शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
2
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!
3
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'
4
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
5
आव्हान स्वीकारले! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जाहीर चर्चेला राहुल गांधी तयार
6
“शरद पवार, उद्धव ठाकरे यांना आमिष दाखविण्याचा मोदींचा प्रयत्न”; काँग्रेसचा आरोप 
7
बुलेट्स कसाबच्या नव्हत्या तर कोणाच्या? प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना खडा सवाल
8
तीन टप्प्यांत कोणत्या पक्षाने घेतल्या सर्वाधिक सभा? मोदी, शाह, राहुल यांचा झंझावाती प्रचार
9
“मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अन् कार्यकाळही पूर्ण करतील”; पंतप्रधानपदासाठी वयाची अट नाही
10
सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
11
श्रीरामाच्या नावाने सत्ता उपभोगणाऱ्यांच्या काळातच जनतेवर सर्वाधिक अन्याय: प्रियंका गांधी
12
भाजपा सत्तेत आल्यास अमित शाह पंतप्रधान होतील; अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी
13
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
14
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
15
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
16
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
17
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
18
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
19
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
20
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   

सांगलीतील ७०० कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांचे बेमुदत कामबंद आंदोलन

By अशोक डोंबाळे | Published: March 06, 2024 6:20 PM

राज्य सरकारने संपाबाबत तातडीने तोडगा काढला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा

सांगली : महावितरणमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेण्याच्या मागणीसाठी मागील आठवड्यात आंदोलन केले. मात्र, सरकारने दुर्लक्ष केल्याने जिल्ह्यातील ७०० कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बुधवारपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. वीज कर्मचाऱ्यांच्या संपामुळे जिल्ह्यातील वीज यंत्रणा सलाईनवर असून, ५० टक्के काम ठप्प झाले. तसेच शासनाने आंदोलनावर तोडगा न काढल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. दरम्यान, विश्रामबाग येथील महावितरण कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी बुधवारी निदर्शने केली.कंत्राटी कर्मचाऱ्यांना शाश्वत रोजगार आणि नवीन भरती न करता कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत सामावून घेण्याची प्रमुख मागणी आंदोलकांची आहे. महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संघर्ष कृती समितीने गेल्या काही दिवसांपासून आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन केले आहे. या बेमुदत कामबंद आंदोलनामध्ये जिल्ह्यातील सातशेहून अधिक कंत्राटी कर्मचारी सहभागी झाले आहेत.कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनामुळे महावितरणचे कामकाज ५० टक्क्यांहून अधिक ठप्प झाले आहे. महावितरणच्या वीज मंडळाच्या कंत्राटी कामगार संघटनेतर्फे प्रलंबित १६ प्रकारच्या मागण्यांबाबत यापूर्वी पाच टप्प्यांत आंदोलन केले होते. या पाच टप्प्यांतील आंदोलनांमध्ये राज्य सरकारकडून कोणतीच भूमिका घेतली गेली नाही. त्यामुळे राज्यभरात महावितरणचे कंत्राटी कर्मचारी संपावर गेले आहेत.सांगलीतील विश्रामबाग येथील महावितरणच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर वर्कर्स फेडरेशनचे सरचिटणीस कॉ. महेश जोतराव, दत्तात्रय पाटील, कंत्राटी कामगार महासंघाचे गणेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने केली. यावेळी कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला होता. राज्य सरकारने संपाबाबत तातडीने तोडगा काढला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

टॅग्स :Sangliसांगलीmahavitaranमहावितरणagitationआंदोलन