शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

हिंदुंच्या ‘डीएनए’मध्ये आक्रमण अन् कत्तली नाहीत; शरद पोंक्षे यांचं विधान

By अविनाश कोळी | Updated: September 4, 2022 14:27 IST

श्री गणपती पंचायतन संस्थानच्यावतीने गणेशोत्सवानिमित्त शरद पोंक्षे यांचे ‘स्वातंत्र्यवीर सावरकर विचार दर्शन’ या विषयावर येथील दरबार हॉलमध्ये व्याख्यान पार पडले.

सांगली : हिंदुराष्ट्र झाले तरच देशात शांतता, सुख व समाधान नांदेल. येथे मुस्लीम, ख्रिश्चन, पारशी सगळेजण सुखाने राहतील. कारण हिंदुंच्या ‘डीएनए’मध्ये आक्रमण नाही, कत्तली नाहीत, असे मत ज्येष्ठ अभिनेते शरद पौंक्षे यांनी व्यक्त केले.

श्री गणपती पंचायतन संस्थानच्यावतीने गणेशोत्सवानिमित्त शरद पोंक्षे यांचे ‘स्वातंत्र्यवीर सावरकर विचार दर्शन’ या विषयावर येथील दरबार हॉलमध्ये व्याख्यान पार पडले. पोंक्षे म्हणाले की, आज कुणाचे हिंदुत्व खरे आणि कुणाचे खोटे अशी चर्चा केली जाते. पण, त्यांना हिंदुत्व म्हणजे काय तेच माहिती नाही. सावरकरांचे हिंदुत्व सोयीनुसार नव्हते. ते स्पष्टवक्ते होते.

वस्तू, मनुष्य, वनस्पती यांना जन्मजात लाभणारे नैसर्गिक गुण म्हणजे धर्म. हिंदू धर्म हा निसर्गधर्म असल्याने त्याला कुणी संस्थापक नाही. नियम, अटी नाहीत. सर्वांना सामावून घेणारा हा धर्म आहे. ते म्हणाले, या देशावर साडे चारशे वर्ष इस्लामी राजवटींनी आक्रमण केले. हजारो मंदिरे उध्वस्त केली, पण ते हिंदुस्थानला संपवू शकले नाहीत. सावरकर म्हणत, मला मुस्लीम, ख्रिश्चनांची भीती वाटत नाही. पण, हिंदुंची भीती वाटते, कारण हिंदूच हिंदुंच्या विरोधात असतात. आपल्या परंपरा व संस्कारांची टिंगल करणारे हिंदुच असतात.

पोंक्षे म्हणाले, सावरकर म्हणत, अतिशय तळागाळापर्यंत गांधींजींनी स्वातंत्र्य हा शब्द पोहोचवला म्हणून आम्हाला क्रांती करणे सोपे गेले. तर गांधीजी म्हणत, या देशावर येणाऱ्या संकटाची चाहूल जर सर्वात आधी कोणाला लागत असेल तर तो माणूस आहे विनायक दामोदर सावरकर. सावरकरांची या देशाला किंमत नाही. पण, जरी किंमत नसली तरी सूर्य हा सूर्य असतो. त्याला कुणी झाकोळू शकत नाही. सावरकरांना कितीही बदनाम केले तरी सावरकर विचार संपवू शकले नाहीत, असे यावेळी सांगली संस्थानचे अधिपती विजयसिंहराजे पटवर्धन यांच्यासह सांगलीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सावरकर, आंबेडकर यांचे कुणी ऐकले नाही-

देश स्वतंत्र झाला तरी देशाची फाळणी झाली. त्यावेळी तात्याराव सावरकर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांगत होते की, जोपर्यंत तिकडचा शेवटचा हिंदू इकडे येत नाही आणि इथला मुस्लिम तिकडे जात नाही तोवर फाळणी यशस्वी होणार नाही. पण, त्यांचे कुणी एकले नाही, असे पौंक्षे म्हणाले.

टॅग्स :Sharad Ponksheशरद पोंक्षेSangliसांगली