शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

युवकांचे आशास्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:29 IST

राजकीय पक्ष, गट-तट, धर्मभेद बाजूला ठेवून, आपल्याकडे काम घेऊन आलेला कार्यकर्ता आपल्या तालुक्यातील आहे. असे समजून सतत काम करीत ...

राजकीय पक्ष, गट-तट, धर्मभेद बाजूला ठेवून, आपल्याकडे काम घेऊन आलेला कार्यकर्ता आपल्या तालुक्यातील आहे. असे समजून सतत काम करीत असणाऱ्या व कार्यकर्त्यांना आपलेसे करणाऱ्या विक्रमदादांनी अल्पावधीतच जत तालुक्यातील राजकारणात गरुडभरारी घेतली आहे. भारतीय सहकारी बँक, तालुका काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष, जत तालुका अंगणवाडी सेविका व मदतनीस निवड समितीचे सदस्य, धैर्यशील यशवंतराव सावंत पतसंस्था जत व दत्त ग्रामीण नागरी सहकारी पतसंस्था डफळापूरचे संस्थापक, सांगली प्रीमियर लीगचे अध्यक्ष आणि अभिविश्व चॅरिटेबल फाऊंडेशनच्यावतीने ‘लेक वाचवा अभियान’ या माध्यमातून दादांनी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. वरील सर्व संस्थांच्या माध्यमातून कोणत्याही पदाची व इतर अपेक्षा न बाळगता, काँग्रेस पक्ष तसेच इतर सर्व पक्षांतील सर्वसामान्य कार्यकर्ता हाच केंद्रबिंदू मानून त्यांनी कार्यकर्त्यांना आपलेसे करण्याचा प्रयत्न चालू ठेवला आहे. त्यामुळे जत शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांशी त्यांची नाळ जुळली आहे.

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व उमदी जिल्हा परिषद सदस्य, भारती सहकारी बँक, भारती हॉस्पिटल, भारती मेडिकल कॉलेज आदी संस्थांच्या माध्यमातून जत तालुक्यातील दीनदलित, गोरगरीब जनतेला ज्यादा फायदा व्हावा व त्यांचे आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक जीवनमान सुधारावे यासाठी त्यांनी मागील पंचवीस-तीस वर्षांपासून सतत प्रयत्न केले आहेत. त्याचा परिणाम आता जत तालुक्यात दिसू लागला आहे. त्यामुळे त्यांचे नाव सतत चर्चेत येऊ लागले आहे. जत तालुक्यातील भारती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांना दादा सतत दिलासा देतात. ज्या रुग्णांची उपचार करून घेण्याची व रुग्णालयापर्यंत वाहनातून जाण्याची आर्थिक ऐपत नसते, अशा रुग्णांसाठी ते देवदूत होऊन येतात. कमी खर्चात सर्वाधिक आणि चांगले उपचार करून देण्याचा फायदा जत तालुक्यातील जनतेला त्यांनी मिळवून दिलेला आहे.

पदांची व आर्थिक लाभाची कोणतीही अपेक्षा न बाळगता सतत काम करण्याच्या या त्यांच्या पद्धतीमुळे तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्ते व काँग्रेस पक्षातील नेतेमंडळी तालुक्यातील प्रभावी नेतृत्व व युवक नेते म्हणून त्यांच्याकडे पाहू लागली आहेत.

दादांना घरातूनच राजकारण व समाजकारणाचे बाळकडू मिळालेले आहे. त्यांचे आजोबा सरदार यशवंतराव माधवराव सावंत हे जत संस्थानचे मुख्यमंत्री होते. त्यांनी त्यांच्या कार्यकालात संस्थानकडून कोणताही आर्थिक मोबदला घेतला नाही. जनसेवा हेच ध्येय ठेवून त्यांनी समाजसेवा केली. संस्थान विलीन झाल्यानंतर १९६२ ते १९७२ अखेर सलग दहा वर्षे आजोबा व त्यानंतर विक्रम दादांचे चुलते सरदार रामराव यशवंतराव सावंत यांनी १४ जून १९७९ ते ३० जून १९९० अशा सलग ११ वर्षांच्या कालावधीत जत पंचायत समितीचे सभापती म्हणून यशस्वीपणे काम केलेले आहे.

राज्याचे माजी वनमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या सामाजिक विचारावर त्यांचे कार्य सुरू आहे. तसेच प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम, भारती विद्यापीठ शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा विजयमाला कदम, प्रादेशिक परिवहन समितीचे माजी सदस्य अनंत ऊर्फ बाबा शिंदे, सांगली जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष व आमदार मोहनशेठ कदम आदी मान्यवरांचे त्यांना सतत मार्गदर्शन मिळत आहे. त्याचा उपयोग जत तालुक्याच्या विकासासाठी करण्याचा संकल्प दादांनी हाती घेतला आहे. त्यामुळे आता परिवर्तनाची चळवळ अधिक गतिमान होऊ लागली आहे. जत तालुक्याच्या राजकीय पटलावर दादांचे नेतृत्व उगवते असले तरी, त्यांनी आपल्या कामातून तालुक्यातील जनतेच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. कोणत्याही दबावाला व आमिषाला बळी न पडता तालुक्‍यातील तरुणांनी विधानसभा निवडणूक प्रचार यंत्रणा हातात घेऊन सुमारे ४० हजार मताधिक्‍याने त्यांना जत विधानसभा मतदार संघातून विजयी केले आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता, कार्यकर्ते व तरुणांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. यापुढील काळातही त्यांची अशीच उत्तरोत्तर प्रगती व्हावी, हीच त्यांच्या वाढदिनी आमची शुभेच्छा..!

चाैकट

नाव - मा. आमदार विक्रमसिंह (दादा) बाळासाहेब सावंत

शिक्षण - बी.कॉम.

जन्मतारीख - ४ फेब्रुवारी १९७२

पत्ता- विजय कॉलनी, मंगळवार पेठ जत, ता. जत जि. सांगली

दूरध्वनी- ९८२२२६७९१९

आवडते नेते - माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, मा. डॉ. पतंगराव कदम

छंद - वाचन, जनसंपर्क व समाजसेवा

खेळ - व्हॉलिबॉल व कबड्‌डी

पुस्तक - अग्निपंख (लेखक - माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम)

वैवाहिक जीवन - पत्नी व दोन मुले

चाैकट

भविष्यातील योजना...

जत तालुका विभाजन/त्रिभाजन, तालुक्यातील शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविणे, बेरोजगारांना रोजगार निर्मिती, गरजूंना माफक दरात व मोफत रुग्णसेवा व अन्य शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे. कृषी महाविद्यालय सुरू करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करणे, कर्नाटकातील तुबची-बबलेश्वर योजनेतून जत तालुक्याच्या पूर्व भागातील वंचित गावांना पाणी उपलब्ध करून देणे.