शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
2
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान जागतिक दहशतवादाचे केंद्र; सर्व धर्मीयांनी केला पाकचा निषेध- परराष्ट्र सचिव
3
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
4
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
5
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
6
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
7
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
8
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
9
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
10
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
11
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
12
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
13
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
14
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
15
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
16
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
17
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
18
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
19
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
20
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान

किती जणांचीही आघाडी करा, सत्ता आमचीच : रावसाहेब दानवे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2019 18:53 IST

भाजपला पराभूत करण्यासाठी अनेक पक्ष, संघटना एकमेकांचे विचार पटत नसतानाही आघाडी करू पहात आहेत.

सांगली : पुन्हा एकदा भाजपचे सरकार सत्तेवर आले तर पुढील पन्नास वर्षे ते सत्तेवरून हलणार नाही, याची खात्री झाल्याने भाजपला पराभूत करण्यासाठी अनेक पक्ष, संघटना एकमेकांचे विचार पटत नसतानाही आघाडी करू पहात आहेत. कितीजणही एकत्र आले तरी भाजपचीच सत्ता केंद्रात व राज्यात येणार आहे, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी गुरुवारी येथे केला. सांगलीत कर्नाळ रस्त्यावर एका मंगल कार्यालयात भाजपच्या बुथ कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख, खासदार संजयकाका पाटील, आ. सुरेश खाडे, आ. विलासराव जगताप, आ. सुरेश हाळवणकर, माजी आमदार दिनकर पाटील, रमेश शेंडगे, भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, रवी अनासपुरे आदी उपस्थित होते.दानवे म्हणाले की, निवडणुका आल्या की आघाड्या होत असतात, मात्र ज्यांचे वैचारिक मतभेद होते ते लोकही आता एकत्र येत आहेत. कधीकाळी महाराष्ट्रात शिवसेनेपेक्षाही खालच्या क्रमांकावर असणारा भाजप आता राज्यातील अव्वल पक्ष ठरला आहे. राज्यातील १0 हजार सरपंच, १८ महापालिका, ९0 नगरपालिका, १0 जिल्हा परिषदा आणि २३ खासदारांसह आम्ही आमची ताकद दाखवून दिली आहे. वाढत जाणारी ही पक्षाची ताकद पाहूनच विरोधी गटात अस्वस्थता आहे. येणाऱ्या निवडणुकीत भाजपला रोखले नाही, तर पुढील पन्नास वर्षे कोणत्याही अन्य पक्षाला सत्तेत येण्याची संधी मिळणार नाही, याची सर्वांना खात्री आहे.सरकारचे हे यश चांगल्या धोरणांमुळे मिळत आहे. स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत कॉंग्रेसच्या सत्ताकाळात कधीही गरिबांसाठी इतक्या मोठ्या प्रमाणावर योजना राबविल्या नव्हत्या. राज्यात भाजपने ज्या योजना जाहीर केल्या, त्याची अंमलबजावणीही प्रभावीपणे केली. गरिबांच्या कल्याणाचा आमचा अजेंडा यापुढेही कायम राहणार आहे. भाजपच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्रीतपणे शासनाच्या योजना आणि त्याचा लाभ कसा दिला गेला, याची माहिती जनतेपर्यंत पोहचवावी. मार्चच्या पहिल्याच आठवड्यात अचारसंहिता लागण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आता अविश्रांत काम केले पाहिजे. येत्या ३ मार्च रोजी राज्यात सर्वत्र भाजपची मोटारसायकल रॅली काढण्याचे नियोजन केले आहे. या रॅलीतून जोरदार शक्तीप्रदर्शन स्थानिक लोकांनी करावे, असे आवाहन त्यांनी केले.धनगर आरक्षणाबाबत सकारात्मकधनगर आरक्षणासंदर्भात नियुक्त संस्थेचा अहवाल प्राप्त झाला आहे. या अधिवेशनात यासंदर्भात केंद्राकडे प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय होणार होता, मात्र युद्धजन्य परिस्थितीमुळे अधिवेशन स्थगित करावे लागले. धनगर आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक पावले टाकत आहे.

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवे