शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल टॉवर्सचा उत्पन्नाला झटका

By admin | Updated: June 19, 2014 00:57 IST

नगररचनाचा ढिसाळपणा : संगनमताचा आरोप

सांगली : महापालिकेतील नगररचना व घरपट्टी विभागाच्या मतभेदामुळे मोबाईल टॉवर्सवरील कारवाईला खो बसला आहे. दोन्ही विभागात टॉवर्सच्या संख्येबाबत एकमत नाही की कारवाईबाबत! त्यामुळे पालिका हद्दीत विनापरवाना टॉवर्स उदंड झाले आहेत. या ढिसाळ नियोजनामुळे महापालिकेला दोन ते तीन कोटीच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले असून मोबाईल कंपन्या मात्र कोट्यवधी रुपये मिळवित आहेत. सांगली, मिरजेतील प्रमुख चौक, शासकीय कार्यालये, मुख्य बाजारपेठ अशा महत्त्वाच्या ठिकाणी मोबाईल टॉवर्स दिमाखात उभे आहेत. खासगी जागा, अपार्टमेंट, बंगला, व्यावसायिक इमारतींवर टॉवर्स उभे केले आहेत. त्यातून मोबाईल कंपन्यांना दररोज कोट्यवधीचा महसूल मिळत आहे, पण ज्या महापालिका हद्दीत टॉवर्स उभारले, त्या महापालिकेच्या हाती मात्र काहीच पडलेले नाही. वस्तुत: टॉवर्स एका रात्रीत उभारलेले नाहीत, की ते दिसत नाहीत असेही नाही. मात्र शहरातील इमारतींवर दिमाखात उभे असलेले टॉवर्स व त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाकडे पालिका प्रशासनाने कधी डोळे उघडून पाहिलेच नाही. चार वर्षांपूर्वी तत्कालीन आयुक्त दत्तात्रय मेतके यांनी विनापरवाना टॉवर्सबाबत कंपन्यांवर कारवाईचा धडाका सुरू केला. तेव्हाच खऱ्याअर्थाने टॉवर्सना कर आकारणी लागू असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर राज्यभर अनेक महापालिकांत टॉवर्स सील करण्याची मोहीम उघडली गेली. मोबाईल टॉवर्सवर कारवाई करणारी पहिली महापालिका म्हणून सांगलीचा उल्लेख होतो, पण त्यानंतर मात्र गेल्या वर्षभरात या टॉवर्सबाबत नरमाईचे धोरण घेण्यात आले. मोबाईल टॉवरला परवानगी देण्याची जबाबदारी नगररचना विभागावर आहे. या विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शहरात विनापरवाना पेव फुटले. परिणामी टॉवर उभारण्यासाठी परवाना घेताना पालिकेचे शुल्क, एलबीटी, भाडेवसुलीचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाला. टॉवर असलेल्या इमारतींना व्यावसायिक घरपट्टी लागू होते. नगररचना कार्यालयाकडे ही संख्याच निश्चित नसल्याने अनेक इमारतींना व्यावसायिक घरपट्टी लागू झालेली नाही. त्यातून लाखो रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले. नगररचनातील कर्मचाऱ्यांनी कंपन्यांशी संगनमत केल्याने विनापरवाना टॉवर उभे केले गेल्याचा आरोप नगरसेवकांतून होऊ लागला आहे.