शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

एकाच रात्री नेर्लेत तीन वाटमाऱ्या करणाऱ्या दोघांना कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 13:56 IST

नेर्ले (ता. वाळवा) येथे राष्ट्रीय महामार्गावर रात्रीच्या वेळेस जबर मारहाण करीत लूटमार केल्या प्रकरणीच्या गुन्ह्यात येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे पहिले जिल्हा न्यायाधीश एस. व्ही. कुलकर्णी यांनी दोघा आरोपींना ३ वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

ठळक मुद्दे मोबाईल, रोकड केली होती लंपासन्यायाधीश म्हणून कारकीर्दीतील शेवटची शिक्षा...१३ साक्षीदारांच्या साक्षी ठरल्या महत्त्वाच्या

इस्लामपूर , दि. २८ : नेर्ले (ता. वाळवा) येथे राष्ट्रीय महामार्गावर रात्रीच्या वेळेस जबर मारहाण करीत लूटमार केल्या प्रकरणीच्या गुन्ह्यात येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे पहिले जिल्हा न्यायाधीश एस. व्ही. कुलकर्णी यांनी दोघा आरोपींना ३ वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

अविनाश ऊर्फ डुबरंग कांतिलाल काळे (वय २५, रा. डिगीयासगाव, जि. औरंगाबाद) व ज्ञानेश्वर ऊर्फ देण्या परतान्या काळे (३0, रा. किल्लेमच्छिंद्रगड, ता. वाळवा) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. दोघांनी दंडाची रक्कम न भरल्यास त्यांना १५ दिवस साधी कैद भोगावी लागणार आहे.

दोन वर्षांपूर्वी तालुक्यामध्ये चोरट्यांचा सुळसुळाट झाला होता. महामार्गावरील लूटमार, मारहाणीसह विविध ठिकाणी चोरीच्या घटना घडत होत्या. अशाच काळात वरील दोघा आरोपींनी १५ जून २0१५ च्या रात्री ९.३0 च्या सुमारास कासेगाव येथे जेवण करुन नेर्ले येथे मोटारसायकलवरुन सेवा रस्त्याने परतणाऱ्या सचिन पांडुरंग पाटील व त्याचा चुलत भाऊ नीलेश पाटील, मित्र समाधान साळुंखे यांना अडवले.

दुचाकी चालविणाऱ्या नीलेश याच्या तोंडावर काठीचा जोरदार तडाखा लावून त्यांना खाली पाडले. त्यांच्याकडील मोबाईल व रोख रक्कम काढून घेऊन मारहाण केली. त्याचदिवशी याच रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या राहुल रामचंद्र निकम, शशिकांत बर्गे यांनादेखील देसाई मळा परिसरात आरोपींनी लोखंडी गज व गाठीने मारहाण करुन त्यांच्याकडील मोबाईल व रोकड चोरली होती.

याप्रकरणी सचिन पांडुरंग पाटील (रा. नेर्ले) यांनी कासेगाव पोलिसांत फिर्याद दिली होती. खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे १३ साक्षीदार तपासण्यात आले. वैद्यकीय अधिकारी, तपास अधिकारी, सहायक पोलिस निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या.

अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील रणजित पाटील यांनी, महामार्गावर दहशत माजवून अनेक जबरी चोºया करणाºया या आरोपींना कठोर शिक्षा द्यावी, असा युक्तिवाद केला. पोलिस हवालदार एम. के. गुरव, बी. डी. पवार, चंद्रकांत शितोळे यांनी खटल्याकामी सरकार पक्षास मदत केली.

शेवटची शिक्षा...इस्लामपूरच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात पहिले जिल्हा न्यायाधीश म्हणून जबाबदारी पार पाडणारे एस. व्ही. कुलकर्णी येत्या ३१ आॅक्टोबररोजी प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त होत आहेत. निवृत्तीपूर्वी चार दिवस अगोदर त्यांनी कारकीर्दीतील शेवटची शिक्षा सुनावली. न्यायालयात त्यांच्या या कामगिरीची चर्चा होती.​

टॅग्स :Crimeगुन्हाCourtन्यायालय