शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

सांगली जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले, दुष्काळग्रस्त आटपाडीत ६१.२ मि.मी. पाऊस

By अविनाश कोळी | Updated: September 1, 2022 15:40 IST

दुष्काळग्रस्त आटपाडी तालुक्यात तब्बल ६१.२ मि. मी. पावसाची नोंद

सांगली : गणेशोत्सवाच्या पहिल्या रात्रीच काल, बुधवारी सांगली जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले. दुष्काळग्रस्त आटपाडी तालुक्यात तब्बल ६१.२ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. अतिवृष्टीसदृश पाऊस आटपाडीने अनुभवला. खानापूर-विटा, जत, पलूस, तासगाव व मिरज तालुक्यांनाही जोरदार सरी कोसळल्या.सांगली जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. ढगाळ वातावरण असले तरी पावसाच्या तुरळक सरींची हजेरी लागत आहे. अशातच गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी दुपारी व रात्री जोरदार पावसाने हजेरी लावली. बुधवारी रात्रभर पावसाने जिल्ह्याला झोडपले. प्रत्येक तालुक्यात पावसाने हजेरी लावली. गणेशोत्सवात यामुळे अडथळे निर्माण झाले.आटपाडी शहर व परिसरात बुधवारी रात्री अतिवृष्टीसदृश पावसाची नोंद झाली. तालुक्याच्या अन्य भागात मात्र पावसाचा जोर कमी होता. दुष्काळी जत, खानापूर तालुक्यातही मुसळधार पाऊस झाला. कवठेमहांकाळ तालुक्यात सर्वात कमी पावसाची नोंद झाली.

धरण क्षेत्रात जोर घटलावारणा व कोयना धरण क्षेत्रात गुरुवारी सकाळी नोंदलेल्या आकडेवारीनुसार चोवीस तासात तुरळक पावसाची नोंद झाली. कोयना धरण क्षेत्रात १० व वारणा धरण क्षेत्रात ७ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातच मुसळधार पावसाची नोंद झाली आहे.तालुकानिहाय पाऊस मि. मी.तालुका               कालचा पाऊस     एकूणमिरज                   २३.९             ३४९जत                     ३९                ३३२.७खानापूर-विटा          ४२.७             ४२१वाळवा-इस्लामपूर     २३.५०            २.६तासगाव                ३९.९             ३६६.५शिराळा                 १८.८             १०२८आटपाडी               ६१,२             ३०१.३कवठेमहांकाळ          १४.१             ४३८.८पलूस                    ४८.९             ३३६.६कडेगाव                 २४.८              ४११.९

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊस