शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कलावंताचा सन्मान म्हणजे अभिनयाला दाद : जयंत सावरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 00:48 IST

सांगली : कलावंताचा सन्मान हा कलाकाराच्या अभिनयाला दाद देणारा असतो. कलावंताबद्दल सुख देणारा सन्मान आयुष्यात महत्त्वाचा असतो,

ठळक मुद्देअनेक पुरस्कारांचे ओझे माझ्यावर आहे. मागच्यावर्षी नाट्याचार्य विष्णुदास भावे पुरस्कार घेताना मनापासून आनंद झाला

सांगली : कलावंताचा सन्मान हा कलाकाराच्या अभिनयाला दाद देणारा असतो. कलावंताबद्दल सुख देणारा सन्मान आयुष्यात महत्त्वाचा असतो, असे प्रतिपादन अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांनी केले.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद सांगली शाखेच्यावतीने रंगभूमी दिनाच्या पूर्वसंध्येला नाट्यक्षेत्र, साहित्य क्षेत्र, नाट्यतंत्र अशा अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाºया व्यक्तींचा सन्मान अभिनेते सावरकर आणि भावे पुरस्काराचे मानकरी अभिनेते मोहन जोशी यांच्याहस्ते करण्यात आला. डॉ. तारा भवाळकर यांना ‘काकासाहेब खाडिलकर जीवन गौरव पुरस्कार’, प्रा. वैजनाथ महाजन यांना ‘आचार्य अत्रे प्रतिभारंग पुरस्कार’, सुरेश आठवले यांना ‘प्रा. अरुण पाटील नाट्यतंत्र पुरस्कार’, तर अरविंद लिमये यांना ‘प्रा. दिलीप परदेशी नाट्यरंग पुरस्कार’ आणि डॉ. शरद कराळे यांचा गौरव केला. यावेळी सावरकर बोलत होते. ते पुढे म्हणाले की, आयुष्यात माझ्या हस्ते इतक्या मान्यवरांचा सन्मान होईल, असे स्वप्नातही वाटले नव्हते. अनेक पुरस्कारांचे ओझे माझ्यावर आहे. मिळणारा पुरस्कार हा मनाला आनंद देणारा असतो. कलावंताबद्दल सुख देणारा हा पुरस्कार असतो. मागच्यावर्षी नाट्याचार्य विष्णुदास भावे पुरस्कार घेताना मनापासून आनंद झाला, असे ते म्हणाले.

अभिनेते मोहन जोशी म्हणाले, भावे पुरस्कार मला जाहीर झाला, हे माझे भाग्य आहे. यात लेखक, निर्माते, कलावंत, रसिकांचे सहकार्य लाभले. आयुष्यभर सिनेमा आणि नाटक सोडून मी काही केले नाही.यावेळी पुरस्कारप्राप्त तारा भवाळकर, प्रा. वैजनाथ महाजन यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी नाट्यपरिषदेचे मध्यवर्ती मंडळाचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, प्राचार्य डॉ. भास्कर ताम्हणकर, कोषाध्यक्ष भालचंद्र चितळे, डॉ. दयानंद नाईक आदी उपस्थित होते. नाट्य परिषदेचे अध्यक्ष मुकुंद पटवर्धन यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्षा चेतना वैद्य यांनी पुरस्कार मिळालेल्यांचा परिचय करुन दिला. कार्यवाह श्रीनिवास जरंडीकर यांनी सूत्रसंचालन केले, तर विजय कडणे यांनी आभार मानले.सांगली पहिली सांस्कृतिक नगरी होईल : महाजनपुण्याला प्रथम सांस्कृतिक नगरी म्हटले जात आहे. दोन नंबरचे नाव राज्यात सांगलीचे घेतले जात आहे. सांगली, मिरज शहरातील नाट्य संस्था आणि कलाकारांच्या कार्याचा वेग लक्षात घेता, भविष्यात सांगली ही राज्यात पहिली सांस्कृतिक नगरी असेल, असा विश्वास प्रा. वैजनाथ महाजन यांनी व्यक्त केला. यावेळी उपस्थित कलाकार व रसिकांनी या गोष्टीस टाळ््यांच्या कडकडाटात दाद दिली.

टॅग्स :Mohan Joshiमोहन जोशीentertainmentकरमणूक