शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

पाटबंधारेच्या मान्यतेविना हरिपूर पुलाचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 14:55 IST

हरिपूर-कोथळी पुलाचा बांधकाम आराखडा अद्यापही सार्वजनिक बांधकाम विभागाने पाटबंधारे विभागाच्या मान्यतेसाठी सादर केलेला नाही. याबाबत पाटबंधारे विभागाने तीनदा स्मरण पत्रही पाठविले आहे. त्यातच आता भविष्यात पुलामुळे काही अडचण उद्भवल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी सार्वजनिक बांधकामवरच राहील, असे पत्र पाटबंधारे विभागाच्या उपअभियंत्यांनी दिले आहे.

ठळक मुद्देपाटबंधारेच्या मान्यतेविना हरिपूर पुलाचे काम सुरूसर्वस्वी जबाबदारी सार्वजनिक बांधकामवरच

सांगली : हरिपूर-कोथळी पुलाचा बांधकाम आराखडा अद्यापही सार्वजनिक बांधकाम विभागाने पाटबंधारे विभागाच्या मान्यतेसाठी सादर केलेला नाही. याबाबत पाटबंधारे विभागाने तीनदा स्मरण पत्रही पाठविले आहे. त्यातच आता भविष्यात पुलामुळे काही अडचण उद्भवल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी सार्वजनिक बांधकामवरच राहील, असे पत्र पाटबंधारे विभागाच्या उपअभियंत्यांनी दिले आहे.सांगली-कोल्हापूर जिल्ह्याला जोडणाऱ्या हरिपूर-कोथळी पुलाचे काम सध्या जोरात सुरू आहे. त्यासाठी २५ कोटींचा खर्च होणार आहे. कोथळी गावाच्या बाजूने पुलाचे काम सुरू आहे. आॅगस्ट महिन्यात आलेल्या महापुरानंतर हरिपूर ग्रामस्थांनी या पुलाला विरोध केला.महापुराचे पाणी हरिपूर गावात शिरले होते. त्यामुळे अनेक घरांचे नुकसान झाले. त्यातच पुलाला जोडणाऱ्या रस्त्याला जिल्हा मार्गाचा दर्जा दिल्याने शेतजमिनी व घरे बाधित होण्याची भीती ग्रामस्थांना आहे. हरिपूर ग्रामस्थांनी याबाबत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडेही तक्रार केली आहे. या पुलाचे काम रद्द करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.दरम्यान, पुलाच्या बांधकाम आराखड्याला पाटबंधारे विभागाची मान्यता घेतली नसल्याचे समोर आले आहे. याबाबत पाटबंधारे विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाला तीन स्मरणपत्रेही पाठविली आहेत.

जानेवारी महिन्यात पाटबंधारेच्या उपकार्यकारी अभियंत्यांनी पुन्हा पत्र पाठविले. त्यात सांगलीच्या कृष्णा नदीवरील प्रस्तावित आयर्विन व हरिपूर-कोथळी पुलाचा सविस्तर आराखडा, जलशास्त्रीय अभ्यास व प्रस्तावित पुलामुळे नदीतील पाण्यास निर्माण होणारा अडथळा आदींची माहिती सादर करण्याचे निर्देश दिले होते.

पुलाचा जलशास्त्रीय अभ्यासास जलसंपदा खात्याकडून मान्यता घेणे आवश्यक आहे. पण सार्वजनिक बांधकाम विभागाकडून माहिती प्राप्त न झाल्यास भविष्यात काही अडचणी उद्भवल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपल्या खात्यावर राहील, असेही म्हटले होते. या पत्रानंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाने आराखडा सादर केलेला नसल्यामुळे तर्कवितर्क लढविले जात आहेत.

टॅग्स :riverनदीSangliसांगली