शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
2
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
3
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
4
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
5
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
6
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
7
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
8
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
9
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
10
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
11
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
12
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
13
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
14
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
15
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
16
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
17
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
18
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
19
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
20
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

जतचा द्राक्षबागायतदार दुष्काळामुळे हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 15:36 IST

जत तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्याअभावी विहिरी, कूपनलिका, तलाव, बंधारे कोरडे पडले आहेत. पिण्याच्या पाण्याची व शेतीच्या पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पूर्व भागातील सुमारे एक हजार क्षेत्रावर द्राक्षबागा पाण्याअभावी वाळून गेल्या आहेत. या द्राक्षबागा शेतकरी काढून टाकत आहेत. द्राक्ष बागांचे सांगाडेच फक्त शिल्लक राहिले आहेत. शेतकरी शिल्लक राहिलेले दगडी खांब, तारा, लोखंडी अ‍ॅँगल्सची विक्री करू लागला आहे.

ठळक मुद्देजतचा द्राक्षबागायतदार दुष्काळामुळे हवालदिलबागेचे फक्त सांगाडेच शिल्लक

गजानन पाटीलसंख : जत तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्याअभावी विहिरी, कूपनलिका, तलाव, बंधारे कोरडे पडले आहेत. पिण्याच्या पाण्याची व शेतीच्या पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पूर्व भागातील सुमारे एक हजार क्षेत्रावर द्राक्षबागा पाण्याअभावी वाळून गेल्या आहेत. या द्राक्षबागा शेतकरी काढून टाकत आहेत. द्राक्ष बागांचे सांगाडेच फक्त शिल्लक राहिले आहेत. शेतकरी शिल्लक राहिलेले दगडी खांब, तारा, लोखंडी अ‍ॅँगल्सची विक्री करू लागला आहे.बागायतदार शेतकऱ्यांसमोर पाण्याचे संकट उभे राहिल्याने अक्षरश: शेतकरी देशोधडीला लागला आहे. बॅँका, खासगी सावकार, विकास सोसयट्यांकडून काढलेल्या कर्जाची परतफेड कशी होणार? हा प्रश्न त्याच्यासमोर उपस्थित होत आहे.तालुक्याच्या ५ हजार ६६० हेक्टर क्षेत्रावर द्राक्षबागा आहेत. प्रतिकूल परिस्थितीवर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत उजाड माळरानावर बागा उभ्या केल्या आहेत. पाण्याचा काटकसरीने वापर करीत उजाड माळरानावर बागा फुलविल्या आहेत. कृषी विभागाच्या अनुदानावर व स्वत: लाखो लिटरचे शेततलाव बांधले आहेत. पाण्याचा नियोजनबध्द वापर करून दर्जेदार द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते. विहिरीतील काळ्या दगडातील गोड पाणी असल्याने दर्जेदार सुट्याखाण बेदाण्याची निर्मिती केली जात आहे.यावर्षी पाऊसच झाला नसल्याने गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पूर्व व दक्षिण भागातील सर्वच्या सर्व तलाव व दोन मध्यम प्रकल्प पाण्याअभावी डिसेंबर महिन्यातच कोरडे पडले आहेत. तालुक्यातील २६ तलावांपैकी १८ तलाव कोरडे पडले आहेत. २ मध्यम प्रकल्पातील पाणी पातळी मृतसंचयखाली आली आहे. तलावातील पाणीसाठा ४ टक्के शिल्लक आहे. पाण्याची पातळी ८०० ते ९०० फुटांपर्यंत खाली गेली आहे. विहिरी व कूपनलिका खोदल्या तरीसुध्दा पाणी लागत नाही. द्राक्ष उत्पादनासाठी मार्च-एप्रिल महिन्यामध्ये बागांना पाणी जास्त लागते.डिसेंबर महिन्यापासून कूपनलिका, विहिरी कोरड्या पडल्या आहेत. चार महिन्यांपासून बागांना पाणी मिळणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे द्राक्षबागा वाळू लागल्या आहेत. टॅँकरने पाणी घालणे परवडत नसल्याने शेतकरी बागा काढून टाकत आहेत. बागेचे फक्त सांगाडेच शिल्लक राहिले आहेत. शिल्लक राहिलेले दगडी खांब, तारा, लोखंडी अ‍ॅँगल्सची विक्री करण्याची वेळ द्राक्ष बागायतदारांवर आली आहे. 

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी