शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

सांगली-पेठ रस्त्यावर पुन्हा नरकंयातना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 15:25 IST

पेठ ते सांगली मार्गावरील खड्ड्यांच्या यातनादायी प्रवासातून काहीअंशी काहीकाळ सुटका झाल्याचा आनंद प्रवाशांना मिळाल्यानंतर पुन्हा आता नरकयातना नशिबी आल्या आहेत. पेठ ते कसबे डिग्रज या डांबरीकरण पूर्ण झालेल्या रस्त्यावरील खड्डे पूर्ववत होत असताना कसबे डिग्रज ते सांगलीवाडी टोलनाक्यापर्यंतचे काम अजूनही सुरू झालेले नाही. त्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहेत.

ठळक मुद्देसांगली-पेठ रस्त्यावर पुन्हा नरकंयातना...टोलनाक्यापर्यंतचे काम अजूनही सुरू झालेले नाही, प्रवाशांचे हाल

अविनाश कोळी सांगली : पेठ ते सांगली मार्गावरील खड्ड्यांच्या यातनादायी प्रवासातून काहीअंशी काहीकाळ सुटका झाल्याचा आनंद प्रवाशांना मिळाल्यानंतर पुन्हा आता नरकयातना नशिबी आल्या आहेत. पेठ ते कसबे डिग्रज या डांबरीकरण पूर्ण झालेल्या रस्त्यावरील खड्डे पूर्ववत होत असताना कसबे डिग्रज ते सांगलीवाडी टोलनाक्यापर्यंतचे काम अजूनही सुरू झालेले नाही. त्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहेत.सांगली ते पेठ या रस्त्याच्या कामावरून गेली पाच वर्षे नागरिक, सामाजिक संघटनांचा संघर्ष सुरू आहे. सांगली ते पेठ या रस्त्यासाठी २०१७ मध्ये सर्वपक्षीय कृती समितीच्या आंदोलनाने दिल्लीलाही हादरवले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच नाव या रस्त्याला देण्याची अभिनव आंदोलनाची कल्पना राबविली गेल्यामुळे त्याचा डंका गुजरातपर्यंत वाजला. त्यामुळे राज्य महामार्गातून सुटका करीत या रस्त्याचा समावेश राष्टÑीय महामार्गात करण्यात आला. राष्ट्रीय महामार्गाचा भाग बनल्यानंतरही रस्त्याचे दुखणे थांबलेले नाही. प्रवाशांना, येथील शेतकऱ्यांना, नागरिकांना गेली अनेक वर्षे हा रस्ता छळत आहे.तीन वर्षापूर्वी पेठ ते सांगली या मार्गाच्या डांबरीकरणासाठी तीन टप्पे करण्यात आले. बावची फाटा ते वाळवा फाटा, औदुंबर फाटा ते मिरजवाडी आणि तुंग ते सांगलीवाडी टोल नाका अशा टप्प्यात हे काम मंजूर झाले होते. संबंधित ठेकेदारांनी काम पूर्ण केल्यानंतर तुंग ते सांगलीवाडी नाक्यापर्यंतच्या कामात पुन्हा दोन भाग पाडण्यात आले. तुंग ते कसबे डिग्रज आणि कसबे डिग्रज ते सांगलीवाडी नाका अशा दोन टप्प्यांचे शेपूट दीर्घकाळ रखडले. यातील तुंग ते कसबे डिग्रज हे काम पूर्ण झाले असले तरी, कसबे डिग्रज ते सांगलीवाडी नाक्यापर्यंतचे काम अद्याप सुरू झालेले नाही.गेले पाच महिने पडणाºया पावसामुळे केवळ पॅचवर्क करण्याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभागाकडे कोणताही पर्याय उरला नव्हता, मात्र पावसाने पॅचवर्क वाहून गेल्याने प्रवाशांचे भल्यामोठ्या खड्ड्यांमधून मुठीत जीव घेऊन मार्गक्रमण करणे चालू झाले आहे. वेदनांचा हा प्रवास पाऊस थांबेपर्यंत चालू राहणार आहे. नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाSangliसांगली