शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाकाळातच जनसेवेची इतिश्री, आज अनेक सरकारी नोकरदारांची निवृत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:20 IST

सांगली : वयाची ५८ वर्षे पूर्ण केलेली अनेक सरकारी नोकरदार मंडळी सोमवारी (दि. ३१) सेवानिवृत्त होत आहेत. कोरोना व ...

सांगली : वयाची ५८ वर्षे पूर्ण केलेली अनेक सरकारी नोकरदार मंडळी सोमवारी (दि. ३१) सेवानिवृत्त होत आहेत. कोरोना व लॉकडाऊनमुळे कोणताही साग्रसंगीत निरोप समारंभ न होताच ही मंडळी प्रदीर्घ लोकसेवेचा निरोप घेत आहेत.

प्राथमिक शिक्षकांनी हजेरीवर सरसकट १ जून जन्मतारीख नोंदवलेल्या नोकरदारांचा सेवा कालावधी सोमवारी समाप्त होईल, त्यामुळे जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांत उद्या त्यांच्या कामाचा शेवटचा दिवस असेल. जिल्हाधिकारी कार्यालय, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद, एस. टी., कृषी, पाणीपुरवठा, आरोग्य अशा अनेकविध विभागांमधील कर्मचारी सोमवारी निवृत्त होत आहेत. विशेषत: याचा मोठा फटका आरोग्य विभागाला बसणार आहे. कोरोना काळात या विभागावर सर्वाधिक ताण आहे. गेले सव्वा वर्ष कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मदतीने कोरोनाशी लढा देण्याचे काम सुरु आहे. आता हक्काचे कायम कर्मचारी निवृत्त होेत असल्याने प्रशासनाला अडथळ्यांचा सामना करावा लागेल. कोरोनासाठी शिक्षण, बांधकाम, कृषी अशा अनेक विभागांमधील कर्मचारी दिमतीला घेतले आहेत. तेदेखील सोमवारी कायमची रजा घेणार असल्याने मनुष्यबळाची चणचण निर्माण होईल.

शासनाने अनेक वर्षांपासून नवी नोकरभरती केलेली नाही, त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळावर कोरोनाशी लढा सुरु होता, तोदेखील आता कठीण होणार आहे. यापूर्वी २८ फेब्रुवारी, ३१ मार्च रोजीही काही कर्मचारी निवृत्त झाले होते, पण त्यांची संख्या कमी असल्याने तीव्रता जाणवली नव्हती. मात्र, ३१ मे रोजी निवृत्त होणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

चौकट

ना फूल, ना फुलाची पाकळी

एकाच खात्यात वर्षानुवर्षे काम केल्याने कर्मचाऱ्यांत स्नेहबंध निर्माण झालेले असतात. निवृत्तीवेळी निरोप देण्यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात. यंदा मात्र कोणताही जाहीर निरोप न घेता, कर्मचारी शांतपणे घरी जाताना दिसत आहेत. लॉकडाऊनमुळे जाहीर निरोप समारंभ झाले नाहीत. काही कर्मचाऱ्यांना कार्यालयीन स्तरावर छोटेखानी कार्यक्रमात निरोप देण्यात आला. शनिवारी व रविवारी सुट्टी असल्याने अनेक कर्मचाऱ्यांनी शुक्रवारीच निरोप घेतला. गेल्यावर्षीही लॉकडाऊन असल्याने कर्मचाऱ्यांनी अशाचप्रकारे कार्यालये सोडली होती.