शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

राग ही भावना कशी हाताळतो, यावर समाज स्वास्थ्य अवलंबून - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे हमीद दाभोलकर यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 23:49 IST

‘समाजात वाढणारा हिंसाचार आणि आत्महत्या यामागे देखील रंगाच्या सारख्या नकारात्मक भावना असतात. राग येणे, ही एक अगदी नैसर्गिक भावना आहे, ती पूर्णपणे टाळणे कुणालाही शक्य नाही; पण ती भावना

ठळक मुद्देसध्या समाजात बऱ्याच सणांचे टोकाचे उत्सवीकरण आणि बाजारीकरण केले जात आहे.

सातारा : ‘समाजात वाढणारा हिंसाचार आणि आत्महत्या यामागे देखील रंगाच्या सारख्या नकारात्मक भावना असतात. राग येणे, ही एक अगदी नैसर्गिक भावना आहे, ती पूर्णपणे टाळणे कुणालाही शक्य नाही; पण ती भावना आपण कशी हाताळतो? त्यावरून आपल्या स्वत:चे भावनिक आरोग्य नातेसंबंध आणि एकुणात समाजाचे स्वास्थ्य अवलंबून असते,’ असे मत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सरचिटणीस डॉ. हमीद दाभोलकर यांनी व्यक्त केले.

डॉ. दाभोलकर म्हणाले, ‘सध्या समाजात बऱ्याच सणांचे टोकाचे उत्सवीकरण आणि बाजारीकरण केले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर संक्रांतीसारख्या सणाच्या मागची मानवी नाते संबंध टिकवण्याची जी प्रेरणा आहे, त्याला उजाळा देण्याचा ‘लोकमत’चा प्रयत्न स्तुत्य आहे. त्यानिमित्ताने निवडलेला विषय राग आणि इतर नकारात्मक भावनेचे मानवी मनावर आणि एकूण समाजावर होणारे परिणाम हा एकदम महत्त्वाचा आणि दुर्लक्षित विषय आहे.’सध्याच्या समाजातील वाढती जातीय आणि धार्मिक तेढ यामागचे मूळचे कारण हे रागाची भावनांचं आहे, असे म्हटले तर चुकीचे होणार नाही.

समाजात वाढणारा हिंसाचार आणि आत्महत्या यामागे देखील रंगाच्या सारख्या नकारात्मक भावना असतात. राग येणे ही एक अगदी नैसर्गिक भावना आहे, ती पूर्णपणे टाळणे कुणालाही शक्य नाही; पण ती भावना आपण कशी हाताळतो? त्यावरून आपल्या स्वत:चे भावनिक आरोग्य नातेसंबंध आणि एकुणात समाजाचे स्वास्थ्य अवलंबून असते. आपल्याला राग आलेला आहे, हे पहिल्यांदा स्वत:ला जाणवणे, तो योग्य शब्दात व्यक्त करणे, दुसºयाला आलेला राग ओळखता येणे आणि तो हाताळता येणे, ही चार कौशल्ये रागाच्या नियोजनाच्या साठी खूप महत्त्वाची आहेत. तिळगूळ घ्या, गोड बोला, हे वाक्य म्हणायला खूप सोपे असले तरी आपल्या मनातील रागाच्या आणि टोकाच्या नकारार्थी भावना बाजूला ठेवून तसे वागणे अजिबात सोपे नाही. संक्रांतीच्या निमित्त एकमेकांना तिळगूळ घ्या, गोड बोला म्हणताना ते केवळ उपचार न राहाता जर वर सांगितलेल्या गोष्टी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न जर करू लागलो तर किती तरी वाईट गोष्टी आपल्याला टाळता येतील.

रागमुक्त समाजाचे चित्र आज जरी अशक्य वाटत असले तरी देखील हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण किती प्रयत्न करतो, यावरच मानव जातीचे भवितव्य अवलंबून आहे, असे म्हटले तरी अतिशयोक्ती होणार नाही !हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहूल लावणारा संक्रांतीचा सण तसा संक्रमणाचा काळ आहे. या सणाचं वैशिष्ट्य म्हणजे तिळाची वडी. आई डॉ. शैला दाभोलकर आणि मामी अनघा तेंडोलकर यांनी केलेली तिळाची वडी मला स्वत:ला खूप आवडते. आमच्या घरी आम्ही दरवर्षी न चुकता तिळाच्या वड्या करतो.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर