शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
2
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
3
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
4
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
5
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
6
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
7
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
8
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
9
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
10
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
11
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
12
२४ तास नव्हे, अवघ्या 'इतक्या' मिनिटांचा असतो अवकाशातील दिवस! किती वेळा दिसतो सूर्योदय?
13
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
14
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
15
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
16
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
17
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
18
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?
19
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?

सांगली-पेठ रस्त्यावर पुन्हा नरकंयातना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 15:25 IST

पेठ ते सांगली मार्गावरील खड्ड्यांच्या यातनादायी प्रवासातून काहीअंशी काहीकाळ सुटका झाल्याचा आनंद प्रवाशांना मिळाल्यानंतर पुन्हा आता नरकयातना नशिबी आल्या आहेत. पेठ ते कसबे डिग्रज या डांबरीकरण पूर्ण झालेल्या रस्त्यावरील खड्डे पूर्ववत होत असताना कसबे डिग्रज ते सांगलीवाडी टोलनाक्यापर्यंतचे काम अजूनही सुरू झालेले नाही. त्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहेत.

ठळक मुद्देसांगली-पेठ रस्त्यावर पुन्हा नरकंयातना...टोलनाक्यापर्यंतचे काम अजूनही सुरू झालेले नाही, प्रवाशांचे हाल

अविनाश कोळी सांगली : पेठ ते सांगली मार्गावरील खड्ड्यांच्या यातनादायी प्रवासातून काहीअंशी काहीकाळ सुटका झाल्याचा आनंद प्रवाशांना मिळाल्यानंतर पुन्हा आता नरकयातना नशिबी आल्या आहेत. पेठ ते कसबे डिग्रज या डांबरीकरण पूर्ण झालेल्या रस्त्यावरील खड्डे पूर्ववत होत असताना कसबे डिग्रज ते सांगलीवाडी टोलनाक्यापर्यंतचे काम अजूनही सुरू झालेले नाही. त्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहेत.सांगली ते पेठ या रस्त्याच्या कामावरून गेली पाच वर्षे नागरिक, सामाजिक संघटनांचा संघर्ष सुरू आहे. सांगली ते पेठ या रस्त्यासाठी २०१७ मध्ये सर्वपक्षीय कृती समितीच्या आंदोलनाने दिल्लीलाही हादरवले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच नाव या रस्त्याला देण्याची अभिनव आंदोलनाची कल्पना राबविली गेल्यामुळे त्याचा डंका गुजरातपर्यंत वाजला. त्यामुळे राज्य महामार्गातून सुटका करीत या रस्त्याचा समावेश राष्टÑीय महामार्गात करण्यात आला. राष्ट्रीय महामार्गाचा भाग बनल्यानंतरही रस्त्याचे दुखणे थांबलेले नाही. प्रवाशांना, येथील शेतकऱ्यांना, नागरिकांना गेली अनेक वर्षे हा रस्ता छळत आहे.तीन वर्षापूर्वी पेठ ते सांगली या मार्गाच्या डांबरीकरणासाठी तीन टप्पे करण्यात आले. बावची फाटा ते वाळवा फाटा, औदुंबर फाटा ते मिरजवाडी आणि तुंग ते सांगलीवाडी टोल नाका अशा टप्प्यात हे काम मंजूर झाले होते. संबंधित ठेकेदारांनी काम पूर्ण केल्यानंतर तुंग ते सांगलीवाडी नाक्यापर्यंतच्या कामात पुन्हा दोन भाग पाडण्यात आले. तुंग ते कसबे डिग्रज आणि कसबे डिग्रज ते सांगलीवाडी नाका अशा दोन टप्प्यांचे शेपूट दीर्घकाळ रखडले. यातील तुंग ते कसबे डिग्रज हे काम पूर्ण झाले असले तरी, कसबे डिग्रज ते सांगलीवाडी नाक्यापर्यंतचे काम अद्याप सुरू झालेले नाही.गेले पाच महिने पडणाºया पावसामुळे केवळ पॅचवर्क करण्याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभागाकडे कोणताही पर्याय उरला नव्हता, मात्र पावसाने पॅचवर्क वाहून गेल्याने प्रवाशांचे भल्यामोठ्या खड्ड्यांमधून मुठीत जीव घेऊन मार्गक्रमण करणे चालू झाले आहे. वेदनांचा हा प्रवास पाऊस थांबेपर्यंत चालू राहणार आहे. नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाSangliसांगली