शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

इचलकरंजी पालिका : दोन्ही आघाड्यांतील बंडखोरी उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 23:54 IST

नगरपालिका विविध विषय समित्यांच्या शनिवारी (दि.५) झालेल्या निवडणुकीत सत्तारूढ आणि विरोधी अशा दोन्ही आघाड्यांमध्येही बंडखोर असल्याचे उघडकीस आले. लोकसभा व विधानसभा आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीला विशेष महत्त्व असतानाच ही बंडखोरी दिसून

ठळक मुद्देविषय समित्यांची निवडणूक, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धक्का

राजाराम पाटील ।इचलकरंजी : नगरपालिका विविध विषय समित्यांच्या शनिवारी (दि.५) झालेल्या निवडणुकीत सत्तारूढ आणि विरोधी अशा दोन्ही आघाड्यांमध्येही बंडखोर असल्याचे उघडकीस आले. लोकसभा व विधानसभा आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीला विशेष महत्त्व असतानाच ही बंडखोरी दिसून आली. त्यामुळे दोन्ही आघाडीचे प्रमुख आणि घटक पक्षांचे नेते यांनी आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे.

नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भाजप व ताराराणी आघाडी यांची युती होती, तर राष्टÑीय व राष्टÑवादी कॉँग्रेस आणि शाहू विकास आघाडी यांची एकत्रितपणे आघाडी होऊन या निवडणुका लढविण्यात आल्या होत्या. ६२ नगरसेवक असलेल्या इचलकरंजी पालिकेसाठी डिसेंबर २०१६ मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रीय कॉँग्रेसचे १८, राष्टÑवादी कॉँग्रेसचे ७, शाहू विकास आघाडीचे ११, भाजपचे १५ व ताराराणी आघाडीचे ११ असे नगरसेवक निवडून आले होते. निवडणुकीनंतर मात्र राष्टÑवादी कॉँग्रेसने भाजपबरोबर आघाडी करण्याचा निर्णय घेतला आणि भाजप, ताराराणी आघाडी व राष्टÑवादी कॉँग्रेस यांची आघाडी सत्तेवर आली.

सत्तारूढ आघाडी सत्तेवर येत असताना उपनगराध्यक्षपदासह विविध विषय समित्यांच्या सभापतिपदांचा वाटप करणारा ‘फॉर्म्युला’ ठरला होता. त्याप्रमाणे दुसऱ्या वर्षी ‘फॉर्म्युल्या’त बदल करून राष्ट्रवादी कॉँग्रेसने बांधकाम व पाणीपुरवठा या दोन समिती आपणाकडेच कायम राहाव्यात, असा आग्रह धरला आणि यातूनच वाद निर्माण झाला; पण सत्तारूढ आघाडीचे नेते आमदार सुरेश हाळवणकर यांनी यामध्ये हस्तक्षेप करून राष्ट्रवादीकडेच या दोन समित्या ठेवण्यावर आघाडीमध्ये एकमत घडवून आणले.

शनिवारी झालेल्या विविध विषय समित्यांच्या निवडणुकीमध्ये बांधकाम व पाणीपुरवठा या दोन्ही समित्या आपणाकडे आणखीन एक वर्ष राहाव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेसने केल्यामुळे पुन्हा संघर्षाची ठिणगी पेटली आणि ताराराणी आघाडीने नाराजी व्यक्त केली. अशा पार्श्वभूमीवर शुक्रवारी प्रचंड घडामोडी घडल्या. सायंकाळपर्यंत कॉँग्रेस व शाहू आघाडीबरोबर राष्टÑवादी कॉँग्रेसने घरोबा करण्याचे संकेत दिले. सायंकाळी मात्र यामध्ये पुन्हा बेबनाव निर्माण होऊन कॉँग्रेस व शाहू आघाडीबरोबर ताराराणी आघाडी एकत्रित येऊन सत्ता काबीज करण्याचे ठरले.

मध्यरात्रीपर्यंत नव्याने होणाºया या आघाडीमध्ये सत्तावाटपाचा ‘फॉर्म्युला’ही ठरला. पण, मध्यरात्रीनंतर सत्तारूढ आघाडीचे नेते आमदार हाळवणकर यांनी प्रत्यक्ष सहभागास सुरुवात केली तसेच यामध्ये काही नगरसेवकांनीही आघाडी घेतली आणि भाजप, ताराराणी आघाडी व राष्टÑवादी कॉँग्रेस यांचे असलेले गठबंधन अबाधित ठेवण्यामध्ये यश मिळविले. अशा प्रकारे सत्तारूढ आघाडी, त्याचबरोबर विरोधी आघाडी आहे त्या स्थितीमध्ये राहिली असली तरी यावेळी मात्र दोन्हीकडेही बंडखोरीची बाधा झाल्याचे दिसून आले. लोकसभा व विधानसभा मतदारसंघासाठी लवकरच निवडणुका होणार आहेत म्हणून आघाडीच्या नेतृत्वाबरोबरच पाचही घटक पक्षांच्या प्रमुखांनी आत्मचिंतन करून आपापल्या नगरसेवकांना विश्वासात घेणे आवश्यक आहे.‘ताराराणी, कॉँग्रेस व शाहू’मध्ये बंडखोरीसमित्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवस राजकीय पटलावर ज्या घडामोडी घडत होत्या, त्यामध्ये दोन्हीही आघाड्यांमध्ये अस्थिरता आली होती. अशा स्थितीत राष्टÑीय कॉँग्रेसमध्ये १८ पैकी सुमारे दहाजण, ताराराणी आघाडीमध्ये १० पैकी पाचजण आणि शाहू आघाडीमध्ये ११ पैकी सहाजण बंडखोरी करत असल्याचे निदर्शनास आले. त्याचबरोबर भाजपमध्येसुद्धा नाराजी दिसून आली. काही नगरसेवक आणि नगरसेविका सभागृहामधूनच उठून गेल्याचे दृश्य दिसत होते.आघाडीच्या नेतृत्वाबरोबरच पाचही घटक पक्षांच्या प्रमुखांनी आत्मचिंतन करून आपापल्या नगरसेवकांना विश्वासात घेणे आवश्यक आहे.

टॅग्स :Electionनिवडणूकkolhapurकोल्हापूर