शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
2
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
3
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
4
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
5
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
6
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...
7
रस्ते, मेट्रो, सिंचन, कुंभमेळा...सरकारने सादर केल्या 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या
8
'ChatGPT' ला हे प्रश्न विचारू नका, नाहीतर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता
9
प्रेमात मिळाला धोका तेव्हा खासगी आयुष्यातील 'तो' व्हिडिओ केला लीक; क्रिकेटर अडकला होता वादात
10
अदानी ग्रीन एनर्जीचा ऐतिहासिक विक्रम! अक्षय ऊर्जा क्षेत्रात असं काम करणारी पहिलीच भारतीय कंपनी
11
सौरभ गोखले आणि अनुजा साठेला नकोय मूल, अभिनेत्री म्हणाली- "आम्हाला प्राणी जास्त आवडतात..."
12
मर्यादेपेक्षाही अधिक महाग होणार चांदी; रॉबर्ड कियोसाकी यांच्या दाव्यात किती तथ्य?
13
"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!
14
श्वेता तिवारीला एक्स पतीने कारमध्ये एका व्यक्तीसोबत पकडलं होतं रंगेहाथ, राजा चौधरीचा खुलासा
15
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
16
येत्या ७ जुलैला सार्वजनिक सुट्टी मिळणार? सोमवारी जाहीर झाली तर काय काय बंद असणार...
17
शुबमन गिलचा एक मेसेज अन् तो सासरवाडीतून थेट टीम इंडियाच्या ताफ्यात (VIDEO)
18
तेलंगणात रसायनांनी भरलेल्या टँकरचा स्फोट, किमान १० कामगारांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
19
Wimbledon 2025 : नोव्हाक जोकोविच विक्रमी २५ वे ग्रँडस्लॅम जिंकण्याचा डाव साधणार का?
20
दरोडा, खून...महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये १६ गंभीर गुन्हे; कुख्यात गुंडाचा उत्तर प्रदेशात एन्काउंटर

किती जणांचीही आघाडी करा, सत्ता आमचीच : रावसाहेब दानवे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2019 18:53 IST

भाजपला पराभूत करण्यासाठी अनेक पक्ष, संघटना एकमेकांचे विचार पटत नसतानाही आघाडी करू पहात आहेत.

सांगली : पुन्हा एकदा भाजपचे सरकार सत्तेवर आले तर पुढील पन्नास वर्षे ते सत्तेवरून हलणार नाही, याची खात्री झाल्याने भाजपला पराभूत करण्यासाठी अनेक पक्ष, संघटना एकमेकांचे विचार पटत नसतानाही आघाडी करू पहात आहेत. कितीजणही एकत्र आले तरी भाजपचीच सत्ता केंद्रात व राज्यात येणार आहे, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी गुरुवारी येथे केला. सांगलीत कर्नाळ रस्त्यावर एका मंगल कार्यालयात भाजपच्या बुथ कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख, खासदार संजयकाका पाटील, आ. सुरेश खाडे, आ. विलासराव जगताप, आ. सुरेश हाळवणकर, माजी आमदार दिनकर पाटील, रमेश शेंडगे, भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, रवी अनासपुरे आदी उपस्थित होते.दानवे म्हणाले की, निवडणुका आल्या की आघाड्या होत असतात, मात्र ज्यांचे वैचारिक मतभेद होते ते लोकही आता एकत्र येत आहेत. कधीकाळी महाराष्ट्रात शिवसेनेपेक्षाही खालच्या क्रमांकावर असणारा भाजप आता राज्यातील अव्वल पक्ष ठरला आहे. राज्यातील १0 हजार सरपंच, १८ महापालिका, ९0 नगरपालिका, १0 जिल्हा परिषदा आणि २३ खासदारांसह आम्ही आमची ताकद दाखवून दिली आहे. वाढत जाणारी ही पक्षाची ताकद पाहूनच विरोधी गटात अस्वस्थता आहे. येणाऱ्या निवडणुकीत भाजपला रोखले नाही, तर पुढील पन्नास वर्षे कोणत्याही अन्य पक्षाला सत्तेत येण्याची संधी मिळणार नाही, याची सर्वांना खात्री आहे.सरकारचे हे यश चांगल्या धोरणांमुळे मिळत आहे. स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत कॉंग्रेसच्या सत्ताकाळात कधीही गरिबांसाठी इतक्या मोठ्या प्रमाणावर योजना राबविल्या नव्हत्या. राज्यात भाजपने ज्या योजना जाहीर केल्या, त्याची अंमलबजावणीही प्रभावीपणे केली. गरिबांच्या कल्याणाचा आमचा अजेंडा यापुढेही कायम राहणार आहे. भाजपच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्रीतपणे शासनाच्या योजना आणि त्याचा लाभ कसा दिला गेला, याची माहिती जनतेपर्यंत पोहचवावी. मार्चच्या पहिल्याच आठवड्यात अचारसंहिता लागण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आता अविश्रांत काम केले पाहिजे. येत्या ३ मार्च रोजी राज्यात सर्वत्र भाजपची मोटारसायकल रॅली काढण्याचे नियोजन केले आहे. या रॅलीतून जोरदार शक्तीप्रदर्शन स्थानिक लोकांनी करावे, असे आवाहन त्यांनी केले.धनगर आरक्षणाबाबत सकारात्मकधनगर आरक्षणासंदर्भात नियुक्त संस्थेचा अहवाल प्राप्त झाला आहे. या अधिवेशनात यासंदर्भात केंद्राकडे प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय होणार होता, मात्र युद्धजन्य परिस्थितीमुळे अधिवेशन स्थगित करावे लागले. धनगर आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक पावले टाकत आहे.

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवे