शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
2
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
3
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
4
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
5
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
8
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
9
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
10
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
11
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
12
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
13
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
14
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
15
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
16
Astrology: जूनचा शेवट 'या' पाच राशींसाठी तापदायक; वाढणार समस्या, होणार आर्थिक नुकसान!
17
"तिला परत त्या असुरक्षित वातावरणात ढकललंच नाही पाहिजे...", हुंडाबळी प्रकरणावर नेहा शितोळे स्पष्टच बोलली
18
'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट
19
हा माणूस आहे की पैसे छपाईची मशिन...२ हजार कोटी पगार, ५2८ कोटी बोनस; रोनाल्डोला काय काय मिळणार?
20
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले

आंधळी येथील ऐतिहासिक बारव २१६ वर्षांनंतरही सुस्थितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 12:09 IST

water scarcity Sangli : आंधळी परिसरातील बारवमध्ये शके १७२७ मधील शिलालेख आढळला आहे. महाराष्ट्र बारव मोहिमेतर्फे राज्यभरातील इतिहासकालीन विहीरी, बारव, कुंड, पुष्करणी यांचा धांडोळा घेतला जात आहे, या मोहिमेदरम्यान आंधळी येथील बारवेतील शिलालेखाचा थांग लागला.

ठळक मुद्दे आंधळी येथील ऐतिहासिक बारव २१६ वर्षांनंतरही सुस्थितीतमहाराष्ट्र बारव मोहिमेतर्फे बारवेतील शिलालेखाचा लागला थांग

पलूस : आंधळी परिसरातील बारवमध्ये शके १७२७ मधील शिलालेख आढळला आहे. महाराष्ट्र बारव मोहिमेतर्फे राज्यभरातील इतिहासकालीन विहीरी, बारव, कुंड, पुष्करणी यांचा धांडोळा घेतला जात आहे, या मोहिमेदरम्यान आंधळी येथील बारवेतील शिलालेखाचा थांग लागला.या शिलालेखावरील मजकुराचे विश्लेषण करुन इतिहास समाजासमोर आणण्याचे काम करणार असल्याचे मोहिमेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. मोहिमेअंतर्गत मंगळवारी (दि. ६) आंधळी परिसरातील सिकंदर शिकलगार यांच्या शेतात ऐतिहासिक बारव असल्याची माहिती मिळाली होती.

मोहिमेतील कार्यकर्त्यांनी पाहणी केली असता दगडाचे अत्यंत देखणे बांधकाम केलेली बारव समोर आली. हा ऐतिहासिक ठेवा आजपर्यंत समाजासमोर आला नाही याचेही आश्चर्य वाटले. गावापासून दूर व दुर्लक्षित ठिकाणी बारव आहे. बांधकामाची भव्यता पाहताक्षणी जाणवते. इतिहासाची साक्ष देणारी अंतर्गत रचना अजूनही मजबूत आहे.

मोठी दगडी कमान, आत उतरण्यासाठी असणाऱ्या दणकट पायऱ्या यामुळे ताकद स्पष्ट होते. आतील भिंतीवर शिलालेख आहे. त्यावर देवनागरी लिपीत मजकूर लिहिला असून पटवर्धन संस्थानिकांचा उल्लेख आहे. असाच शिलालेख कर्नाळ येथील बारवमध्येदेखील असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.दोहोंवरील मजकूर एकसराखा असून फक्त गावांच्या नावांचा फरक आहे. त्यामुळे हे दोन्ही शिलालेख आणि दोन्ही बारव एकाचवेळी बांधल्याचे दिसते. बारवमध्ये अजूनही थंडगार पाणी भरलेले असते.शिलालेखाची माहिती कार्यकर्त्यांनी पुण्यातील शिलालेख अभ्यासक अनिल दुधाने यांना पाठवली आहे. त्यांच्याकडून लवकरच तपशीलवार माहिती उपलब्ध होईल असे बारव मोहिमेचे सदस्य महेश मदने यांनी सांगितले. या शोध मोहिमेत सिकंदर शिकलगार, दगडू जाधव, मारुती शिरतोडे यांनी भाग घेतला.

जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक वास्तु, बारव आणि इमारती अत्यंत सुस्थितीत आहेत. दोन-तीनशे वर्षांनंतरही त्या इतिहासाची साक्ष देत अखंडीत स्वरुपात उभ्या आहेत. शासनाने त्यांची निगा राखण्याची गरज आहे, तरच पुढील पिढीला हा ठेवा उपलब्ध होईल.- महेश मदने,महाराष्ट्र बारव मोहीम, सांगली.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईSangliसांगलीpalus-kadegaon-acपलूस कडेगाव