शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

Maharashtra Vidhan Sabha 2019 : जतमध्ये बंडखोरांची स्वतंत्र आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 15:16 IST

जत तालुका स्वाभिमानी विकास आघाडीची स्थापना करून भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी यांना उमेदवारी देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे भाजपमधील आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील बंडखोरी चव्हाट्यावर आली आहे. या आघाडीच्या माध्यमातून भाजपचे उमेदवार आमदार विलासराव जगताप व काँग्रेसचे उमेदवार विक्रम सावंत याना शह देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

ठळक मुद्देजतमध्ये बंडखोरांची स्वतंत्र आघाडीनिशिकांत पाटील यांचे बंड

जत : जत तालुका स्वाभिमानी विकास आघाडीची स्थापना करून भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी यांना उमेदवारी देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे भाजपमधील आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील बंडखोरी चव्हाट्यावर आली आहे. या आघाडीच्या माध्यमातून भाजपचे उमेदवार आमदार विलासराव जगताप व काँग्रेसचे उमेदवार विक्रम सावंत याना शह देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.भाजपने आमदार जगताप आणि काँग्रेसने सावंत यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर युती आणि आघाडीतील बंडखोरी उफाळून आली आहे. जत तालुका स्वाभिमानी आघाडीची स्थापना करण्यात आली. या आघाडीचे अपक्ष उमेदवार म्हणून डॉ. आरळी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. दि. ४ आॅक्टोबर रोजी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. बैठकीस बालगाव (ता. जत) येथील गुरुदेवाश्रम मठाचे मठाधिपती अमृतानंद महास्वामी, भाजपचे जत तालुकाध्यक्ष चंद्रकांत गुड्डोडगी, जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण समिती सभापती तम्मनगौडा रवी-पाटील, माजी सभापती प्रकाश जमदाडे, प्रभाकर जाधव, शिवाजीराव ताड, संजय तेली, सोमनिंग बोरामणी व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. बी. ए. धोडमणी, अ‍ॅड. चन्नाप्पा होर्तीकर, सुरेश शिंदे, रमेश पाटील, मन्सूर खतीब, जे. के. माळी, लक्ष्मण एडके, आप्पासाहेब पवार, स्वप्नील शिंदे, शिवाजी शिंदे, जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते बसवराज पाटील, सुभाष पाटील, देयगोंडा बिराजदार, माजी आमदार मधुकर कांबळे, माजी आमदार प्रकाश शेंडगे, वंचित बहुजन आघाडीचे अशोक बन्नेनवार, सी. आर. सांगलीकर, यशवंत हिप्परकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष मुकेश पवार असे प्रमुख ३२ कार्यकर्ते व समर्थक उपस्थित होते.निशिकांत पाटील यांचे बंडइस्लामपूर : इस्लामपूरविधानसभा मतदार संघातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी लढण्याचा निर्धार व्यक्त केल्यानंतर नगराध्यक्ष आणि भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील पक्षातर्फे एक आणि अपक्ष एक असे दोन उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष प्रसाद पाटील यांनी दिली.

ते म्हणाले की, जिल्ह्याला यशस्वी बंडखोरीची परंपरा आहे. शिवाजीराव देशमुख, पतंगराव कदम, संपतराव देशमुख, शिवाजीराव नाईक, विलासराव शिंदे, अजितराव घोरपडे, पृथ्वीराज देशमुख अशा दिग्गज नेत्यांनी बंडखोरी यशस्वी करतच राजकीय कारकीर्द सुरू केली. हा सांगली जिल्ह्याचा इतिहास आहे. या सर्वांनी जनता आणि कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करत बंडखोरी केली होती. हीच परंपरा इस्लामपूर मतदार संघातही जपली जाईल.पाटील म्हणाले की, या मतदार संघातून सलग पाचवेळा भाजपचे उमेदवार लढले आहेत. त्यामुळे नैसर्गिक न्याय तत्त्वानुसार ही जागा भाजपलाच मिळायला हवी होती. मात्र हे घडले नाही. पण गेल्या तीन वर्षांच्या कामातून एकमेकांशी जपलेला जिव्हाळा लढण्याची उमेद वाढविणारा आहे.  यावेळी नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील, धैर्यशील मोेरे, चंद्रकांत पाटील, मधुकर हुबाले उपस्थित होते.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाSangliसांगलीjat-acजाटislampur-acइस्लामपूर