शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

विश्वगुरू व्हायचे असेल तर स्वत:ला बदलावे लागेल - नितीन गडकरी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2024 11:57 IST

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण

सांगली : आत्मनिर्भर भारत, फाईव्ह ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी, थर्ड लार्जेस्ट इकॉनॉमी, विश्वगुरु हे सर्व म्हणायला सोपे आहे, पण त्यासाठी आपल्याला बदलायला हवे. दुसऱ्याला सांगण्यापेक्षा बदल स्वत:मध्ये करायला हवेत. यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अंगीकार करावा लागेल, असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.मराठा समाज संस्थेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शुक्रवारी सांगलीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण व सभागृह नुतनीकरण कामाचे उद्घाटन गडकरी यांच्याहस्ते करण्यात आले. स्मरणिका प्रकाशनही पार पडले. गडकरी म्हणाले की, सत्ता, संपत्ती अन् सुख पायाशी लोळण घालत असतानाही उपभोगशून्य असलेल्या शिवाजी महाराजांनी रयतेच्या उद्धारासाठी व विकासाकरीता सेवा केली. त्यांचा आदर्श सर्वांनी घेतला तर आपला समाज व देश आता आहे त्यापेक्षा अनेक पटीने पुढे जाईल.ते म्हणाले, कोणताही व्यक्ती हा जात, धर्म, लिंग यानुसार छोटा किंवा मोठा होत नाही. त्याच्यातील गुणांनी तो मोठा होत असतो. शिवाजी महाराज म्हणजे गुणांचा भांडार होते. सर्वांना बरोबर घेऊन कसे राज्य करायचे, याचा आदर्श वस्तुपाठ त्यांनी घालून दिला. त्यांच्या विचारांचा वारसा सर्वांनी जपला पाहिजे.मराठा समाज संस्थेचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी स्वागत, तर निमंत्रक माजी खासदार संजय पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार विशाल पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार मानसिंगराव नाईक, आमदार विश्वजीत कदम, माजी आमदार विलासराव जगताप, सदाशिवराव पाटील, दिनकर पाटील, नितीन शिंदे, शिवाजीराव नाईक, रासपचे नेते महादेव जानकर, माजी खासदार राजू शेट्टी, पृथ्वीराज पवार, जनसुराज्य पक्षाचे समीत कदम आदी उपस्थित होते.

जात, पैसा, गुन्हेगारीवर राजकारणसध्या जात, पैसा, गुन्हेगारी हे राजकारणाचे अंगीभूत घटक बनले आहेत. या गोष्टी समाजासाठी चांगल्या नाहीत, असे मत गडकरी यांनी व्यक्त केले.

अभिमानाने छाती फुगतेदेशाच्या कानाकोपऱ्यात जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतल्यानंतर लोक नतमस्तक होताना दिसतात, तेव्हा मराठी माणूस म्हणून आपली छाती अभिमानाने फुगते, असे मत राष्ट्रवादी पक्षाचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

छत्रपतींच्या आडनावाने राज्याची ओळख नाहीशरद पवार म्हणाले की, देशात पूर्वी मोघलांचे, आदिलशाहीचे, देवगिरीच्या यादवांचे राज्य अशी वेगवेगळ्या राज्यांची ओळख होती. मात्र, या देशात छत्रपती शिवाजी महाराज असा एकच राजा होऊन गेला ज्याच्या आडनावाने कधी राज्य ओळखले जात नाही. भोसलेंचे राज्य म्हणून ओळख न होता शिवछत्रपतींचे राज्य हे रयतेचे राज्य, हिंदवी स्वराज्य म्हणून ओळखले जाते.

मराठा समाजाची परंपरा कौतुकास्पदमराठा केवळ एक जात नाही. सर्व जाती-धर्मांचा आदर करुन त्यांना सोबत घेऊन जाण्याचा विचार आहे. सांगलीत मराठा समाज संस्थेने तो विचार अनेक सामाजिक उपक्रमातून जपला आहे, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.

पवार गेले, गडकरी आलेशरद पवार व नितीन गडकरी आज एकाच व्यासपीठावर येणार म्हणून उपस्थितांत उत्सुकता होती. मात्र, कार्यक्रमांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे शरद पवार नियोजित वेळेपेक्षा लवकर आले. भाषण करुन ते निघून गेल्यानंतर गडकरींचे कार्यक्रमाच्या ठिकाणी आगमन झाले. त्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही.

सांगलीच्या दुष्काळी भागातून नवा महामार्गमुंबईच्या अटल सेतूपासून पुणे व पुण्यातून बेंगलोरपर्यंत नवा राष्ट्रीय महामार्ग साकारला जाणार आहे. सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागातून तो जाणार असल्याने येथील विकासला चालना मिळेल, असे गडकरी म्हणाले.

गडकरींना व्यक्तीचित्र नवकृष्णा व्हॅली महाविद्यालयाचे प्रा. सुमेध कुलकर्णी यांनी शुक्रवारी गडकरी यांना त्यांचे व्यक्तिचित्र भेट दिले. व्यक्तिचित्रासाठी कुलकर्णी यांना सत्यजित वरेकर, होळकर, पूजा सकटे यांचे मार्गदर्शन लाभले

टॅग्स :SangliसांगलीNitin Gadkariनितीन गडकरीSharad Pawarशरद पवार