच माहिती नाही. सावरकरांचे हिंदुत्व सोयीनुसार नव्हते. ते स्पष्टवक्ते होते.

वस्तू, मनुष्य, वनस्पती यांना जन्मजात लाभणारे नैसर्गिक गुण म्हणजे धर्म. हिंदू धर्म हा निसर्गधर्म असल्याने त्याला कुणी संस्थापक नाही. नियम, अटी नाहीत. सर्वांना सामावून घेणारा हा धर्म आहे. ते म्हणाले, या देशावर साडे चारशे वर्ष इस्लामी राजवटींनी आक्रमण केले. हजारो मंदिरे उध्वस्त केली, पण ते हिंदुस्थानला संपवू शकले नाहीत. सावरकर म्हणत, मला मुस्लीम, ख्रिश्चनांची भीती वाटत नाही. पण, हिंदुंची भीती वाटते, कारण हिंदूच हिंदुंच्या विरोधात असतात. आपल्या परंपरा व संस्कारांची टिंगल करणारे हिंदुच असतात.

पोंक्षे म्हणाले, सावरकर म्हणत, अतिशय तळागाळापर्यंत गांधींजींनी स्वातंत्र्य हा शब्द पोहोचवला म्हणून आम्हाला क्रांती करणे सोपे गेले. तर गांधीजी म्हणत, या देशावर येणाऱ्या संकटाची चाहूल जर सर्वात आधी कोणाला लागत असेल तर तो माणूस आहे विनायक दामोदर सावरकर. सावरकरांची या देशाला किंमत नाही. पण, जरी किंमत नसली तरी सूर्य हा सूर्य असतो. त्याला कुणी झाकोळू शकत नाही. सावरकरांना कितीही बदनाम केले तरी सावरकर विचार संपवू शकले नाहीत, असे यावेळी सांगली संस्थानचे अधिपती विजयसिंहराजे पटवर्धन यांच्यासह सांगलीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सावरकर, आंबेडकर यांचे कुणी ऐकले नाही-

देश स्वतंत्र झाला तरी देशाची फाळणी झाली. त्यावेळी तात्याराव सावरकर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांगत होते की, जोपर्यंत तिकडचा शेवटचा हिंदू इकडे येत नाही आणि इथला मुस्लिम तिकडे जात नाही तोवर फाळणी यशस्वी होणार नाही. पण, त्यांचे कुणी एकले नाही, असे पौंक्षे म्हणाले.

टॅग्स :Sharad Ponksheशरद पोंक्षेSangliसांगली