शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं?
2
लष्करी जवानाकडे हेरॉईन सापडले; श्रीनगरहून पंजाबला करत होता तस्करी, अटकेमुळे खळबळ
3
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं
4
Maharashtra Politics :'फडणवीसांनी डोनाल्ड ट्रम्प यांनाच कुलदैवत मानावं', संजय राऊतांची भाजपावर टीका
5
Mumbai: मेट्रो-३ च्या प्रवासात मोबाइलला 'नो नेटवर्क', प्रवाशांची उडते तारांबळ, तिकीट काढण्यासाठी मार्गदर्शक सूचना...
6
वेळ काय, तुम्ही बोलता काय...; कर्नल सोफिया यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या विजय शाहंना कोर्टाने फटकारलं
7
४० हजारांचं पॅकेज, ५ तासांची सर्जरी... हेअर ट्रान्सप्लांट करणाऱ्या अनुष्काबद्दल धक्कादायक खुलासे
8
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्यांचे फोनवर फोन
9
हेअर ट्रांसप्लांटमुळे दोघांचा मृत्यू; ही सर्जरी खरंच सुरक्षित आहे का? जाणून घ्या सविस्तर माहिती...
10
दोन्ही मुलांना मैदानात उतरवलं, भारताचंही नाव घेतलं! इम्रान खानच्या खेळीनं पाकच्या राजकारणात खळबळ  
11
रोहित शर्मा 'भलतेच काहीतरी' वाटावे असे बोलून गेला, मग लगेच असं दिलं स्पष्टीकरण (VIDEO)
12
ट्रम्प यांचं टॅरिफ लागून अवघा काही वेळही झाला नाही आणि भरला सरकारचा खजिना, कुठून आला पैसा?
13
जर एखाद्या देशाने 'Nuclear' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
14
कोंकणा सेन शर्मा घटस्फोटानंतर पुन्हा प्रेमात? ७ वर्ष लहान अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चा
15
पाकिस्तानला लोनवर लोन... चीनसोबत अमेरिकेची वाढती मैत्री तर नाही ना कारण? भारताचं टेन्शन काय?
16
Datta Upasana: जगातील एकमेव दत्तहस्त पूजास्थान; जिथे दत्त महाराजांच्या हाताचे छाप उमटले!
17
"ती भारताबाहेर गेली अन्...", दिग्दर्शकाने सांगितलं 'रेड २'मध्ये इलियानाला न घेतल्याचं कारण
18
नेहा पेंडसेच्या लेकींना पाहिलंत का?, फॅमिलीसोबत बालीत करतेय व्हॅकेशन एन्जॉय
19
रुपाली गांगुलीला सेटवर कुत्रा चावला? 'अनुपमा' फेम अभिनेत्रीचा राग अनावर, म्हणाली- "हात जोडून सांगते.."
20
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला

आयर्विन पुलावरील अवजड वाहतुकीस बंदी येणार

By admin | Updated: August 5, 2016 01:58 IST

आज निर्णय शक्य : इतर चार पुलांचाही आढावा

सांगली : महाडजवळ ब्रिटिशकालीन पूल वाहून गेल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. जिल्ह्यातील ब्रिटिशकालीन व इतर जुन्या पुलांचा आढावा घेण्यासाठी आज, शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीची बैठक होत आहे. यापूर्वी प्रशासनाने दिलेल्या निर्देशानुसार आयर्विन पुलावरील अवजड वाहतुकीवर बंदी घालण्याचा निर्णय या बैठकीत होण्याची शक्यता आहे. गुरुवारी मदत व पुनर्वसन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. मानिनी शंकर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रशासनाला सूचना दिल्या. महाड येथील घटनेनंतर जिल्ह्यातील जुन्या पुलांच्या स्थितीबाबत चर्चा सुरू झाली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील जुन्या व रहदारी असलेल्या पुलांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी आज बैठक बोलावली आहे. या बैठकीला महापालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर, पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने यांच्यासह एसटी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत प्रामुख्याने आयर्विन पुलावरील अवजड वाहतुकीवर बंदी घालण्याबाबत चर्चा होऊन त्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे समजते. गुरुवारी मदत व पुनर्वसन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. मानिनी शंकर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्ह्यातील पुलांचा आढावा घेतला. निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांनी त्यांना माहिती दिली. आयर्विन पुलाबरोबरच सांगली-कोल्हापूर मार्गावरील अंकली येथील पूल, गुहागर-कडेगाव राज्यमार्गावरील नांदणी नदीवरील पूल, मिरज-म्हैसाळ मार्गावरील वड्डी येथील ओढ्यावरील पूल आणि गुहागर राज्यमार्गावरील येरळा नदीवरील पुलांची स्थिती व त्यावरील रहदारीचा आढावा त्यांनी घेतला. बांधकाम विभागाने जिल्ह्यातील जुन्या व विशेषत: ब्रिटिशकालीन असलेल्या पुलांची मान्सूनपूर्व पाहणी करून त्याचा अहवाल सादर केला आहे. त्यात कोणत्याही पुलास धोका नसल्याचे सांगितले असले, तरी खबरदारीचा उपाय म्हणून आज बैठकीत सर्व पुलांच्या स्थितीबाबत चर्चा होणार आहे. यापूर्वीच शासनाने दिलेल्या निर्देशाची अंमलबजावणी करत आयर्विन पुलावरील अवजड वाहतूक बंद करण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)निर्देशांचे पालन करणार आयर्विन पुलाबाबत सात वर्षांपूर्वीच सूचना आल्यानंतर तेथे फलक लावून सूचना देण्यात आली असली, तरी अजूनही या पुलावरून अवजड वाहतूक होते. या वाहतुकीला पर्यायाबाबत निर्णय घेताना शासनाकडून प्राप्त झालेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करणार असल्याचे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी सांगितले.