शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

राष्ट्रवादीने प्रस्ताव दिल्यास सांगली महापालिकेत आघाडी: विश्वजित कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 23:41 IST

सांगली : महापालिका क्षेत्रात काँग्रेसची ताकद मोठी असून, पालिकेतही काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचा आघाडीचा प्रस्ताव काँग्रेसने नाकारला होतापुण्यातही दोन्ही पक्ष एकत्र आले असते, तर तेथे भाजपला थारा मिळाला नसता८ नोव्हेंबरला राज्यभरात जनआक्रोश आंदोलन

सांगली : महापालिका क्षेत्रात काँग्रेसची ताकद मोठी असून, पालिकेतही काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने प्रस्ताव दिला तर, दोन्ही काँग्रेसच्या आघाडीबाबत विचार करू, असे स्पष्टीकरण युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना दिले. आघाडीचा निर्णय काँग्रेसचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्त्यांशी विचारविमर्श करूनच घेतला जाईल. हा निर्णय कोणत्याही स्थितीत लादला जाणार नाही, असेही ते म्हणाले.

प्रदेश काँग्रेसच्यावतीने ८ नोव्हेंबर रोजी सांगलीत जनआक्रोश यात्रेची सांगता होणार आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी कदम यांच्या उपस्थितीत काँग्रेस नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीला महापौर हारुण शिकलगार, गटनेते किशोर जामदार, माजी उपमहापौर प्रशांत पाटील-मजलेकर, स्थायी समितीचे माजी सभापती राजेश नाईक, संजय मेंढे, संतोष पाटील उपस्थित होते. बैठकीनंतर विश्वजित कदम यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आगामी महापालिका निवडणुकीबाबत विचारता, ते म्हणाले की, राज्यातील सांगली, नांदेड, अमरावतीसह सहा महापालिकांत काँग्रेसची सत्ता आहे. सांगलीत तर काँग्रेस बहुमतात आणि राष्ट्रवादीचे आमच्याहून निम्मे सदस्य आहेत.

दोन्ही सेक्युलर विचारसरणीचे पक्ष आहेत. त्यामुळे दोघांनी एकत्र येऊन महापालिका निवडणूक लढणे योग्य आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने सांगली नव्हे, राज्यपातळीवरही एकत्र यावे, ही जनतेची इच्छा आहे. पण सांगली महापालिकेत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने प्रस्ताव द्यावा, त्याबाबत विचार करू, अशी भूमिका मांडली. आघडीचा निर्णय हा स्थानिक नेते, पदाधिकारी, नगरसेवकांना विचारात घेऊनच घेतला जाईल, असेही ते म्हणाले.

भाजपने हुकूमशाही पद्धतीने नोटाबंदीचा निर्णय जनतेवर लादला. त्यानंतर जीएसटी लागू करून संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेचे वाटोळे केले. देशाचा जीडीपी घसरला असून, बेरोजगारीत वाढ झाली आहे. राज्य शासनाची कर्जमाफीही फसवी आहे. त्याविरोधात ८ नोव्हेंबरला राज्यभरात जनआक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे. याअंतर्गत सांगली जिल्ह्यातही जनआक्रोश मेळावा होणार आहे. त्याची जिल्ह्यात बैठकांद्वारे युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. येथील नेमिनाथनगरातील मैदानावर हा मेळावा होणार असून, सुमारे लाखहून अधिक लोक सहभागी होतील, असा दावा केला.

जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचा आघाडीचा प्रस्ताव काँग्रेसने नाकारला होता. तसा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला आहे. याकडे लक्ष वेधता डॉ. कदम म्हणाले की, पलूस-कडेगावमध्ये राष्ट्रवादी-भाजप आघाडी कशी होते? याचे उत्तर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आधी द्यावे. सांगलीतच नव्हे, पुण्यातही दोन्ही पक्ष एकत्र आले असते, तर तेथे भाजपला थारा मिळाला नसता. तरीही दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याचा राज्यातील निर्णय वरिष्ठ नेते घेतील. सांगलीत दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी आत्मपरीक्षण करावे.महापौर-आयुक्त : समेट घडवूमहापौर-आयुक्त संघर्षाबाबत कदम म्हणाले की, महापालिका निवडणूक अवघ्या आठ महिन्यांवर आली आहे. त्यादृष्टीने आमचे लक्ष आहेच. पदाधिकारी, नगरसेवकांशी चर्चा सुरू आहे. काही कामांना विलंब होत असल्याबद्दल जनतेत नाराजी आहे. यातून आयुक्तांबाबत बेबनाव झाला आहे. यासाठी महापौर व आयुक्तांशी डॉ. पतंगराव कदम यांनी चर्चा केली होती. आयुक्तांचे काम चांगले आहे. पण अवधी कमी असल्याने कामाला गती देणे आवश्यक आहे. लवकरच त्यासाठी महापौर, गटनेते, आयुक्तांना एकत्र घेऊन स्नेहभोजन घडवून समेट करू.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस