शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजी पालिका : दोन्ही आघाड्यांतील बंडखोरी उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 23:54 IST

नगरपालिका विविध विषय समित्यांच्या शनिवारी (दि.५) झालेल्या निवडणुकीत सत्तारूढ आणि विरोधी अशा दोन्ही आघाड्यांमध्येही बंडखोर असल्याचे उघडकीस आले. लोकसभा व विधानसभा आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीला विशेष महत्त्व असतानाच ही बंडखोरी दिसून

ठळक मुद्देविषय समित्यांची निवडणूक, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धक्का

राजाराम पाटील ।इचलकरंजी : नगरपालिका विविध विषय समित्यांच्या शनिवारी (दि.५) झालेल्या निवडणुकीत सत्तारूढ आणि विरोधी अशा दोन्ही आघाड्यांमध्येही बंडखोर असल्याचे उघडकीस आले. लोकसभा व विधानसभा आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीला विशेष महत्त्व असतानाच ही बंडखोरी दिसून आली. त्यामुळे दोन्ही आघाडीचे प्रमुख आणि घटक पक्षांचे नेते यांनी आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे.

नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भाजप व ताराराणी आघाडी यांची युती होती, तर राष्टÑीय व राष्टÑवादी कॉँग्रेस आणि शाहू विकास आघाडी यांची एकत्रितपणे आघाडी होऊन या निवडणुका लढविण्यात आल्या होत्या. ६२ नगरसेवक असलेल्या इचलकरंजी पालिकेसाठी डिसेंबर २०१६ मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रीय कॉँग्रेसचे १८, राष्टÑवादी कॉँग्रेसचे ७, शाहू विकास आघाडीचे ११, भाजपचे १५ व ताराराणी आघाडीचे ११ असे नगरसेवक निवडून आले होते. निवडणुकीनंतर मात्र राष्टÑवादी कॉँग्रेसने भाजपबरोबर आघाडी करण्याचा निर्णय घेतला आणि भाजप, ताराराणी आघाडी व राष्टÑवादी कॉँग्रेस यांची आघाडी सत्तेवर आली.

सत्तारूढ आघाडी सत्तेवर येत असताना उपनगराध्यक्षपदासह विविध विषय समित्यांच्या सभापतिपदांचा वाटप करणारा ‘फॉर्म्युला’ ठरला होता. त्याप्रमाणे दुसऱ्या वर्षी ‘फॉर्म्युल्या’त बदल करून राष्ट्रवादी कॉँग्रेसने बांधकाम व पाणीपुरवठा या दोन समिती आपणाकडेच कायम राहाव्यात, असा आग्रह धरला आणि यातूनच वाद निर्माण झाला; पण सत्तारूढ आघाडीचे नेते आमदार सुरेश हाळवणकर यांनी यामध्ये हस्तक्षेप करून राष्ट्रवादीकडेच या दोन समित्या ठेवण्यावर आघाडीमध्ये एकमत घडवून आणले.

शनिवारी झालेल्या विविध विषय समित्यांच्या निवडणुकीमध्ये बांधकाम व पाणीपुरवठा या दोन्ही समित्या आपणाकडे आणखीन एक वर्ष राहाव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेसने केल्यामुळे पुन्हा संघर्षाची ठिणगी पेटली आणि ताराराणी आघाडीने नाराजी व्यक्त केली. अशा पार्श्वभूमीवर शुक्रवारी प्रचंड घडामोडी घडल्या. सायंकाळपर्यंत कॉँग्रेस व शाहू आघाडीबरोबर राष्टÑवादी कॉँग्रेसने घरोबा करण्याचे संकेत दिले. सायंकाळी मात्र यामध्ये पुन्हा बेबनाव निर्माण होऊन कॉँग्रेस व शाहू आघाडीबरोबर ताराराणी आघाडी एकत्रित येऊन सत्ता काबीज करण्याचे ठरले.

मध्यरात्रीपर्यंत नव्याने होणाºया या आघाडीमध्ये सत्तावाटपाचा ‘फॉर्म्युला’ही ठरला. पण, मध्यरात्रीनंतर सत्तारूढ आघाडीचे नेते आमदार हाळवणकर यांनी प्रत्यक्ष सहभागास सुरुवात केली तसेच यामध्ये काही नगरसेवकांनीही आघाडी घेतली आणि भाजप, ताराराणी आघाडी व राष्टÑवादी कॉँग्रेस यांचे असलेले गठबंधन अबाधित ठेवण्यामध्ये यश मिळविले. अशा प्रकारे सत्तारूढ आघाडी, त्याचबरोबर विरोधी आघाडी आहे त्या स्थितीमध्ये राहिली असली तरी यावेळी मात्र दोन्हीकडेही बंडखोरीची बाधा झाल्याचे दिसून आले. लोकसभा व विधानसभा मतदारसंघासाठी लवकरच निवडणुका होणार आहेत म्हणून आघाडीच्या नेतृत्वाबरोबरच पाचही घटक पक्षांच्या प्रमुखांनी आत्मचिंतन करून आपापल्या नगरसेवकांना विश्वासात घेणे आवश्यक आहे.‘ताराराणी, कॉँग्रेस व शाहू’मध्ये बंडखोरीसमित्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवस राजकीय पटलावर ज्या घडामोडी घडत होत्या, त्यामध्ये दोन्हीही आघाड्यांमध्ये अस्थिरता आली होती. अशा स्थितीत राष्टÑीय कॉँग्रेसमध्ये १८ पैकी सुमारे दहाजण, ताराराणी आघाडीमध्ये १० पैकी पाचजण आणि शाहू आघाडीमध्ये ११ पैकी सहाजण बंडखोरी करत असल्याचे निदर्शनास आले. त्याचबरोबर भाजपमध्येसुद्धा नाराजी दिसून आली. काही नगरसेवक आणि नगरसेविका सभागृहामधूनच उठून गेल्याचे दृश्य दिसत होते.आघाडीच्या नेतृत्वाबरोबरच पाचही घटक पक्षांच्या प्रमुखांनी आत्मचिंतन करून आपापल्या नगरसेवकांना विश्वासात घेणे आवश्यक आहे.

टॅग्स :Electionनिवडणूकkolhapurकोल्हापूर