शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

अल्पसंख्याकांच्या प्रगतीसाठी शासन योजना प्रभावीपणे राबवू  : चौधरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 11:04 IST

अल्पसंख्याक समाजबांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अल्पसंख्याक समाजाचे प्रश्न, समस्या, अडचणी सोडवण्याची शासनाची आणि प्रशासनाची भूमिका आहे. जिल्हा प्रशासनामार्फत अल्पसंख्याकांचे हक्क अबाधित राहाण्यासाठी व त्यांच्या प्रगतीसाठी शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवू, अशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली. ​

ठळक मुद्देअल्पसंख्याकांच्या प्रगतीसाठी शासन योजना प्रभावीपणे राबवू  : चौधरीजिल्हाधिकारी कार्यालयात अल्पसंख्याक हक्क दिन

सांगली : अल्पसंख्याक समाजबांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अल्पसंख्याक समाजाचे प्रश्न, समस्या, अडचणी सोडवण्याची शासनाची आणि प्रशासनाची भूमिका आहे. जिल्हा प्रशासनामार्फत अल्पसंख्याकांचे हक्क अबाधित राहाण्यासाठी व त्यांच्या प्रगतीसाठी शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवू, अशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त अल्पसंख्याकांना त्यांच्या घटनात्मक आणि कायदेशीर हक्काबाबत जाणीव करून देण्यासाठी आयोजित कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अर्जुन बन्ने, जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे, शाहीन शेख, डॉ. विनोद पवार, मुनीर मुल्ला, राजगोंडा पाटील, भूपेंद्र सिंग आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. देशामध्ये वेगवेगळ्या धर्माचे, पंथाचे लोक राहतात. या सर्वांचे हित जोपासण्यासाठी संविधानामध्ये मुलभूत हक्कांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये अल्पसंख्याकांचे धार्मिक स्वातंत्र्य, शिक्षण, सांस्कृतिक आदि हक्क अधोरेखित केले गेले आहेत. याची अंमलबजावणी होण्यासाठी शासनाने वेगवेगळे कार्यक्रम सुरू केले आहेत.

यामध्ये अल्पसंख्याकांसाठी १५ कलमी कार्यक्रम हा महत्वाचा कार्यक्रम असून यामध्ये अल्पसंख्याकांच्या अडचणी सोडविण्यासाठी त्यांना विविध क्षेत्रात मदत करणे, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत करणे, शिष्यवृत्ती, तरूणांना रोजगार देणे, अल्पसंख्याकांच्या शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था यांना स्वतंत्र हक्क देणे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या योजना आहेत.अल्पसंख्याकांच्या विविध संस्थामार्फत त्यांच्या अडचणी सोडविण्याचे काम केले जात आहे. अल्पसंख्याकांचे जे प्रश्न जिल्हापातळीवर सोडविणे शक्य आहे ते प्राधान्याने सोडविण्यासाठी प्रयत्न करू. ज्या अडचणी शासन पातळीवर आहेत त्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करू, असे त्यांनी आश्वासीत केले.अल्पसंख्याक समाजातील लोकांना शासनाने कोणकोणत्या योजना सुरू केल्या आहेत त्या माहिती होण्यासाठी व त्यांचा चांगल्या पध्दतीने वापर करून घेण्यासाठी माहिती केंद्र सुरू करण्याचे नियोजन करू असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, अल्पसंख्याक समाजाच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी तालुकास्तरावर बैठका आयोजित करण्याबरोबरच त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हास्तरावर आयोजित करण्यात येणाऱ्या त्रैमासिक बैठका प्रभावी होतील याची दक्षता घेण्यात येईल.

वैयक्तिक काही अडचणी असल्यास संबंधित अधिकारी यांना भेटावे. त्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहू. विविध योजनांच्या माहितीसाठी समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त यांच्याशी संपर्क साधावा. सर्व समाजातील चांगले उद्योजक, अधिकारी, खेळाडू, शिक्षण अशा सर्वच क्षेत्रामध्ये ज्यांची उल्लेखनीय कामगिरी आहे अशा व्यक्तींनी अल्पसंख्याक समाजातील लोकांना पुढे आणण्यासाठी मदत करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.यावेळी शाहीन शेख यांनी अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी प्रधानमंत्री यांच्या १५ कलमी कार्यक्रमाबाबत, डॉ. विनोद पवार यांनी अल्पसंख्यांकासाठी संविधानातील हक्क, मुनीर मुल्ला यांनी अल्पसंख्याकांच्या मागण्या व प्रश्न, राजगोंडा पाटील यांनी अल्पसंख्याक स्वयंसेवी संस्थांबाबत विविध योजना, भूपेंद्र सिंग यांनी अल्पसंख्याकांच्या अडचणी या विषयावर मार्गदर्शन करून अल्पसंख्याकांच्या समस्यांची सोडवणूक होण्यासाठी प्रशासकीय पातळीवर उपाययोजना करण्याबाबत आपली मते मांडली. तसेच अशासकीय सदस्य सलीम गवंडी, मुस्ताक पटेल, फैजल पटेल, नजीर जमादार यांनी मनोगत व्यक्त करून त्यांच्या समस्या मांडल्या.प्रास्ताविकात निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे यांनी कार्यक्रमाचा हेतू विशद करून मान्यवरांना संविधानाची उद्देशिका देवून स्वागत केले. सूत्रसंचालन प्रा. ए. के. पाटील यांनी केले. या कार्यक्रमास अल्पसंख्याक समाजातील विविध मान्यवर, महिला, अल्पसंख्याक समितीचे शासकीय व अशासकीय सदस्य, शासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीSangliसांगली