शहरं
Join us  
Trending Stories
1
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
2
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
3
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
4
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
5
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
6
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
7
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
8
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
9
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
10
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
11
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
12
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
13
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
14
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
15
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
16
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
17
ST Bus Fare Update: दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा
18
Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहनानंतरची राख, घरी का आणतात माहितीय? काय आहे परंपरा?
19
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
20
खोलीत पेटती लाईट, आत मृतदेह, अन् बाहेरून कुलूप, अशी पकडली गेली १६ वर्षांची आरोपी मुलगी   

किती जणांचीही आघाडी करा, सत्ता आमचीच : रावसाहेब दानवे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2019 18:53 IST

भाजपला पराभूत करण्यासाठी अनेक पक्ष, संघटना एकमेकांचे विचार पटत नसतानाही आघाडी करू पहात आहेत.

सांगली : पुन्हा एकदा भाजपचे सरकार सत्तेवर आले तर पुढील पन्नास वर्षे ते सत्तेवरून हलणार नाही, याची खात्री झाल्याने भाजपला पराभूत करण्यासाठी अनेक पक्ष, संघटना एकमेकांचे विचार पटत नसतानाही आघाडी करू पहात आहेत. कितीजणही एकत्र आले तरी भाजपचीच सत्ता केंद्रात व राज्यात येणार आहे, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी गुरुवारी येथे केला. सांगलीत कर्नाळ रस्त्यावर एका मंगल कार्यालयात भाजपच्या बुथ कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख, खासदार संजयकाका पाटील, आ. सुरेश खाडे, आ. विलासराव जगताप, आ. सुरेश हाळवणकर, माजी आमदार दिनकर पाटील, रमेश शेंडगे, भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, रवी अनासपुरे आदी उपस्थित होते.दानवे म्हणाले की, निवडणुका आल्या की आघाड्या होत असतात, मात्र ज्यांचे वैचारिक मतभेद होते ते लोकही आता एकत्र येत आहेत. कधीकाळी महाराष्ट्रात शिवसेनेपेक्षाही खालच्या क्रमांकावर असणारा भाजप आता राज्यातील अव्वल पक्ष ठरला आहे. राज्यातील १0 हजार सरपंच, १८ महापालिका, ९0 नगरपालिका, १0 जिल्हा परिषदा आणि २३ खासदारांसह आम्ही आमची ताकद दाखवून दिली आहे. वाढत जाणारी ही पक्षाची ताकद पाहूनच विरोधी गटात अस्वस्थता आहे. येणाऱ्या निवडणुकीत भाजपला रोखले नाही, तर पुढील पन्नास वर्षे कोणत्याही अन्य पक्षाला सत्तेत येण्याची संधी मिळणार नाही, याची सर्वांना खात्री आहे.सरकारचे हे यश चांगल्या धोरणांमुळे मिळत आहे. स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत कॉंग्रेसच्या सत्ताकाळात कधीही गरिबांसाठी इतक्या मोठ्या प्रमाणावर योजना राबविल्या नव्हत्या. राज्यात भाजपने ज्या योजना जाहीर केल्या, त्याची अंमलबजावणीही प्रभावीपणे केली. गरिबांच्या कल्याणाचा आमचा अजेंडा यापुढेही कायम राहणार आहे. भाजपच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्रीतपणे शासनाच्या योजना आणि त्याचा लाभ कसा दिला गेला, याची माहिती जनतेपर्यंत पोहचवावी. मार्चच्या पहिल्याच आठवड्यात अचारसंहिता लागण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आता अविश्रांत काम केले पाहिजे. येत्या ३ मार्च रोजी राज्यात सर्वत्र भाजपची मोटारसायकल रॅली काढण्याचे नियोजन केले आहे. या रॅलीतून जोरदार शक्तीप्रदर्शन स्थानिक लोकांनी करावे, असे आवाहन त्यांनी केले.धनगर आरक्षणाबाबत सकारात्मकधनगर आरक्षणासंदर्भात नियुक्त संस्थेचा अहवाल प्राप्त झाला आहे. या अधिवेशनात यासंदर्भात केंद्राकडे प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय होणार होता, मात्र युद्धजन्य परिस्थितीमुळे अधिवेशन स्थगित करावे लागले. धनगर आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक पावले टाकत आहे.

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवे