शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

शिष्यवृत्ती परीक्षेत ग्रामीण भागातील विद्यार्थी चमकले, सांगलीतील १५ विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2023 15:54 IST

जिल्ह्यातील ४३६ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले

सांगली : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे जुलै २०२२ मध्ये घेतलेल्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्तीपरीक्षा निकाल बुधवारी जाहीर झाला. जिल्ह्याचा पाचवीचा २८.१५ तर आठवीचा १६.९७ टक्के निकाल लागला.पाचवीचे १२ आणि आठवीचे ९ असे मिळून २१ विद्यार्थ्यांनी राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळवले. ग्रामीण भागातील तब्बल १५ विद्यार्थी राज्य यादीत चमकले.शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल बुधवारी प्रसिद्ध झाल्याचे शिक्षण विभागाने जाहीर केले. पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती (पाचवी) परीक्षेसाठी १८ हजार १२३ विद्यार्थ्यांनी अर्ज भरला होता. त्यापैकी १७ हजार २०७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. पाचवीचा निकाल २८.१५ टक्के लागला असून, राज्याच्या गुणवत्ता यादीत १२ विद्यार्थी चमकले.सीबीएसई शाळेतील पाचवीच्या एका विद्यार्थ्यांनीही राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळविले. याशिवाय जिल्ह्यातील ४३६ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत सर्वाधिक मराठी माध्यमाच्या २४७ विद्यार्थी आहेत. इंग्रजी माध्यमाचे १४, कन्नड माध्यम १०, मराठी-इंग्रजी माध्यमाच्या ९ विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत स्थान मिळविले.आठवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ११ हजार ४०२ विद्यार्थ्यांनी अर्ज भरला होता. त्यापैकी १० हजार ७५३ जणांनी परीक्षा दिली होती.आठवीचा निकाल १६.९७ टक्के लागला असून, राज्य गुणवत्ता यादीत जिल्ह्यातील ९ विद्यार्थी चमकले आहेत. जिल्ह्यातील ४२३ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत अशी माहिती शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी दिली.पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमधील जिल्ह्यातील टॉप टेन विद्यार्थीपाचवी शिष्यवृत्ती परीक्षेतील जिल्हा गुणवत्ता यादीतील पहिले दहा विद्यार्थी  : अग्रजा गणेश गुरव, शाहीद शब्बीर तांबोळी, श्रावणी सचिन सपकाळ, अमय अनिल जाधव, सुजल श्रीकांत कणसे, विश्वभारती विनायक पाटील, अभिजित भगवान जावडे, पार्थ चंद्रकांत पाटील, चिन्मय नामदेव गुरव.आठवी - निर्झरा अनिल गायकवाड, सार्थक महेश पाटील, आदित्य विजय खिलारी, श्रेणिक प्रताप शिंदे, अर्थव विजय खिलारी, अनिकेत शामराव शिंदे, स्वरा श्रीकांत अहंकरी, मधुरा प्रताप पाटील, आयुष्णी विजय जाधव, वैभव दादासाहेब खांडेकर.अग्रजा, शाहीद सहावीअग्रजा गणेश गुरव (९५.९७ टक्के, जि. प. शाळा, आरग, ता. मिरज), शाहीद शब्बीर तांबोळी (९५.९७ टक्के, जि. प. शाळा दहिवडी, ता. तासगाव) या दोन विद्यार्थ्यांचा राज्य गुणवत्ता यादीत सहावा क्रमांक आला आहे.

टॅग्स :SangliसांगलीScholarshipशिष्यवृत्तीexamपरीक्षा