शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
2
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
3
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
4
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
5
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
6
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
7
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
8
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
9
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
10
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
11
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
12
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
13
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
14
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
15
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
16
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
17
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
18
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
19
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
20
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन

राग ही भावना कशी हाताळतो, यावर समाज स्वास्थ्य अवलंबून - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे हमीद दाभोलकर यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 23:49 IST

‘समाजात वाढणारा हिंसाचार आणि आत्महत्या यामागे देखील रंगाच्या सारख्या नकारात्मक भावना असतात. राग येणे, ही एक अगदी नैसर्गिक भावना आहे, ती पूर्णपणे टाळणे कुणालाही शक्य नाही; पण ती भावना

ठळक मुद्देसध्या समाजात बऱ्याच सणांचे टोकाचे उत्सवीकरण आणि बाजारीकरण केले जात आहे.

सातारा : ‘समाजात वाढणारा हिंसाचार आणि आत्महत्या यामागे देखील रंगाच्या सारख्या नकारात्मक भावना असतात. राग येणे, ही एक अगदी नैसर्गिक भावना आहे, ती पूर्णपणे टाळणे कुणालाही शक्य नाही; पण ती भावना आपण कशी हाताळतो? त्यावरून आपल्या स्वत:चे भावनिक आरोग्य नातेसंबंध आणि एकुणात समाजाचे स्वास्थ्य अवलंबून असते,’ असे मत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सरचिटणीस डॉ. हमीद दाभोलकर यांनी व्यक्त केले.

डॉ. दाभोलकर म्हणाले, ‘सध्या समाजात बऱ्याच सणांचे टोकाचे उत्सवीकरण आणि बाजारीकरण केले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर संक्रांतीसारख्या सणाच्या मागची मानवी नाते संबंध टिकवण्याची जी प्रेरणा आहे, त्याला उजाळा देण्याचा ‘लोकमत’चा प्रयत्न स्तुत्य आहे. त्यानिमित्ताने निवडलेला विषय राग आणि इतर नकारात्मक भावनेचे मानवी मनावर आणि एकूण समाजावर होणारे परिणाम हा एकदम महत्त्वाचा आणि दुर्लक्षित विषय आहे.’सध्याच्या समाजातील वाढती जातीय आणि धार्मिक तेढ यामागचे मूळचे कारण हे रागाची भावनांचं आहे, असे म्हटले तर चुकीचे होणार नाही.

समाजात वाढणारा हिंसाचार आणि आत्महत्या यामागे देखील रंगाच्या सारख्या नकारात्मक भावना असतात. राग येणे ही एक अगदी नैसर्गिक भावना आहे, ती पूर्णपणे टाळणे कुणालाही शक्य नाही; पण ती भावना आपण कशी हाताळतो? त्यावरून आपल्या स्वत:चे भावनिक आरोग्य नातेसंबंध आणि एकुणात समाजाचे स्वास्थ्य अवलंबून असते. आपल्याला राग आलेला आहे, हे पहिल्यांदा स्वत:ला जाणवणे, तो योग्य शब्दात व्यक्त करणे, दुसºयाला आलेला राग ओळखता येणे आणि तो हाताळता येणे, ही चार कौशल्ये रागाच्या नियोजनाच्या साठी खूप महत्त्वाची आहेत. तिळगूळ घ्या, गोड बोला, हे वाक्य म्हणायला खूप सोपे असले तरी आपल्या मनातील रागाच्या आणि टोकाच्या नकारार्थी भावना बाजूला ठेवून तसे वागणे अजिबात सोपे नाही. संक्रांतीच्या निमित्त एकमेकांना तिळगूळ घ्या, गोड बोला म्हणताना ते केवळ उपचार न राहाता जर वर सांगितलेल्या गोष्टी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न जर करू लागलो तर किती तरी वाईट गोष्टी आपल्याला टाळता येतील.

रागमुक्त समाजाचे चित्र आज जरी अशक्य वाटत असले तरी देखील हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण किती प्रयत्न करतो, यावरच मानव जातीचे भवितव्य अवलंबून आहे, असे म्हटले तरी अतिशयोक्ती होणार नाही !हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहूल लावणारा संक्रांतीचा सण तसा संक्रमणाचा काळ आहे. या सणाचं वैशिष्ट्य म्हणजे तिळाची वडी. आई डॉ. शैला दाभोलकर आणि मामी अनघा तेंडोलकर यांनी केलेली तिळाची वडी मला स्वत:ला खूप आवडते. आमच्या घरी आम्ही दरवर्षी न चुकता तिळाच्या वड्या करतो.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर