शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
3
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
4
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
5
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
6
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
7
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
8
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
9
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
10
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
11
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
12
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
13
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
14
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
15
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
16
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
17
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
18
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
19
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
20
पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका; सरकारने भारतीयांसाठी सूचना दिल्या

आयर्विन पुलावरील अवजड वाहतुकीस बंदी येणार

By admin | Updated: August 5, 2016 01:58 IST

आज निर्णय शक्य : इतर चार पुलांचाही आढावा

सांगली : महाडजवळ ब्रिटिशकालीन पूल वाहून गेल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. जिल्ह्यातील ब्रिटिशकालीन व इतर जुन्या पुलांचा आढावा घेण्यासाठी आज, शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीची बैठक होत आहे. यापूर्वी प्रशासनाने दिलेल्या निर्देशानुसार आयर्विन पुलावरील अवजड वाहतुकीवर बंदी घालण्याचा निर्णय या बैठकीत होण्याची शक्यता आहे. गुरुवारी मदत व पुनर्वसन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. मानिनी शंकर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रशासनाला सूचना दिल्या. महाड येथील घटनेनंतर जिल्ह्यातील जुन्या पुलांच्या स्थितीबाबत चर्चा सुरू झाली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील जुन्या व रहदारी असलेल्या पुलांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी आज बैठक बोलावली आहे. या बैठकीला महापालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर, पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने यांच्यासह एसटी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत प्रामुख्याने आयर्विन पुलावरील अवजड वाहतुकीवर बंदी घालण्याबाबत चर्चा होऊन त्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे समजते. गुरुवारी मदत व पुनर्वसन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. मानिनी शंकर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्ह्यातील पुलांचा आढावा घेतला. निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांनी त्यांना माहिती दिली. आयर्विन पुलाबरोबरच सांगली-कोल्हापूर मार्गावरील अंकली येथील पूल, गुहागर-कडेगाव राज्यमार्गावरील नांदणी नदीवरील पूल, मिरज-म्हैसाळ मार्गावरील वड्डी येथील ओढ्यावरील पूल आणि गुहागर राज्यमार्गावरील येरळा नदीवरील पुलांची स्थिती व त्यावरील रहदारीचा आढावा त्यांनी घेतला. बांधकाम विभागाने जिल्ह्यातील जुन्या व विशेषत: ब्रिटिशकालीन असलेल्या पुलांची मान्सूनपूर्व पाहणी करून त्याचा अहवाल सादर केला आहे. त्यात कोणत्याही पुलास धोका नसल्याचे सांगितले असले, तरी खबरदारीचा उपाय म्हणून आज बैठकीत सर्व पुलांच्या स्थितीबाबत चर्चा होणार आहे. यापूर्वीच शासनाने दिलेल्या निर्देशाची अंमलबजावणी करत आयर्विन पुलावरील अवजड वाहतूक बंद करण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)निर्देशांचे पालन करणार आयर्विन पुलाबाबत सात वर्षांपूर्वीच सूचना आल्यानंतर तेथे फलक लावून सूचना देण्यात आली असली, तरी अजूनही या पुलावरून अवजड वाहतूक होते. या वाहतुकीला पर्यायाबाबत निर्णय घेताना शासनाकडून प्राप्त झालेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करणार असल्याचे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी सांगितले.