शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

आंधळी येथील ऐतिहासिक बारव २१६ वर्षांनंतरही सुस्थितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 12:09 IST

water scarcity Sangli : आंधळी परिसरातील बारवमध्ये शके १७२७ मधील शिलालेख आढळला आहे. महाराष्ट्र बारव मोहिमेतर्फे राज्यभरातील इतिहासकालीन विहीरी, बारव, कुंड, पुष्करणी यांचा धांडोळा घेतला जात आहे, या मोहिमेदरम्यान आंधळी येथील बारवेतील शिलालेखाचा थांग लागला.

ठळक मुद्दे आंधळी येथील ऐतिहासिक बारव २१६ वर्षांनंतरही सुस्थितीतमहाराष्ट्र बारव मोहिमेतर्फे बारवेतील शिलालेखाचा लागला थांग

पलूस : आंधळी परिसरातील बारवमध्ये शके १७२७ मधील शिलालेख आढळला आहे. महाराष्ट्र बारव मोहिमेतर्फे राज्यभरातील इतिहासकालीन विहीरी, बारव, कुंड, पुष्करणी यांचा धांडोळा घेतला जात आहे, या मोहिमेदरम्यान आंधळी येथील बारवेतील शिलालेखाचा थांग लागला.या शिलालेखावरील मजकुराचे विश्लेषण करुन इतिहास समाजासमोर आणण्याचे काम करणार असल्याचे मोहिमेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. मोहिमेअंतर्गत मंगळवारी (दि. ६) आंधळी परिसरातील सिकंदर शिकलगार यांच्या शेतात ऐतिहासिक बारव असल्याची माहिती मिळाली होती.

मोहिमेतील कार्यकर्त्यांनी पाहणी केली असता दगडाचे अत्यंत देखणे बांधकाम केलेली बारव समोर आली. हा ऐतिहासिक ठेवा आजपर्यंत समाजासमोर आला नाही याचेही आश्चर्य वाटले. गावापासून दूर व दुर्लक्षित ठिकाणी बारव आहे. बांधकामाची भव्यता पाहताक्षणी जाणवते. इतिहासाची साक्ष देणारी अंतर्गत रचना अजूनही मजबूत आहे.

मोठी दगडी कमान, आत उतरण्यासाठी असणाऱ्या दणकट पायऱ्या यामुळे ताकद स्पष्ट होते. आतील भिंतीवर शिलालेख आहे. त्यावर देवनागरी लिपीत मजकूर लिहिला असून पटवर्धन संस्थानिकांचा उल्लेख आहे. असाच शिलालेख कर्नाळ येथील बारवमध्येदेखील असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.दोहोंवरील मजकूर एकसराखा असून फक्त गावांच्या नावांचा फरक आहे. त्यामुळे हे दोन्ही शिलालेख आणि दोन्ही बारव एकाचवेळी बांधल्याचे दिसते. बारवमध्ये अजूनही थंडगार पाणी भरलेले असते.शिलालेखाची माहिती कार्यकर्त्यांनी पुण्यातील शिलालेख अभ्यासक अनिल दुधाने यांना पाठवली आहे. त्यांच्याकडून लवकरच तपशीलवार माहिती उपलब्ध होईल असे बारव मोहिमेचे सदस्य महेश मदने यांनी सांगितले. या शोध मोहिमेत सिकंदर शिकलगार, दगडू जाधव, मारुती शिरतोडे यांनी भाग घेतला.

जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक वास्तु, बारव आणि इमारती अत्यंत सुस्थितीत आहेत. दोन-तीनशे वर्षांनंतरही त्या इतिहासाची साक्ष देत अखंडीत स्वरुपात उभ्या आहेत. शासनाने त्यांची निगा राखण्याची गरज आहे, तरच पुढील पिढीला हा ठेवा उपलब्ध होईल.- महेश मदने,महाराष्ट्र बारव मोहीम, सांगली.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईSangliसांगलीpalus-kadegaon-acपलूस कडेगाव