शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
2
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
3
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
4
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
5
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
6
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
7
भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
8
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
9
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
10
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
11
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
12
काैटुंबिक कलहातून होतेय कोवळ्या मुलांची हाेरपळ; बदलापुरात मुलीचे अपहरण; मुंब्य्रात आईच बनली क्रूर
13
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?
14
दोस्त दोस्त ना रहा..!   भांडणातून घेतला जीव 
15
तरुणांभोवती ऑनलाइन गेमचा फास; टार्गेट पूर्ण न झाल्याने दाेघांची आत्महत्या
16
खासदारांना 'हेल्दी मेन्यू'द्वारे मिळणार 'ताकद'!
17
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

इचलकरंजी पालिका : दोन्ही आघाड्यांतील बंडखोरी उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 23:54 IST

नगरपालिका विविध विषय समित्यांच्या शनिवारी (दि.५) झालेल्या निवडणुकीत सत्तारूढ आणि विरोधी अशा दोन्ही आघाड्यांमध्येही बंडखोर असल्याचे उघडकीस आले. लोकसभा व विधानसभा आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीला विशेष महत्त्व असतानाच ही बंडखोरी दिसून

ठळक मुद्देविषय समित्यांची निवडणूक, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धक्का

राजाराम पाटील ।इचलकरंजी : नगरपालिका विविध विषय समित्यांच्या शनिवारी (दि.५) झालेल्या निवडणुकीत सत्तारूढ आणि विरोधी अशा दोन्ही आघाड्यांमध्येही बंडखोर असल्याचे उघडकीस आले. लोकसभा व विधानसभा आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीला विशेष महत्त्व असतानाच ही बंडखोरी दिसून आली. त्यामुळे दोन्ही आघाडीचे प्रमुख आणि घटक पक्षांचे नेते यांनी आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे.

नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भाजप व ताराराणी आघाडी यांची युती होती, तर राष्टÑीय व राष्टÑवादी कॉँग्रेस आणि शाहू विकास आघाडी यांची एकत्रितपणे आघाडी होऊन या निवडणुका लढविण्यात आल्या होत्या. ६२ नगरसेवक असलेल्या इचलकरंजी पालिकेसाठी डिसेंबर २०१६ मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रीय कॉँग्रेसचे १८, राष्टÑवादी कॉँग्रेसचे ७, शाहू विकास आघाडीचे ११, भाजपचे १५ व ताराराणी आघाडीचे ११ असे नगरसेवक निवडून आले होते. निवडणुकीनंतर मात्र राष्टÑवादी कॉँग्रेसने भाजपबरोबर आघाडी करण्याचा निर्णय घेतला आणि भाजप, ताराराणी आघाडी व राष्टÑवादी कॉँग्रेस यांची आघाडी सत्तेवर आली.

सत्तारूढ आघाडी सत्तेवर येत असताना उपनगराध्यक्षपदासह विविध विषय समित्यांच्या सभापतिपदांचा वाटप करणारा ‘फॉर्म्युला’ ठरला होता. त्याप्रमाणे दुसऱ्या वर्षी ‘फॉर्म्युल्या’त बदल करून राष्ट्रवादी कॉँग्रेसने बांधकाम व पाणीपुरवठा या दोन समिती आपणाकडेच कायम राहाव्यात, असा आग्रह धरला आणि यातूनच वाद निर्माण झाला; पण सत्तारूढ आघाडीचे नेते आमदार सुरेश हाळवणकर यांनी यामध्ये हस्तक्षेप करून राष्ट्रवादीकडेच या दोन समित्या ठेवण्यावर आघाडीमध्ये एकमत घडवून आणले.

शनिवारी झालेल्या विविध विषय समित्यांच्या निवडणुकीमध्ये बांधकाम व पाणीपुरवठा या दोन्ही समित्या आपणाकडे आणखीन एक वर्ष राहाव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेसने केल्यामुळे पुन्हा संघर्षाची ठिणगी पेटली आणि ताराराणी आघाडीने नाराजी व्यक्त केली. अशा पार्श्वभूमीवर शुक्रवारी प्रचंड घडामोडी घडल्या. सायंकाळपर्यंत कॉँग्रेस व शाहू आघाडीबरोबर राष्टÑवादी कॉँग्रेसने घरोबा करण्याचे संकेत दिले. सायंकाळी मात्र यामध्ये पुन्हा बेबनाव निर्माण होऊन कॉँग्रेस व शाहू आघाडीबरोबर ताराराणी आघाडी एकत्रित येऊन सत्ता काबीज करण्याचे ठरले.

मध्यरात्रीपर्यंत नव्याने होणाºया या आघाडीमध्ये सत्तावाटपाचा ‘फॉर्म्युला’ही ठरला. पण, मध्यरात्रीनंतर सत्तारूढ आघाडीचे नेते आमदार हाळवणकर यांनी प्रत्यक्ष सहभागास सुरुवात केली तसेच यामध्ये काही नगरसेवकांनीही आघाडी घेतली आणि भाजप, ताराराणी आघाडी व राष्टÑवादी कॉँग्रेस यांचे असलेले गठबंधन अबाधित ठेवण्यामध्ये यश मिळविले. अशा प्रकारे सत्तारूढ आघाडी, त्याचबरोबर विरोधी आघाडी आहे त्या स्थितीमध्ये राहिली असली तरी यावेळी मात्र दोन्हीकडेही बंडखोरीची बाधा झाल्याचे दिसून आले. लोकसभा व विधानसभा मतदारसंघासाठी लवकरच निवडणुका होणार आहेत म्हणून आघाडीच्या नेतृत्वाबरोबरच पाचही घटक पक्षांच्या प्रमुखांनी आत्मचिंतन करून आपापल्या नगरसेवकांना विश्वासात घेणे आवश्यक आहे.‘ताराराणी, कॉँग्रेस व शाहू’मध्ये बंडखोरीसमित्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवस राजकीय पटलावर ज्या घडामोडी घडत होत्या, त्यामध्ये दोन्हीही आघाड्यांमध्ये अस्थिरता आली होती. अशा स्थितीत राष्टÑीय कॉँग्रेसमध्ये १८ पैकी सुमारे दहाजण, ताराराणी आघाडीमध्ये १० पैकी पाचजण आणि शाहू आघाडीमध्ये ११ पैकी सहाजण बंडखोरी करत असल्याचे निदर्शनास आले. त्याचबरोबर भाजपमध्येसुद्धा नाराजी दिसून आली. काही नगरसेवक आणि नगरसेविका सभागृहामधूनच उठून गेल्याचे दृश्य दिसत होते.आघाडीच्या नेतृत्वाबरोबरच पाचही घटक पक्षांच्या प्रमुखांनी आत्मचिंतन करून आपापल्या नगरसेवकांना विश्वासात घेणे आवश्यक आहे.

टॅग्स :Electionनिवडणूकkolhapurकोल्हापूर