शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

लक्ष्मी मार्केटच्या भाड्यामध्ये दरवर्षी दीड कोटीचा घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 23:58 IST

महापालिकेस मिरजेतील लक्ष्मी मार्केटमधील १६५ गाळ्यांचे केवळ ६ लाख २४ हजार रुपये वार्षिक भाडे मिळत आहे. प्रतिवर्षी सुमारे दीड कोटी रुपयांचा घोटाळा लक्ष्मी मार्केटच्या भाड्यात होत असल्याचा आरोप सेव्ह मिरज सिटीच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : ‘सेव्ह मिरज सिटी’च्या पदाधिकाऱ्यांची तक्रार

मिरज : महापालिकेस मिरजेतील लक्ष्मी मार्केटमधील १६५ गाळ्यांचे केवळ ६ लाख २४ हजार रुपये वार्षिक भाडे मिळत आहे. प्रतिवर्षी सुमारे दीड कोटी रुपयांचा घोटाळा लक्ष्मी मार्केटच्या भाड्यात होत असल्याचा आरोप सेव्ह मिरज सिटीच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.

मिरजेतील तत्कालीन संस्थानिकांनी नागरिकांच्या सोयीसाठी व पालिकेच्या कामगारांच्या पगाराच्या व्यवस्थेसाठी लक्ष्मी मार्केट व्यापारी संकुल बांधून ते नगरपालिकेकडे हस्तांतरित केले. लक्ष्मी मार्केटमध्ये सुमारे १६५ दुकाने व स्टॉल असून त्यांच्या भाड्यापोटी महापालिकेस दरवर्षी केवळ ६ लाख उत्पन्न मिळत आहे. लक्ष्मी मार्केट या मोक्याच्या जागेत बाजारभावाप्रमाणे किमान एका दुकानाचे भाडे १ लाख रुपये प्रतिवर्ष होईल. या परिसरात दुकान गाळ्याची किंमत आज २० ते ४० लाखादरम्यान आहे. बाजारभावाप्रमाणे महापालिकेस किमान १ कोटी ६५ लाख रुपये भाडे मिळाले पाहिजे. मात्र सर्व दुकानदारांकडून महापालिकेस केवळ ६ लाख २४ हजार रुपये मिळतात. यामुळे प्रतिवर्षी सुमारे दीड कोटी रुपयांचा घोटाळा फक्त लक्ष्मी मार्केटच्या भाड्यात होत आहे. महापालिकेची संपत्ती कमी भावात कारभाºयांकडून कांही बगलबच्च्यांना देण्यात येत असल्याचा आरोप सेव्ह मिरज सिटीतर्फे यावेळी करण्यात आला.

माहिती अधिकारात प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार लक्ष्मी मार्केटमधील ५१ दुकान गाळ्यांचे ४ लाख ३६ हजार, लक्ष्मी मार्केटच्या आतील व कमानीतील ४६ दुकान गाळ्यांचे १ लाख ८ हजार, लक्ष्मी मार्केटच्या ६८ भाजीपाला स्टॉलचे ८० हजार, चप्पल बाजारातील ४५ दुकानांचे ६७ हजार रुपये वार्षिक उत्पन्न मिळते. या भाडेचोरीची दखल घेऊन महापालिकेच्या मालमत्तेचे उत्पन्न वाढविण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. महापालिकेची मालमत्ता काही ‘खास’ लोकांना नाममात्र भाड्यात देऊन तेथे पोटभाडेकरू निर्माण केल्याने महापालिकेचे नुकसान होत आहे. लक्ष्मी मार्केटप्रमाणे महापालिकेच्या मालकीच्या अन्य व्यापारी संकुलात बाजारभावाप्रमाणे भाडे आकारणी केल्यास सुमारे १५ कोटी रुपये उत्पन्न महापालिकेस मिळणे अपेक्षित आहे. परंतु महापालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारण्याचे काम सुरु असल्याचा आरोप करण्यात आला.

यावेळी अ‍ॅड. श्रीकृष्ण पोतकुळे, अ‍ॅड. ईर्शाद पालेगार, अ‍ॅड. दीपक नांगरे-पाटील, तानाजी रूईकर, सुशील माळी, शकील शेख, गणेश स्वामी, संतोष कदम, असिफ मुजावर उपस्थित होते.लेखापालांचे दुर्लक्षमहापालिकेचे लेखापालही या नुकसानीस आक्षेप घेत नाहीत. नगरसेवक बगलबच्च्यांच्या फायद्यासाठी भाडे वाढविण्यास विरोध करीत असल्याने आयुक्त, उपायुक्त यांनी याची दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSangliसांगली