शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

हिंदुंच्या ‘डीएनए’मध्ये आक्रमण अन् कत्तली नाहीत; शरद पोंक्षे यांचं विधान

By अविनाश कोळी | Updated: September 4, 2022 14:27 IST

श्री गणपती पंचायतन संस्थानच्यावतीने गणेशोत्सवानिमित्त शरद पोंक्षे यांचे ‘स्वातंत्र्यवीर सावरकर विचार दर्शन’ या विषयावर येथील दरबार हॉलमध्ये व्याख्यान पार पडले.

सांगली : हिंदुराष्ट्र झाले तरच देशात शांतता, सुख व समाधान नांदेल. येथे मुस्लीम, ख्रिश्चन, पारशी सगळेजण सुखाने राहतील. कारण हिंदुंच्या ‘डीएनए’मध्ये आक्रमण नाही, कत्तली नाहीत, असे मत ज्येष्ठ अभिनेते शरद पौंक्षे यांनी व्यक्त केले.

श्री गणपती पंचायतन संस्थानच्यावतीने गणेशोत्सवानिमित्त शरद पोंक्षे यांचे ‘स्वातंत्र्यवीर सावरकर विचार दर्शन’ या विषयावर येथील दरबार हॉलमध्ये व्याख्यान पार पडले. पोंक्षे म्हणाले की, आज कुणाचे हिंदुत्व खरे आणि कुणाचे खोटे अशी चर्चा केली जाते. पण, त्यांना हिंदुत्व म्हणजे काय तेच माहिती नाही. सावरकरांचे हिंदुत्व सोयीनुसार नव्हते. ते स्पष्टवक्ते होते.

वस्तू, मनुष्य, वनस्पती यांना जन्मजात लाभणारे नैसर्गिक गुण म्हणजे धर्म. हिंदू धर्म हा निसर्गधर्म असल्याने त्याला कुणी संस्थापक नाही. नियम, अटी नाहीत. सर्वांना सामावून घेणारा हा धर्म आहे. ते म्हणाले, या देशावर साडे चारशे वर्ष इस्लामी राजवटींनी आक्रमण केले. हजारो मंदिरे उध्वस्त केली, पण ते हिंदुस्थानला संपवू शकले नाहीत. सावरकर म्हणत, मला मुस्लीम, ख्रिश्चनांची भीती वाटत नाही. पण, हिंदुंची भीती वाटते, कारण हिंदूच हिंदुंच्या विरोधात असतात. आपल्या परंपरा व संस्कारांची टिंगल करणारे हिंदुच असतात.

पोंक्षे म्हणाले, सावरकर म्हणत, अतिशय तळागाळापर्यंत गांधींजींनी स्वातंत्र्य हा शब्द पोहोचवला म्हणून आम्हाला क्रांती करणे सोपे गेले. तर गांधीजी म्हणत, या देशावर येणाऱ्या संकटाची चाहूल जर सर्वात आधी कोणाला लागत असेल तर तो माणूस आहे विनायक दामोदर सावरकर. सावरकरांची या देशाला किंमत नाही. पण, जरी किंमत नसली तरी सूर्य हा सूर्य असतो. त्याला कुणी झाकोळू शकत नाही. सावरकरांना कितीही बदनाम केले तरी सावरकर विचार संपवू शकले नाहीत, असे यावेळी सांगली संस्थानचे अधिपती विजयसिंहराजे पटवर्धन यांच्यासह सांगलीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सावरकर, आंबेडकर यांचे कुणी ऐकले नाही-

देश स्वतंत्र झाला तरी देशाची फाळणी झाली. त्यावेळी तात्याराव सावरकर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांगत होते की, जोपर्यंत तिकडचा शेवटचा हिंदू इकडे येत नाही आणि इथला मुस्लिम तिकडे जात नाही तोवर फाळणी यशस्वी होणार नाही. पण, त्यांचे कुणी एकले नाही, असे पौंक्षे म्हणाले.

टॅग्स :Sharad Ponksheशरद पोंक्षेSangliसांगली