शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

सांगली जिल्ह्यात रब्बीची पेरणी केवळ ३७ टक्केच; पाऊस नसल्यामुळे शेतकरी चिंतेत

By अशोक डोंबाळे | Updated: October 23, 2023 21:03 IST

जून महिन्यात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना खरिपाची पेरणी करता आली नव्हती.

सांगली : जून ते सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात ६८.६ टक्के पाऊस झाला आहे. या आधारावर आगामी रब्बी हंगामात १ लाख ९० हजार ९६१.८ हेक्टरवर रब्बीची पेरणी अपेक्षित असल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाचा आहे. त्यानुसार कृषी विभागाने नियोजन केले आहे. सध्या जिल्ह्यात रब्बीची ३७.२ टक्के पेरणी झाली आहे. ज्वारीची ५२ टक्के तर मका २८ टक्के पेरणी झाली आहे.

जून महिन्यात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना खरिपाची पेरणी करता आली नव्हती. जुलै महिन्याच्या शेवटी बऱ्यापैकी पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. त्यानंतर १५ ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी केली. पावसाळ्याच्या चार महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात जवळपास ८० टक्के पाऊस झाला आहे. धरणांमध्ये पाणीसाठा नसला तरी आतापर्यंत झालेला पाऊस हा मुर स्वरूपाचा असल्याचे मानले जात आहे. त्या अनुषंगाने रब्बी हंगामात १ लाख ९० हजार ९६१.९ हेक्टरवर रब्बीची पेरणी क्षेत्र आहे. यापैकी आतापर्यंत ७१ हजार ६८.३ हेक्टर पेरणी झाली आहे. 

जवळपास ३७.२ टक्के पेरणी झाली आहे. पाऊस कमी झाल्यामुळे रब्बी पेरणीही शंभर टक्के होण्याची शक्यता कमी दिसत आहे. हरभरा, गहू, ज्वारी पिकाच्या पेरणीला गती मिळाली आहे. पेरणीला गती नसल्यामुळे कृषी सेवा केंद्र चालकांकडील ४५ टक्केही बियाणाची विक्री झाली नाही. रासायनिक खताला पेरणीसाठी मागणी केली आहे. पण, ऊसासह अन्य पिकासाठी नदीकाठच्या पिकांसाठी रासायनिक खताची मागणी आहे.

रब्बीचे पेरणी क्षेत्रतालुका क्षेत्र पेरणी क्षेत्र टक्केवारीमिरज २५३५० ९५१७ ३६.१जत ७९५०५ ५०७०१ ६३.८खानापूर ६३३२ ४४७ ७.१वाळवा १३२३१ ३३ ०.२तासगाव ९४७२ १२७५ १३.५आटपाडी १६१७० ४१९९ २६क. मंहाकाळ १८१८२ ४८७० २६.८पलूस ४४६० २६ ०.६

बियाणांची मागणीपीक बियाणे क्विंटलज्वारी ४९३७गहू १००४५मका ३१५०हरभरा १०१३६करडई १२६सूर्यफुल ७५कांदा १६एकूण २८४८५

टॅग्स :Sangliसांगली