शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

‘टेंभू’चा सुधारित प्रस्ताव बासनात...

By admin | Updated: January 13, 2015 00:09 IST

खर्च पोहोचला ३८३२ कोटींवर : केंद्राची मंजुरीही रखडली, योजनेचे भवितव्य अंधारात

अशोक डोंबाळे- सांगली -टेंभू उपसा सिंचन योजनेचा सुधारित खर्च ३८३२ कोटींपर्यंत पोहोचल्याने त्याला प्रशासकीय मंजुरी देण्यासाठी राज्य शासनाकडे २००९-१० मध्ये पाठवलेला प्रस्ताव रखडला आहे. पाच वर्षांत आघाडी सरकारने तो मंजूर केला नसून, युतीचे सरकार तरी सुधारित खर्चास मंजुरी देणार का, असा प्रश्न अधिकाऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. दुसरी सुधारित प्रशासकीय मंजुरी न मिळाल्यामुळे योजनेचे भवितव्य अंध:कारमय असून, केंद्राच्या एआयबीपीत (वेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम) तिचा समावेश होणेही अडचणीचे बनले आहे.टेंभू उपसा सिंचन योजनेचा जन्म भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळातच १९९५-९६ मध्ये झाला. राज्य आर्थिक अडचणीत असतानाही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी कर्जरोखे काढून टेंभू, ताकारी, म्हैसाळ या प्रमुख योजनांची कामे सुरू केली होती. त्यामुळे आज दुष्काळी तालुक्यांतील शिवार हिरवेगार होऊ लागले आहे. या योजनांसाठी १ हजार ४१६ कोटी ५९ लाख रुपयांची मूळ तरतूद होती. युतीच्या काळात धूमधडाक्यात कामे सुरू झाली. साडेचार वर्षांनंतर सत्तांतर झाले आणि टेंभू योजनेची कामे थांबली. क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी, डॉ. भारत पाटणकर यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी-संघटनांनी रेटा लावल्यामुळे पहिल्यांदा २१०६ कोटी ९ लाख रुपयांच्या सुधारित प्रस्तावास प्रशासकीय मान्यता मिळाली. प्रत्यक्षातही योजनांसाठी निधी उपलब्ध झाला. त्यामुळेच टेंभू योजनेच्या मुख्य कालव्याची कामे झाली. सध्या १७२३ कोटींची कामे झाली आहेत. पहिल्या सुधारित तरतुदीपैकी ३८३ कोटी ९ लाख रुपये शिल्लक आहेत. या निधीतून आस्थापना खर्चाचीही तरतूद करायची असल्यामुळे तो निधी येत्या सहा महिन्यांत संपणार आहे. तो संपल्यास टेंभू योजनेच्या देखभालीसह अपूर्ण कामे पूर्ण करण्याचाही प्रश्न गंभीर होणार आहे. हा धोका लक्षात घेऊनच ३८३२ कोटी ९८ लाख रुपये खर्चाचा सुधारित प्रस्ताव २००९-१० मध्ये राज्य शासनाकडे पाठविला होता. दरम्यानच्या काळात केंद्र शासनाच्या एआयबीपीत समावेशासाठीही प्रस्ताव पाठविला होता. केंद्राच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून ३४५० कोटींच्या खर्चास मंजुरी देऊन राज्याकडे तात्काळ प्रस्ताव पाठविला. केंद्राने जशी तत्परता दाखविली, तशी राज्य शासनाने दाखविली नाही. परिणामी सध्या टेंभू योजनेसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. २०१४-१५ च्या अंदाजपत्रकामध्ये १४२ कोटींची तरतूद केली होती. त्यापैकी १०८ कोटींचा निधी मिळाला असून, तोही संपला आहे. बिले दिली नसल्यामुळे सध्या योजनेच्या ठेकेदारांनी कामे करण्यास हात आखडता घेतला आहे.मान्यताकामाचा खर्च आस्थापना खर्चमूळ १९९५-९६११६७.४५ कोटी२४९.१४ कोटीप्रथम सुधारित २०००-०११७०६.५५ कोटी३९९.८७ कोटीद्वितीय सुधारित २००९-१०३१०८.४३ कोटी ७२४.४३ कोटी (मंजुरीच्या प्रतीक्षेत)++मान्यताकामाचा खर्च आस्थापना खर्चमूळ १९९५-९६११६७.४५ कोटी२४९.१४ कोटीप्रथम सुधारित २०००-०११७०६.५५ कोटी३९९.८७ कोटीद्वितीय सुधारित २००९-१०३१०८.४३ कोटी ७२४.४३ कोटी (मंजुरीच्या प्रतीक्षेत)एआयबीपीची मंजुरी मिळण्यास गेल्या वर्षापर्यंत ५० टक्के खर्च झाला नसल्याची अडचण होती, परंतु सध्या टेंभूच्या कामावर आणि आस्थापन खर्चावर १७२३ कोटींचा खर्च झाला आहे. तो केंद्र शासनाने मंजूर केलेल्या तरतुदीपैकी ५० टक्क्यांहून जास्त आहे. यामुळे एआयबीपीमध्ये समावेशातील अडचण दूर झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तथापि या खर्चास राज्य शासनानेही मंजुरी देण्याची गरज आहे.‘टेंभू’चे पाणी सहा तालुक्यात पोहोचलेटेंभू योजनेत कऱ्हाड (जि. सातारा), कडेगाव, खानापूर, तासगाव, आटपाडी, कवठेमहांकाळ (जि. सांगली) आणि सांगोला (जि. सोलापूर) या जिल्ह्यातील ८० हजार ४७२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार होते. त्यापैकी कवठेमहांकाळ तालुका सोडल्यास उर्वरित सर्व तालुक्यांत पाणी पोहोचले असून, पंधरा हजार हेक्टरला पाणी मिळाले आहे. या दुष्काळी तालुक्यांतील शेती हिरवीगार झाली असल्यामुळे टेंभू योजना वरदान ठरली आहे. शासनाने सुधारित प्रशासकीय मंजुरी दिल्यास दुष्काळ संपण्यास मदत होणार आहे.