शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

बाजार समित्यांच्या दुर्लक्षाचा गुऱ्हाळांवर परिणाम

By admin | Updated: November 25, 2015 00:31 IST

शेतकरी संघटनांचेही दुर्लक्ष : शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे राज्यकर्त्यांनी लक्ष द्यावे --गुऱ्हाळघरांना घरघर-३

सहदेव खोत -पुनवत -गूळ उत्पादक शेतकऱ्यांच्या गुळाला योग्य दर मिळवून देण्याकामी कृषी उत्पन्न बाजार समित्या, शासन व शेतकरी संघटना यांचे दुर्लक्षही कारणीभूत ठरत आहे. बाजार समित्यांचा व्यापारी व अडते यांच्यावरील वचक कमी झाल्याने गूळ उत्पादकांची हानी होऊ लागली आहे. परिणामी दर मिळत नसल्याने शेतकरी गूळ निर्मितीपासून दूर जाऊ लागला आहे. गूळ उद्योगाबाबतीत कोल्हापूर, कऱ्हाड येथील कृषी उत्पन्न बाजार समित्या दुर्लक्ष करीत असल्याचे गुऱ्हाळमालक व उत्पादक शेतकऱ्यांतून बोलले जात आहे. बाजार समित्यांच्या दुर्लक्षामुळेच व्यापारी व अडते यांच्याकडून पिळवणूक होत असल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे. प्रतिवर्षी उसाच्या एफआरपी (रास्त व किफायतशीर भाव) दरासाठी टाहो फोडणाऱ्या शेतकरी संघटना गूळदरासाठी फारशा आक्रमक होताना दिसत नाहीत. (समाप्त)गुऱ्हाळांच्या ऱ्हासाला : मालकांची बेकी जबाबदारगुऱ्हाळ उद्योगाच्या ऱ्हासाला गुऱ्हाळ मालकांची बेकी कारणीभूत ठरत आहे. गुऱ्हाळ मालकांच्या संघटना नाहीत. संघटना असतील तर समन्वय नाही. परिणामी अशा परिस्थितीत फक्त गूळ उत्पादक शेतकरी भरडला जात आहे. गूळदरासाठी गुऱ्हाळमालकांनी ‘गुऱ्हाळघरे बंद’सारखे हत्यार उपसल्यास व्यापारी, अडते यांना चाप बसणार आहे.गुऱ्हाळघरातून उच्च प्रतीचा गूळ बाजारपेठांत पाठविण्यासाठी प्रयत्न होतात. अनेकवेळा बारीक कणी, चांगला रंग, चांगली चव असूनही शेतकऱ्यांच्या गुळाला व्यापारी न्याय देत नाहीत. व्यापाऱ्यांनीच गुळाला दर देऊन हा उद्योग टिकविण्याची गरज आहे.- दत्ता पाटसुते, कासेगाव, गुळवे, नेर्ले, ता. शाहुवाडी.गुळाला दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. घाणाभाडे, वाहतूक, हमाली, अडत, तोलाई, तोडणी वजा जाता शेतकऱ्यांच्या हातात काहीच उरत नाही. व्यापाऱ्यांनी गूळ उत्पादकांना न्याय दिला तरच शेतकरी गुऱ्हाळ उद्योगाकडे वळतील.- बाबासाहेब वरेकर, गूळ उत्पादक, खवरेवाडी.