शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

सांगलीतील ७०० कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांचे बेमुदत कामबंद आंदोलन

By अशोक डोंबाळे | Updated: March 6, 2024 18:21 IST

राज्य सरकारने संपाबाबत तातडीने तोडगा काढला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा

सांगली : महावितरणमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेण्याच्या मागणीसाठी मागील आठवड्यात आंदोलन केले. मात्र, सरकारने दुर्लक्ष केल्याने जिल्ह्यातील ७०० कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बुधवारपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. वीज कर्मचाऱ्यांच्या संपामुळे जिल्ह्यातील वीज यंत्रणा सलाईनवर असून, ५० टक्के काम ठप्प झाले. तसेच शासनाने आंदोलनावर तोडगा न काढल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. दरम्यान, विश्रामबाग येथील महावितरण कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी बुधवारी निदर्शने केली.कंत्राटी कर्मचाऱ्यांना शाश्वत रोजगार आणि नवीन भरती न करता कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत सामावून घेण्याची प्रमुख मागणी आंदोलकांची आहे. महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संघर्ष कृती समितीने गेल्या काही दिवसांपासून आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन केले आहे. या बेमुदत कामबंद आंदोलनामध्ये जिल्ह्यातील सातशेहून अधिक कंत्राटी कर्मचारी सहभागी झाले आहेत.कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनामुळे महावितरणचे कामकाज ५० टक्क्यांहून अधिक ठप्प झाले आहे. महावितरणच्या वीज मंडळाच्या कंत्राटी कामगार संघटनेतर्फे प्रलंबित १६ प्रकारच्या मागण्यांबाबत यापूर्वी पाच टप्प्यांत आंदोलन केले होते. या पाच टप्प्यांतील आंदोलनांमध्ये राज्य सरकारकडून कोणतीच भूमिका घेतली गेली नाही. त्यामुळे राज्यभरात महावितरणचे कंत्राटी कर्मचारी संपावर गेले आहेत.सांगलीतील विश्रामबाग येथील महावितरणच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर वर्कर्स फेडरेशनचे सरचिटणीस कॉ. महेश जोतराव, दत्तात्रय पाटील, कंत्राटी कामगार महासंघाचे गणेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने केली. यावेळी कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला होता. राज्य सरकारने संपाबाबत तातडीने तोडगा काढला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

टॅग्स :Sangliसांगलीmahavitaranमहावितरणagitationआंदोलन