शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
2
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
3
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
4
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
5
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
6
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
8
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
9
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
10
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
11
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
12
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
13
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
14
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
15
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
16
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
17
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
18
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
19
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
20
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी

कॅनमधील थंड पाण्याच्या बेकायदा धंद्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात 

By संतोष भिसे | Updated: May 14, 2024 18:47 IST

संतोष भिसे सांगली : उन्हाचा पारा वाढेल, तशी कॅनमधील थंडगार पाण्याची मागणी प्रचंड वाढू लागली आहे. सांगली , मिरजेत ...

संतोष भिसेसांगली : उन्हाचा पारा वाढेल, तशी कॅनमधील थंडगार पाण्याची मागणी प्रचंड वाढू लागली आहे. सांगली, मिरजेत दिवसाकाठी हजारो लिटर पाण्याची विक्री होते; पण या व्यवसायावर आरोग्याच्या दृष्टीने कोणाचेच नियंत्रण नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे हा व्यवसाय लोकांच्या आरोग्याशी खेळण्याचा धंदा ठरला आहे.प्रत्येक लग्नसोहळ्यात, सार्वजनिक कार्यक्रमात कॅनमधील पाणी पुरविले जाते. मिनरल वॉटरच्या नावाखाली कॅनमधील थंड पाणी डोळे झाकून पिले जाते. सांगली, मिरजेत असे किमान २०० हून अधिक आरओ प्रकल्प सुरू आहेत. त्यांच्यावर महापालिका, अन्न व औषध प्रशासन किंवा अन्य कोणत्याही शासकीय विभागाचे नियंत्रण नाही. सीलबंद पाण्याच्या बाटलीचे उत्पादन आणि विक्रीवर अन्न व औषध प्रशासन विभागाचे नियंत्रण आहे; पण खुल्या पाण्याच्या विक्रीवर नियंत्रण कोणाचे? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. महापालिकेचा आरोग्य विभाग, अन्न व औषध प्रशासन विभाग, भारतीय मानक ब्युरो, वैधमापनशास्त्र विभाग आणि अन्य सरकारी विभाग यापैकी कोणीच जबाबदारी घेत नाही. त्यामुळे असे आरओ प्रकल्प गल्लोगल्ली फोफावले आहेत. चांगल्या नफ्यामुळे त्यांची संख्या भरमसाट वाढत आहे. बहुतांश प्रकल्पांत कोणत्याही प्रक्रियेविना विहीर किंवा कूपनलिकेचे पाणी वापरले जाते. थंड करून कॅनमधून ग्राहकांपर्यंत पोहोचविले जाते. २० लिटर पाण्याचा कॅन ३० ते ४० रुपयांना विकला जातो. त्यातून महापालिका क्षेत्रात दररोज लाखो रुपयांची उलाढाल होते. सांगलीत महापालिकेच्या पाण्याच्या शुद्धतेविषयी वर्षानुवर्षे ओरड आहे. त्यामुळे नागरिकांचा कल कॅनमधील पाण्याकडे आहे. प्रत्यक्षात अनेक व्यावसायिक महापालिकेचेच पाणी थंड करून ग्राहकांच्या गळ्यात मारतात.

कॅनमधील पाण्याविषयी अनेक प्रश्न उपस्थित होतात- पाण्याच्या शुद्धतेची हमी काय?- मानकानुसार ते थंड केले जाते का?- त्याचा पीएच तपासला जातो का?- कॅन खाद्यवस्तूंच्या निकषातील प्लास्टिकचे असतात का?- कूपनलिकेतील पाण्याच्या शुद्धतेची हमी काय?- शुद्ध पाण्याच्या नावाखाली फक्त थंड केलेले पाणी मिळते, ही फसवणूक नाही का?

सरकारी कार्यालयांतच पाण्याचे कॅनलोकांचे आरोग्य सांभाळण्याची जबाबदारी असलेल्या अनेक सरकारी कार्यालयांतच कॅनमधून पाणी मागविले जाते. स्वच्छ दिसते म्हणून नागरिकही डोळे झाकून पितात; पण त्यातून अनेकांना पोटाच्या विकारांचा सामना करावा लागत आहे.

कॅनमधील पाण्याच्या विक्रीशी आमच्या विभागाचा संबंध येत नाही. त्याचे परवाने किंवा अन्य कोणतीही बाब आमच्या विभागांतर्गत नाही. - निलेश मसारे, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन 

नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा ही शासनाची जबाबदारी आहे. आरओ प्रकल्पातील पाण्याच्या शुद्धतेविषयी शासनाने निश्चित धोरण ठरवायला हवे. एखाद्या सक्षम विभागाकडे जबाबदारी द्यायला हवी, तरच ग्राहकांची फसवणूक टळेल. - सुरेश हराळे, माहिती अधिकार कार्यकर्ता, मिरज

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणी