शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
4
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
5
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
6
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
7
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
8
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
9
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
10
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
11
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
12
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
13
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
14
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
15
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
16
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
17
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
18
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
19
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
20
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!

कॅनमधील थंड पाण्याच्या बेकायदा धंद्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात 

By संतोष भिसे | Updated: May 14, 2024 18:47 IST

संतोष भिसे सांगली : उन्हाचा पारा वाढेल, तशी कॅनमधील थंडगार पाण्याची मागणी प्रचंड वाढू लागली आहे. सांगली , मिरजेत ...

संतोष भिसेसांगली : उन्हाचा पारा वाढेल, तशी कॅनमधील थंडगार पाण्याची मागणी प्रचंड वाढू लागली आहे. सांगली, मिरजेत दिवसाकाठी हजारो लिटर पाण्याची विक्री होते; पण या व्यवसायावर आरोग्याच्या दृष्टीने कोणाचेच नियंत्रण नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे हा व्यवसाय लोकांच्या आरोग्याशी खेळण्याचा धंदा ठरला आहे.प्रत्येक लग्नसोहळ्यात, सार्वजनिक कार्यक्रमात कॅनमधील पाणी पुरविले जाते. मिनरल वॉटरच्या नावाखाली कॅनमधील थंड पाणी डोळे झाकून पिले जाते. सांगली, मिरजेत असे किमान २०० हून अधिक आरओ प्रकल्प सुरू आहेत. त्यांच्यावर महापालिका, अन्न व औषध प्रशासन किंवा अन्य कोणत्याही शासकीय विभागाचे नियंत्रण नाही. सीलबंद पाण्याच्या बाटलीचे उत्पादन आणि विक्रीवर अन्न व औषध प्रशासन विभागाचे नियंत्रण आहे; पण खुल्या पाण्याच्या विक्रीवर नियंत्रण कोणाचे? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. महापालिकेचा आरोग्य विभाग, अन्न व औषध प्रशासन विभाग, भारतीय मानक ब्युरो, वैधमापनशास्त्र विभाग आणि अन्य सरकारी विभाग यापैकी कोणीच जबाबदारी घेत नाही. त्यामुळे असे आरओ प्रकल्प गल्लोगल्ली फोफावले आहेत. चांगल्या नफ्यामुळे त्यांची संख्या भरमसाट वाढत आहे. बहुतांश प्रकल्पांत कोणत्याही प्रक्रियेविना विहीर किंवा कूपनलिकेचे पाणी वापरले जाते. थंड करून कॅनमधून ग्राहकांपर्यंत पोहोचविले जाते. २० लिटर पाण्याचा कॅन ३० ते ४० रुपयांना विकला जातो. त्यातून महापालिका क्षेत्रात दररोज लाखो रुपयांची उलाढाल होते. सांगलीत महापालिकेच्या पाण्याच्या शुद्धतेविषयी वर्षानुवर्षे ओरड आहे. त्यामुळे नागरिकांचा कल कॅनमधील पाण्याकडे आहे. प्रत्यक्षात अनेक व्यावसायिक महापालिकेचेच पाणी थंड करून ग्राहकांच्या गळ्यात मारतात.

कॅनमधील पाण्याविषयी अनेक प्रश्न उपस्थित होतात- पाण्याच्या शुद्धतेची हमी काय?- मानकानुसार ते थंड केले जाते का?- त्याचा पीएच तपासला जातो का?- कॅन खाद्यवस्तूंच्या निकषातील प्लास्टिकचे असतात का?- कूपनलिकेतील पाण्याच्या शुद्धतेची हमी काय?- शुद्ध पाण्याच्या नावाखाली फक्त थंड केलेले पाणी मिळते, ही फसवणूक नाही का?

सरकारी कार्यालयांतच पाण्याचे कॅनलोकांचे आरोग्य सांभाळण्याची जबाबदारी असलेल्या अनेक सरकारी कार्यालयांतच कॅनमधून पाणी मागविले जाते. स्वच्छ दिसते म्हणून नागरिकही डोळे झाकून पितात; पण त्यातून अनेकांना पोटाच्या विकारांचा सामना करावा लागत आहे.

कॅनमधील पाण्याच्या विक्रीशी आमच्या विभागाचा संबंध येत नाही. त्याचे परवाने किंवा अन्य कोणतीही बाब आमच्या विभागांतर्गत नाही. - निलेश मसारे, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन 

नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा ही शासनाची जबाबदारी आहे. आरओ प्रकल्पातील पाण्याच्या शुद्धतेविषयी शासनाने निश्चित धोरण ठरवायला हवे. एखाद्या सक्षम विभागाकडे जबाबदारी द्यायला हवी, तरच ग्राहकांची फसवणूक टळेल. - सुरेश हराळे, माहिती अधिकार कार्यकर्ता, मिरज

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणी