शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
3
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
4
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
5
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
6
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
9
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
10
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
11
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
12
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
13
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
14
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
15
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
16
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम

‘टेंभू’चा सुधारित प्रस्ताव बासनात...

By admin | Updated: January 13, 2015 00:09 IST

खर्च पोहोचला ३८३२ कोटींवर : केंद्राची मंजुरीही रखडली, योजनेचे भवितव्य अंधारात

अशोक डोंबाळे- सांगली -टेंभू उपसा सिंचन योजनेचा सुधारित खर्च ३८३२ कोटींपर्यंत पोहोचल्याने त्याला प्रशासकीय मंजुरी देण्यासाठी राज्य शासनाकडे २००९-१० मध्ये पाठवलेला प्रस्ताव रखडला आहे. पाच वर्षांत आघाडी सरकारने तो मंजूर केला नसून, युतीचे सरकार तरी सुधारित खर्चास मंजुरी देणार का, असा प्रश्न अधिकाऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. दुसरी सुधारित प्रशासकीय मंजुरी न मिळाल्यामुळे योजनेचे भवितव्य अंध:कारमय असून, केंद्राच्या एआयबीपीत (वेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम) तिचा समावेश होणेही अडचणीचे बनले आहे.टेंभू उपसा सिंचन योजनेचा जन्म भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळातच १९९५-९६ मध्ये झाला. राज्य आर्थिक अडचणीत असतानाही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी कर्जरोखे काढून टेंभू, ताकारी, म्हैसाळ या प्रमुख योजनांची कामे सुरू केली होती. त्यामुळे आज दुष्काळी तालुक्यांतील शिवार हिरवेगार होऊ लागले आहे. या योजनांसाठी १ हजार ४१६ कोटी ५९ लाख रुपयांची मूळ तरतूद होती. युतीच्या काळात धूमधडाक्यात कामे सुरू झाली. साडेचार वर्षांनंतर सत्तांतर झाले आणि टेंभू योजनेची कामे थांबली. क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी, डॉ. भारत पाटणकर यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी-संघटनांनी रेटा लावल्यामुळे पहिल्यांदा २१०६ कोटी ९ लाख रुपयांच्या सुधारित प्रस्तावास प्रशासकीय मान्यता मिळाली. प्रत्यक्षातही योजनांसाठी निधी उपलब्ध झाला. त्यामुळेच टेंभू योजनेच्या मुख्य कालव्याची कामे झाली. सध्या १७२३ कोटींची कामे झाली आहेत. पहिल्या सुधारित तरतुदीपैकी ३८३ कोटी ९ लाख रुपये शिल्लक आहेत. या निधीतून आस्थापना खर्चाचीही तरतूद करायची असल्यामुळे तो निधी येत्या सहा महिन्यांत संपणार आहे. तो संपल्यास टेंभू योजनेच्या देखभालीसह अपूर्ण कामे पूर्ण करण्याचाही प्रश्न गंभीर होणार आहे. हा धोका लक्षात घेऊनच ३८३२ कोटी ९८ लाख रुपये खर्चाचा सुधारित प्रस्ताव २००९-१० मध्ये राज्य शासनाकडे पाठविला होता. दरम्यानच्या काळात केंद्र शासनाच्या एआयबीपीत समावेशासाठीही प्रस्ताव पाठविला होता. केंद्राच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून ३४५० कोटींच्या खर्चास मंजुरी देऊन राज्याकडे तात्काळ प्रस्ताव पाठविला. केंद्राने जशी तत्परता दाखविली, तशी राज्य शासनाने दाखविली नाही. परिणामी सध्या टेंभू योजनेसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. २०१४-१५ च्या अंदाजपत्रकामध्ये १४२ कोटींची तरतूद केली होती. त्यापैकी १०८ कोटींचा निधी मिळाला असून, तोही संपला आहे. बिले दिली नसल्यामुळे सध्या योजनेच्या ठेकेदारांनी कामे करण्यास हात आखडता घेतला आहे.मान्यताकामाचा खर्च आस्थापना खर्चमूळ १९९५-९६११६७.४५ कोटी२४९.१४ कोटीप्रथम सुधारित २०००-०११७०६.५५ कोटी३९९.८७ कोटीद्वितीय सुधारित २००९-१०३१०८.४३ कोटी ७२४.४३ कोटी (मंजुरीच्या प्रतीक्षेत)++मान्यताकामाचा खर्च आस्थापना खर्चमूळ १९९५-९६११६७.४५ कोटी२४९.१४ कोटीप्रथम सुधारित २०००-०११७०६.५५ कोटी३९९.८७ कोटीद्वितीय सुधारित २००९-१०३१०८.४३ कोटी ७२४.४३ कोटी (मंजुरीच्या प्रतीक्षेत)एआयबीपीची मंजुरी मिळण्यास गेल्या वर्षापर्यंत ५० टक्के खर्च झाला नसल्याची अडचण होती, परंतु सध्या टेंभूच्या कामावर आणि आस्थापन खर्चावर १७२३ कोटींचा खर्च झाला आहे. तो केंद्र शासनाने मंजूर केलेल्या तरतुदीपैकी ५० टक्क्यांहून जास्त आहे. यामुळे एआयबीपीमध्ये समावेशातील अडचण दूर झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तथापि या खर्चास राज्य शासनानेही मंजुरी देण्याची गरज आहे.‘टेंभू’चे पाणी सहा तालुक्यात पोहोचलेटेंभू योजनेत कऱ्हाड (जि. सातारा), कडेगाव, खानापूर, तासगाव, आटपाडी, कवठेमहांकाळ (जि. सांगली) आणि सांगोला (जि. सोलापूर) या जिल्ह्यातील ८० हजार ४७२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार होते. त्यापैकी कवठेमहांकाळ तालुका सोडल्यास उर्वरित सर्व तालुक्यांत पाणी पोहोचले असून, पंधरा हजार हेक्टरला पाणी मिळाले आहे. या दुष्काळी तालुक्यांतील शेती हिरवीगार झाली असल्यामुळे टेंभू योजना वरदान ठरली आहे. शासनाने सुधारित प्रशासकीय मंजुरी दिल्यास दुष्काळ संपण्यास मदत होणार आहे.